नांदेड : ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक मा. दिपकभाई केदार व सहकारी यांच्या वरील खोटे गुन्हे मागे घेण्याबाबत, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी सर यांच्या मार्फत मुख्यमंत्री , मा.उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. समाजाचा घटक म्हणून केदार यांची भूमिका ही त्याठिकाणी असलेल्या गैरसोय व इंदुमिलच्या ठिकाणी होणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठीचा आक्रोश होता. पण पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेऊन विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले ते मागे घेण्यात यावे. यामागणीचे निवेदन देण्यात आले . गुन्हे मागे नाही घेतल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे ,नांदेड ता.अध्यक्ष सतीश हिंगोले, अर्धापूर ता. अध्यक्ष गणेश कांबळे, नांदेड ता.उपाध्यक्ष आनंद पाटील, शुद्दोधन कांबळे व इतर जण उपस्थित होते.
Comments
Post a Comment