Skip to main content

टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न




नांदेड:

 टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा काल दि. 24 ऑक्टोबर 2021 रोजी नांदेड येथे टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या मेळाव्यात नांदेड जिल्ह्य़ातील (दक्षिण) नांदेड जिल्ह्यातील जिल्हा पदधिकारी, सदस्य, तालुकाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.

या मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली, धर्माबाद, उमरी, बिलोली आणि कंधार तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष पदी हिमायतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सलाम खुरेशी, जिल्हा संघटक पदी उमरी येथील ब्रिगेडचे जुने व समर्पित कार्यकर्ते फयाज पठाण, जिल्हा मीडिया प्रमुख आणि उमरी तालुका अध्यक्ष पदी बळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि दैनिक समीक्षाचे उमरी तालुका प्रतिनिधी फेरोज पटेल, उमरी तालुका विद्यार्थी ब्रिगेड अध्यक्ष पदी सय्यद सुलेमान तळेगावकर, बिलोली तालुका अध्यक्ष पदी युवा कार्यकर्ते शेख इरफान आणि बिलोली तालुका उपाध्यक्ष पदी अफरोजखान पठाण, धर्माबाद तालुका उपाध्यक्ष पदी मिर्झा इब्राहिम बेग, धर्माबाद तालुका सचिव पदी सय्यद शाहिद अली, कंधार तालुका विद्यार्थी ब्रिगेड अध्यक्ष पदी कुर्ला येथील जुनेद अत्तार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मेळाव्यात पुढच्याच महिन्यात येणार्‍या टिपू सुलतान जयंती आयोजना बाबत चर्चा करण्यात आली. 

 डाॅ. ज़हीरूद्दिन पठान (प्रदेश अध्यक्ष), सय्यद नदीम (जिल्हाध्यक्ष, नांदेड उत्तर) ईनामदार जकरीया (जिल्हाध्यक्ष, नांदेड दक्षिण), शेख शाकीर (किनवट तालुका अध्यक्ष), मिर्झां खुर्रम बेग पटेल (धर्माबाद तालुका अध्यक्ष) यांनी सर्व नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि टिपू सुलतान ब्रिगेड संघटनेच्या ध्येय आणि धोरणा बाबत, कार्यपद्धती बाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र दंगामुक्त करण्यासाठी, महापुरूषांना अपेक्षित समाज निर्माण करण्यासाठी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही नैसर्गिक आणि मानवीय मूल्ये समाजात रुजविण्यासाठी, राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यासाठी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संघटनेची विचारधारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचवावी, असे आवाहन प्रदेश अध्यक्ष डॉ. ज़हीरूद्दिन पठान यांनी केले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.