Skip to main content

पिंपरफोडी ता किनवट येथे वारकऱ्यांचा यांचा मेळावा संपन्न

 



किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)

बोधडी परिसरातील पिंपरफोडी येथे काल दि 12 डिसेंबर 2021 रोजी वारकरी संप्रदायातील वैष्णव पंथीय भक्तगणांचा मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्याचे अध्यक्ष गावच्या सरपंच अनुसया डाके ह्या होत्या तर मेळाव्याचे उदघाटन कोंडबा महाराज तोटेवाड सावरीकर अध्यक्ष किनवट तालुका यांनी भगवान विष्णूच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ फोडून उद्घाटन केले. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महेश महाराज बोधडी कर, बळीराम तर्फे वाड, अंकुश महाराज बोधडी कर, सलाम महाराज दहेगावकर, मारुती महाराज बोधडी कर, तुकाराम लाखाडे बोधडी कर यांच्यासह आढावा समितीचे माजी अध्यक्ष भगवान हुरदुके, मारुती दिवसे पाटील, कॉ अडेलू बोनगीर, गंगाधर तोट्रे ,अंकुश साबळे, माजी सरपंच कोकाटे, दत्ता झिंगरे, चंद्रकांत गारोळे, यांच्यासह मेळाव्यासाठी जलधारा व बोधडी परिसरातील नंदगाव, जलधरा, सावरगाव, कोल्हारी, धानोरा, पिंपरी, सावरी, थारा, डोंगरगाव, सोमागुडा, सुंगागुडा, सिंगारवाडी, इंजेगाव, बोधडी बु , सिंदगी इत्यादी गावांसह इतर अनेक गावातील जवळपास चारशे ते पाचशे वारकरी उपस्थित होते. याप्रसंगी तोटेवाड महाराज पुढे बोलताना म्हणाले की वारकरी गाव पातळीवर गेल्या अनेक वर्षापासून समाज प्रबोधनाचे अविरत काम करत आहे अशा वारकऱ्यांना उतारवयात शासनाने जाहीर केल्याप्रमाणे किमान मानधन देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मागणी त्यांनी केली यासाठी वारकऱ्यांनी व्यवस्थित अर्ज करण्याचे आवाहन  केले यासाठी अध्यक्ष या नात्याने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कॉम्रेड अडेलू बोनगीर मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले की संत-महात्मे हे  खऱ्या अर्थाने समाजात असलेल्या अनिष्ट रुढी रितीरीवाज परंपरा सह मनुष्यात असलेले षडविकार संपवून समाज मानसिकदृष्ट्या सुदृढ व व्यसनमुक्त होण्यासाठी कार्य केलेले आहेत. या महान संत महात्म्याचा वारसा चालवणार्‍या वारकऱ्यांना ही शासनाने मानधनाचा दिलासा देऊन त्यांना प्रबोधनासाठी चालना द्यावी अशी मागणी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकिसन गर्दस्वार यांनी केले तर प्रास्ताविक राजू गारोळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन राजु गारोळे , अडेलू बोनगीर, भागवत डाके यांनी केले होते. कार्यक्रमानंतर सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला