Skip to main content

ऑल इंडिया पँथर सेनेने जपली सामाजिक बांधिलकी

 


   नांदेड : एकदरा ग्रा.प ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुकाध्यक्ष तसेच एकदरा ग्रा.प सदस्य सतीश हिंगोले  यांच्या वाढदिवस निमित्त सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाच्या काळात जी ऑक्सीजन विना अनेक जनतेस आपला प्राण गमवावा लागला होता ही परिस्थिती भविष्यात घडू नये. म्हणून सामाजिक बांधिलकीतून ऑल इंडिया पँथर सेनेचे नांदेड तालुका अध्यक्ष यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा प्रांगणात वृक्ष लागवड करून सामाजिक बांधिलकी जपली.व प्रत्येक व्यक्तीने किमान दरवर्षी आपल्या शुभप्रसंगी  एक झाड रोपन करून त्याची जोपासना करावी असे यांनी सांगितले येणाऱ्या काळामध्ये ऑक्सिजन तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून आपल्या गावाच्या खुल्या मैदानात ,बांधावर ,रस्त्याच्या दुतर्फा बाजूला ,गावातील गायरान जमिनीवर ,शाळेच्या प्रांगणात सर्व गावकऱ्यांनी म्हणून श्रमदानातून वृक्ष लागवड करून सामाजिक समतोल जपावा. यातून निसर्गाचा समतोल व निसर्गाची पाणी पातळी वाढण्यास मदत होते असे प्रतिपादन सतीश इंगोले एकदरेकर यांनी केले  जिल्हा परिषद शाळा एकदरा येथे वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा करण्यात आला. 

   त्यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे  उपस्थित होते.तर  शाळेचे मुख्याध्यापक  कुलकर्णी सर, गोधने सर,पतंगे सर ,संतोष चौरे  यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी शाळेतील विद्यार्थी व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...