Skip to main content

मौलाना कलीम सिद्दिकी यांची सुटका करा - टिपू सुलतान ब्रिगेड किनवटची मागणी

 


किनवट/सय्यद नदीम

               उत्तर प्रदेश एटीएस ने भारतीय मुस्लिमांचे आदरस्थान आणि श्रद्धास्थान आदरणीय मौलाना कलीम सिद्दिकी यांना धर्मांतरण करण्याच्या आरोपात अटक केली आहे. मौलाना कलीम सिद्दिकी यांनी कोणताच गुन्हा केलेला नाही. हा आरोप पूर्णतः द्वेष भावनेने प्रेरित आणि निराधार आहे. मौलाना कलीम सिद्दिकी यांनी कोणालाच धर्मांतर करण्यास जबरदस्ती केलेली नाही. भारतीय राज्यघटनेने सर्व भारतीय नागरिकांना आपापल्या धर्मानुसार आचरण करण्याचा, आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचा आणि आपल्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचा स्वीकार करण्याचा अधिकार दिलेला आहे. मौलाना कलीम सिद्दिकी साहेब सारख्या देशभक्त, समाज सुधारक आणि हिंदू-मुस्लीम समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तीस खोट्या गुन्ह्यात अटक करणे आणि त्यांना पोलीस पोलीस कोठडीत ठेवणे हे बेकायदेशीर आणि लोकशाहीला मारक आहे. ही अटक द्वेष भावनेतून आणि येणाऱ्या काळातील उत्तर प्रदेशच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशात राजनीतिक ध्रुवीकरण करण्याचा, समाजात फूट पाडण्याचा, समाजात भांडणे लावून देशात अराजकता माजवण्याचा घाणेरडा षड्यंत्र उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात येत आहे. आश्चर्य म्हणजे उत्तर प्रदेश सरकारच्या असल्या देश विरोधी धोरणास केंद्रातील भाजप सरकार मुक समर्थन देत आहे. 

         टिपू सुलतान ब्रिगेड किनवटच्या वतीने नांदेड जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम, टिपू सुलतान ब्रिगेड किनवट तालुका अध्यक्ष शेख शाकीर, सामाजिक कार्यकर्ते फेरोज पठाण, अमीर भाई, अजमल भाई इ.नी आज तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन त्यांच्या द्वारे महामहिम राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांना विनंती करण्यात आली की महामहिम राष्ट्रपती यांनी जातीने लक्ष घालून मौलाना कलीम सिद्दिकी यांची तात्काळ सुटका करावी आणि उत्तर प्रदेश सरकारवर कार्यवाही करावी. जर मौलाना कलीम सिद्दिकी यांची लवकरात लवकर सुटका करण्यात आली नाही तर कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...