Skip to main content

पत्रकारांवर झालेला अन्याय सहन करणार नाही - प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, उमरखेडच्या बैठकीत निर्णय

 


यवतमाळ, उमरखेड : राज्यात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मासिक बैठक उमरखेड येथे शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी पार पडली. पत्रकारांवर झालेला अन्याय सहन करणार नाही असा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,उमरखेडच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला.

 यावेळी तालुक्यातील वेगवेगळ्या सर्कल मधील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांच्या उपस्थितीमध्ये तालुका अध्यक्ष मारोती गव्हाळे यांनी पत्रकारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी संघटनेच्या कुठल्याही व्यक्तीवर जर अन्याय झाला तर कदापीही खपवून घेणार नाही. कुठल्याही प्रकारे अन्याय सहन करणार नाही. व पत्रकारांच्या मागे आपली संघटना सदैव उभी असेल असे आश्वासन दिले. संघटनेची दरमहा बैठक होत असते. व त्यामध्ये पत्रकारांच्या समस्या सोडवल्या जातात. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे नियमित पणे संघटना पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून योग्य ते मार्गदर्शन करीत असतात. या बैठकीमध्ये काही नवीन पत्रकारांना संघटनेमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी संघटनेचे  जिल्हाअध्यक्ष अनिल राठोड, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, यवतमाळ जिल्हा युवाध्यक्ष उदय पुंडे, जिल्हा युवा उपाध्यक्ष मोहन कळमकर, कार्याध्यक्ष गजानन गंजेवाड, तालुका अध्यक्ष मारोती गव्हाळे, उपाध्यक्ष सुनील ठाकरे, संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक हरिदास इंगोलकर,भागवत काळे, कमलाकर दुलेवाड, मैनुदिन सौदागर, गजानन वानखेडे, संजय जाधव, संदेश कांबळे, गजानन नावडे, मारोतराव रावते, कय्युम नवाब, प्रेमकुमार भारती, पंकज गोरे, वसंता नरवाडे, बाजीराव रावते संघटनेचे आदी पदाधिकारी व सदस्य बांधव उपस्थित होते.




Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला