Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या भंडारा जिल्हा पदाधिकाऱ्यांचा 'राष्ट्रीय जीवन गौरव' पुरस्काराने सन्मान

 



 नागपूर : 'जागतिक मानवाधिकार दिनी' प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन केंद्रीय मानवाधिकार संगठन नवी दिल्लीच्या वतीने नागपूर येथे जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली च्या वतीने१० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिन साई सभागृह व्होकार्ट हॉस्पिटल नागपूर येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य अतिथी मा. न्यायाधिस अभिजित देशमुख, मा. संजय पांडे (वरिष्ठ पोलीस अधीक्षक), डॉ. मिलिंद दहिवले (राष्ट्रीय अध्यक्ष), डॉ. कुमेश्वर भगत (राष्ट्रीय उपाध्यक्ष), डॉ. दिपक कदम (फिल्म निर्माते),  डॉ. प्रकाश भागवत (सिने अभिनेता), मा. अश्विनी चंद्रिकापुरे (सिने अभिनेत्री), ब्रह्मकुमारी मनिषादिदी आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांना 'राष्ट्रीय जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुरज गोंडाने,भंडारा जिल्हा कोष्याध्यक्ष सैनपाल वासनीक, यांना मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले.  कार्यक्रमास देशातुन प्रत्येक राज्यातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्लीकडून करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सुचनांचे काटेकोर पणे पालन करुनच कार्यक्रम पार पाडण्यात आले. प्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक डी.टी. आंबेगावे , महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय पंकज वानखेडे, राज्य सरचिटणीस संजीव जी भांबोरे विदर्भ सरचिटणीस प्रा. शेखर बोरकर, पत्रकार प्रवीण भोंदे, पत्रकार रामलाल शहारे, पत्रकार प्रशांत शहारे, भंडारा जिल्हा पदाधिकारी तसेच कास्ट्राईब कल्याण महासंघ पुणे चे राज्य उपमहासचिव मा. सुर्यकांत हुमणे, जिल्हा सचिव धांडेजी, व जिल्ह्यातील अनेक समाज बांधवांनी पुरस्कार प्राप्त कर्त्यांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला