Skip to main content

पिंपरफोडी ता किनवट येथे वारकऱ्यांचा यांचा मेळावा संपन्न

 



किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)

बोधडी परिसरातील पिंपरफोडी येथे काल दि 12 डिसेंबर 2021 रोजी वारकरी संप्रदायातील वैष्णव पंथीय भक्तगणांचा मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्याचे अध्यक्ष गावच्या सरपंच अनुसया डाके ह्या होत्या तर मेळाव्याचे उदघाटन कोंडबा महाराज तोटेवाड सावरीकर अध्यक्ष किनवट तालुका यांनी भगवान विष्णूच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ फोडून उद्घाटन केले. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महेश महाराज बोधडी कर, बळीराम तर्फे वाड, अंकुश महाराज बोधडी कर, सलाम महाराज दहेगावकर, मारुती महाराज बोधडी कर, तुकाराम लाखाडे बोधडी कर यांच्यासह आढावा समितीचे माजी अध्यक्ष भगवान हुरदुके, मारुती दिवसे पाटील, कॉ अडेलू बोनगीर, गंगाधर तोट्रे ,अंकुश साबळे, माजी सरपंच कोकाटे, दत्ता झिंगरे, चंद्रकांत गारोळे, यांच्यासह मेळाव्यासाठी जलधारा व बोधडी परिसरातील नंदगाव, जलधरा, सावरगाव, कोल्हारी, धानोरा, पिंपरी, सावरी, थारा, डोंगरगाव, सोमागुडा, सुंगागुडा, सिंगारवाडी, इंजेगाव, बोधडी बु , सिंदगी इत्यादी गावांसह इतर अनेक गावातील जवळपास चारशे ते पाचशे वारकरी उपस्थित होते. याप्रसंगी तोटेवाड महाराज पुढे बोलताना म्हणाले की वारकरी गाव पातळीवर गेल्या अनेक वर्षापासून समाज प्रबोधनाचे अविरत काम करत आहे अशा वारकऱ्यांना उतारवयात शासनाने जाहीर केल्याप्रमाणे किमान मानधन देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मागणी त्यांनी केली यासाठी वारकऱ्यांनी व्यवस्थित अर्ज करण्याचे आवाहन  केले यासाठी अध्यक्ष या नात्याने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कॉम्रेड अडेलू बोनगीर मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले की संत-महात्मे हे  खऱ्या अर्थाने समाजात असलेल्या अनिष्ट रुढी रितीरीवाज परंपरा सह मनुष्यात असलेले षडविकार संपवून समाज मानसिकदृष्ट्या सुदृढ व व्यसनमुक्त होण्यासाठी कार्य केलेले आहेत. या महान संत महात्म्याचा वारसा चालवणार्‍या वारकऱ्यांना ही शासनाने मानधनाचा दिलासा देऊन त्यांना प्रबोधनासाठी चालना द्यावी अशी मागणी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकिसन गर्दस्वार यांनी केले तर प्रास्ताविक राजू गारोळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन राजु गारोळे , अडेलू बोनगीर, भागवत डाके यांनी केले होते. कार्यक्रमानंतर सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...