Skip to main content

विद्यार्थ्यांनी कायद्याची माहिती घेऊन जीवनात त्याचा उपयोग करावा -एस. बी. अंभोरे


ता. प्र. किनवट :-

 विद्यार्थ्यांनी कायद्याविषयी माहिती घेऊन जीवनामध्ये त्यांचा उपयोग सुखी व समृध्द होण्यासाठी करावे. कायद्याचा अभ्यास सर्वांनी करावे. असे मत बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व तालुका विधी सेवा समिती शाखा किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित कायदेविषयक शिबिरात मा.एस.बी.अंभोरे,अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर, किनवट यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव सिडाम, 

प्रमुख उपस्थिती किनवट शिक्षण संस्थेचे सचिव, शंकरराव चाडावार

तालुका विधी सेवा समिती सदस्य के.मुर्ती,प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर, हे विचारमंचावर उपस्थित होते. 

प्रारंभी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

स्वागतगीत शे. सालेहा काजीम व दिव्या अचकुलवार यांनी  सादर केले. 


हा कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर यांनी केले.पुढे बोलतांना  न्यायधीश एस. बी. अंभोरे म्हणाले,भारतीय दंड सहिता विषयी माहिती मिळवावी विविध कलमा विषयी माहिती समजावून घ्यावे.कायदयाचा अभ्यास करावे.कायद्यापुढे सर्व समान असतात. खरे गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून कायद्यातील कलम समजावून घ्यावे.आयपीसीमधील विविध कलमाची सविस्तर माहिती घ्यावे.असे मार्गदर्शनातून व्यक्त केले. याप्रसंगी अॅड.एस.पी.शिरपूरे यांनी कौटुबिंक हिंसाचार, घरगुती कलह विषयी माहिती दिली. 

विशेष उपस्थिती अॅड. एन. एस. राठोड,अॅड.टि.आर.चव्हाण,अॅड.ए.एम.कोमरवार,पोलीस कर्मचारी  गंगय्या दोनकलवार, मिसलवार यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख तथा सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी केले तर आभार वाणिज्य विभागप्रमुख तथा सांस्कृतिक विभागाच्या डॉ. शुंभागी दिवे यांनी मानले. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, डॉ. जी.बी.लांब,प्रा.डाॅ.प्रज्ञा घोडवाडीकर, प्रा.सुलोचना जाधव, प्रा. अम्रपाली हटकर, प्रा.डाॅ. योगेश सोमवंशी, प्रा. काझी एस.एस.प्रा.मंदाकिनी राठोड,प्रा.एम. आय. पवार,प्रा.डाॅ.स्वाती कुरमे, 

प्रा.आत्राम,प्रा.राठोड,प्रा.

प्रल्हाद जाधव,

प्रा.डाॅ.हिप्पळगावकर, प्रा.एस.पी.बोकडे,दीपक खंदारे, मिलिंद लोकडे, सुधीर पाटील, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला