Skip to main content

पत्रकारांवर झालेला अन्याय सहन करणार नाही - प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, उमरखेडच्या बैठकीत निर्णय

 


यवतमाळ, उमरखेड : राज्यात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मासिक बैठक उमरखेड येथे शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी पार पडली. पत्रकारांवर झालेला अन्याय सहन करणार नाही असा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,उमरखेडच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला.

 यावेळी तालुक्यातील वेगवेगळ्या सर्कल मधील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांच्या उपस्थितीमध्ये तालुका अध्यक्ष मारोती गव्हाळे यांनी पत्रकारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी संघटनेच्या कुठल्याही व्यक्तीवर जर अन्याय झाला तर कदापीही खपवून घेणार नाही. कुठल्याही प्रकारे अन्याय सहन करणार नाही. व पत्रकारांच्या मागे आपली संघटना सदैव उभी असेल असे आश्वासन दिले. संघटनेची दरमहा बैठक होत असते. व त्यामध्ये पत्रकारांच्या समस्या सोडवल्या जातात. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे नियमित पणे संघटना पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून योग्य ते मार्गदर्शन करीत असतात. या बैठकीमध्ये काही नवीन पत्रकारांना संघटनेमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी संघटनेचे  जिल्हाअध्यक्ष अनिल राठोड, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, यवतमाळ जिल्हा युवाध्यक्ष उदय पुंडे, जिल्हा युवा उपाध्यक्ष मोहन कळमकर, कार्याध्यक्ष गजानन गंजेवाड, तालुका अध्यक्ष मारोती गव्हाळे, उपाध्यक्ष सुनील ठाकरे, संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक हरिदास इंगोलकर,भागवत काळे, कमलाकर दुलेवाड, मैनुदिन सौदागर, गजानन वानखेडे, संजय जाधव, संदेश कांबळे, गजानन नावडे, मारोतराव रावते, कय्युम नवाब, प्रेमकुमार भारती, पंकज गोरे, वसंता नरवाडे, बाजीराव रावते संघटनेचे आदी पदाधिकारी व सदस्य बांधव उपस्थित होते.




Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...