Skip to main content

मौलाना कलीम सिद्दिकी यांची सुटका करा - टिपू सुलतान ब्रिगेड किनवटची मागणी

 


किनवट/सय्यद नदीम

               उत्तर प्रदेश एटीएस ने भारतीय मुस्लिमांचे आदरस्थान आणि श्रद्धास्थान आदरणीय मौलाना कलीम सिद्दिकी यांना धर्मांतरण करण्याच्या आरोपात अटक केली आहे. मौलाना कलीम सिद्दिकी यांनी कोणताच गुन्हा केलेला नाही. हा आरोप पूर्णतः द्वेष भावनेने प्रेरित आणि निराधार आहे. मौलाना कलीम सिद्दिकी यांनी कोणालाच धर्मांतर करण्यास जबरदस्ती केलेली नाही. भारतीय राज्यघटनेने सर्व भारतीय नागरिकांना आपापल्या धर्मानुसार आचरण करण्याचा, आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचा आणि आपल्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचा स्वीकार करण्याचा अधिकार दिलेला आहे. मौलाना कलीम सिद्दिकी साहेब सारख्या देशभक्त, समाज सुधारक आणि हिंदू-मुस्लीम समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तीस खोट्या गुन्ह्यात अटक करणे आणि त्यांना पोलीस पोलीस कोठडीत ठेवणे हे बेकायदेशीर आणि लोकशाहीला मारक आहे. ही अटक द्वेष भावनेतून आणि येणाऱ्या काळातील उत्तर प्रदेशच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशात राजनीतिक ध्रुवीकरण करण्याचा, समाजात फूट पाडण्याचा, समाजात भांडणे लावून देशात अराजकता माजवण्याचा घाणेरडा षड्यंत्र उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात येत आहे. आश्चर्य म्हणजे उत्तर प्रदेश सरकारच्या असल्या देश विरोधी धोरणास केंद्रातील भाजप सरकार मुक समर्थन देत आहे. 

         टिपू सुलतान ब्रिगेड किनवटच्या वतीने नांदेड जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम, टिपू सुलतान ब्रिगेड किनवट तालुका अध्यक्ष शेख शाकीर, सामाजिक कार्यकर्ते फेरोज पठाण, अमीर भाई, अजमल भाई इ.नी आज तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन त्यांच्या द्वारे महामहिम राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांना विनंती करण्यात आली की महामहिम राष्ट्रपती यांनी जातीने लक्ष घालून मौलाना कलीम सिद्दिकी यांची तात्काळ सुटका करावी आणि उत्तर प्रदेश सरकारवर कार्यवाही करावी. जर मौलाना कलीम सिद्दिकी यांची लवकरात लवकर सुटका करण्यात आली नाही तर कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.