Skip to main content

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या६५ व्या महापरिनिर्वाण दिनी ६५ जणांनी केले रक्तदान एक वही एक पेन अभियान राबिवण्यात आले




किनवट, दि.६ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व २६/११ च्या आंतकी हल्यात शहीद झालेल्या पोलिस विर जवानांना ६५ च्यावर रक्तदात्यांनी आज(दि.६) सकाळी १० वाजता रक्तदान करुन अभिवादन केले.तसेच एक वही एक पेन अभियानालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे संयोजक एड.सम्राट सर्पे व निखिल कावळे यांनी सांगितले.रक्तदान शिबिराचे हे चवथे वर्ष आहे.


    प्रारंभी उपस्थित मान्यवर भारतीय बौद्ध महासभेचे ता. अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, सह पोलिस निरीक्षक विशाल वाठोरे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी नप उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार,   अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राज्यसचिव ॲड. मिलींद सर्पे , डॉ. यु बी मोरे ,प्राचार्य आनंद भंडारे, माजी नगराध्यक्ष के. मुर्ती, वंचीत बहुजन आघाडीचे ता. अध्यक्ष किशन राठोड , दादाराव कयापाक, दिपक ओंकार, विवेक ओंकार, सुरेश जाधव, प्रा,. आनंद भालेराव, शिवा आंधळे, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, माधव कावळे, वसंत सर्पे, प्रा.सुबोध सर्पे, राजेश पाटील, गंगाधर कदम, सभांजी ब्रिगेडचे सचीन कदम, माजी नगरसेविका आशाताई कदम, गोंडवाना ब्रिगेडचे गजानन गुहाडे, संतोष पहुरकर, संजय नरवाडे, रीकेश गोडबोले, सम्राट कावळे, राहुल कापसे, अनित्य कांबळे,  येरेकार सर, भगवान मारपवार विशेष सहकार्य प्रशांत मोरे, क्षीतीज रमेश मुनेश्वर व गुरुगोवींद सिंगजी व्हॉलेंटरी ब्लड बँकेचे डॉक्टर, परीचारीका, आरोग्य सेवक स्टॉफ यांनी अभिवादना नंतर रक्तदानाची प्रक्रिया पार पाडली 




 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव महेंद्र नरवाडे व गंगाधर कदम यांनी सामुदायिक वंदना घेतली.याप्रसंगी एक वही एक पेन वाटप उपक्रम राबविण्यात आला या वेळी आंबेडकरी विविध पक्ष संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी,आंबेडकर प्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...