Skip to main content

पत्रकार गरीबांना चुकुनही जाहिरात मागत नाही, फक्त प्रसिद्ध व्यक्तींनाच मागतात, म्हणून नाही म्हणु नका - पत्रकार सेवा संघ चा इशारा जाहिरात नाही तर बातमी नाही व कुठलेच सहकार्य देखील राहणार नाही - आशिष शेळके, तालुकाध्यक्ष

 




किनवट : संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारांच्या समस्या दुर करण्यासाठी तसेच पत्रकारांच्या सेवेसाठी कार्यरत असणारी संघटना म्हणजेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना आहे. प्रत्येक वेळा व प्रत्येक ठीकाणी पत्रकार सेवा संघ ही पत्रकारांच्या मदतीला धावून येत असते. या संघटनेचे किनवट तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांनी सर्व लोकप्रतिनिधी, नेते, पुढारी व कार्यकर्ते तसेच शासकीय, निमशासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांना व उद्योगपतींना इशारा दिला आहे की, जर तुम्ही आम्हाला जाहिरात दिलात तरच आम्ही तुम्हाला प्रसिद्धी देऊ, जर जाहिरात नाही तर बातमी नाही व कुठलेच सहकार्य देखील राहणार नाही.

          पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकार सेवा संघ चे किनवट तालुका अध्यक्ष आशिष शेळके म्हणाले की, पत्रकार सेवा संघ ही संघटना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे सरांच्या नेतृत्त्वाखाली अहोरात्र पत्रकारांच्या सेवेसाठी काम करत आहे. अशाच काही समस्यांपैकी जाहिरात जमा करणे हे देखील पत्रकारांची मोठी समस्या सध्या दिसत आहे. कारण दिवाळी म्हटलं की प्रत्येक वृत्तपत्राचे संपादक जाहिरात साठी आपल्या सर्व प्रतिनिधीना टार्गेट देत असतात, व ते टार्गेट पुर्ण करणे हे प्रत्येक वृत्तपत्रांच्या प्रतीनीधीचे कर्तव्य असते कारण याच जाहिराती च्या टार्गेट वरच कुठलाही वृत्तपत्र चालत असतो. तसेच बहुतांश पत्रकारांची उपजिवीका ही जाहिराती वरच अवलंबून असते. आमचे पत्रकार बांधव जाहिरात ही कधीच गोरगरीब व्यक्तींना मागत नसतात, किंवा एखाद्या गरजू व वंचित व्यक्तींना त्यांची बातमी लावण्यासाठी जाहिरात मागत नसतात. आमचे सर्व पत्रकार बांधव हे जाहिरात त्यांनाच मागतात जे व्यक्ती आपापल्या परीसरात प्रसिद्ध असतात. जसे की, लोकप्रतीनीधी, नेते, पुढारी, कार्यकर्ते, उद्येगपती, संस्थाचालाक व काही शासकीय व निमशासकीय व खाजगी कर्मचारी यांनाच आपले पत्रकार बांधव हे जाहीरात मागत असतात. कारण की या सर्वांना पत्रकारांनी आपापल्या वृत्तपत्रातुन व बातमी मधुन प्रसिद्धी दिलेली असते. यांची प्रत्येक बातमी लाउन यांचा प्रचार व प्रसार केलेला असतो म्हणुन हक्काने पत्रकार बांधव यांना जाहिरात मागत असतात. तरीसुद्धा जाहिरात म्हटलं की यातील काही व्यक्ती हा पत्रकारांना टाळत असतो ही शोकांतिका आहे.

             सर्वांना दिवाळी जाहिरात निमित्ताने सांगु इच्छितो की, आमचे सर्व पत्रकार बांधव यांना कुठलेही पगार, वेतन व मानधन नसताना देखील बातमी कव्हरेज साठी अहोरात्र प्रयत्न करत असतो. पण आता यांनतर सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की, जो व्यक्ती आपल्या वृत्तपत्राला या दिवाळीला जाहिरात देणार नाही त्यांची एकही बातमी लाऊ नका, त्यांना प्रसिद्धी देऊ नका, त्यांचा प्रचार व प्रसार करु नका, व त्यांना कुठलेच सहकार्य करु नका. चालु घडामोडी, घटना, गरीबांच्या बातम्या तर आपण मोफत लावतोच पण या अशा बलाढ्य व प्रसिद्ध व्यक्तींच्या बातम्या बिलकुल मोफत लाऊ नका. तरच या नेते व पुढाऱ्यांना आपल्या पत्रकार बांधवांची किंमत कळेल.

            पुढे बोलताना आशिष शेळके म्हणाले की, आमच्या पत्रकार सेवा संघटना ही अख्या महाराष्ट्रात कार्यरत आहे व या संघटने मध्ये जेवढे काही वृत्तपत्रांचे, टि.व्ही चॅनलचे, युट्युब चॅनल चे व पोर्टलचे संपादक व पत्रकार बांधव आहेत आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की जाहिरात नाही तर बातमी नाही व या नेत्या, पुढाऱ्यांना येणाऱ्या सर्व निवडणुकीत कुठलेच सहकार्य देखील राहणार नाही.

          प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट च्या वतीने दिलेल्या या ईशाऱ्यांमुळे सर्व पत्रकार बांधवांची जाहिरात जमा करण्याची समस्या दुर होईल का ?, की जाहिरात नाही दिल्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये व यांच्या प्रचार प्रसार माध्यमांमध्ये काय परीणाम होईल ? यांकडे सर्व नागरिकांचे आता लक्ष लागुन राहिल.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला