Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघास 'समाजरत्न' पुरस्कार जाहीर



लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे महाराष्ट्रातील पत्रकार, त्यांचे कुटुंब व  सामान्य जनतेसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन सप्तफेरे वधू वर सूचक केंद्र या संस्थेने हा पुरस्कार जाहीर केला आहे. सदर संस्थेचे संस्थापक व कालपरिवर्तन या वृत्तपत्राचे संपादक श्री संजय राजुळे व त्यांच्या टीमने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांची भेट घेऊन निमंत्रण पत्र दिले आहे.


सप्तफेरे वधू-वर सूचक आयोजित सप्तफेरे गुणगौरव पुरस्कार सोहळा २०२१ साठी निवड समितीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन समाजरत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे. सदर पुरस्कार सोहळा दि. ३० डिसेंबर,२०२१ रोजी अष्टविनायक मंदिर हॉल, नारायण नगर, लातूर येथे सायंकाळी ६.०० वाजता दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहून हा बहुमान स्विकारावा असे सप्तफेरे वधू-वर सूचक केंद्राचे संस्थापक श्री संजय राजुळे यांनी आवाहन केले आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघास समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्रातील, संपादक, पत्रकार, समाजसेवक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक व हितचिंतकांनी संघाचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते