Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या भंडारा जिल्हा पदाधिकाऱ्यांचा 'राष्ट्रीय जीवन गौरव' पुरस्काराने सन्मान

 



 नागपूर : 'जागतिक मानवाधिकार दिनी' प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन केंद्रीय मानवाधिकार संगठन नवी दिल्लीच्या वतीने नागपूर येथे जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली च्या वतीने१० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिन साई सभागृह व्होकार्ट हॉस्पिटल नागपूर येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य अतिथी मा. न्यायाधिस अभिजित देशमुख, मा. संजय पांडे (वरिष्ठ पोलीस अधीक्षक), डॉ. मिलिंद दहिवले (राष्ट्रीय अध्यक्ष), डॉ. कुमेश्वर भगत (राष्ट्रीय उपाध्यक्ष), डॉ. दिपक कदम (फिल्म निर्माते),  डॉ. प्रकाश भागवत (सिने अभिनेता), मा. अश्विनी चंद्रिकापुरे (सिने अभिनेत्री), ब्रह्मकुमारी मनिषादिदी आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांना 'राष्ट्रीय जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुरज गोंडाने,भंडारा जिल्हा कोष्याध्यक्ष सैनपाल वासनीक, यांना मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले.  कार्यक्रमास देशातुन प्रत्येक राज्यातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्लीकडून करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सुचनांचे काटेकोर पणे पालन करुनच कार्यक्रम पार पाडण्यात आले. प्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक डी.टी. आंबेगावे , महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय पंकज वानखेडे, राज्य सरचिटणीस संजीव जी भांबोरे विदर्भ सरचिटणीस प्रा. शेखर बोरकर, पत्रकार प्रवीण भोंदे, पत्रकार रामलाल शहारे, पत्रकार प्रशांत शहारे, भंडारा जिल्हा पदाधिकारी तसेच कास्ट्राईब कल्याण महासंघ पुणे चे राज्य उपमहासचिव मा. सुर्यकांत हुमणे, जिल्हा सचिव धांडेजी, व जिल्ह्यातील अनेक समाज बांधवांनी पुरस्कार प्राप्त कर्त्यांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.