Skip to main content

आश्विन पौर्णिमेला चंद्राच्या छायेत बहरली काव्य मैफिल

 



किनवट (प्रतिनिधी) :

क्रांतीसूर्य प्रतिष्ठान आयोजित आश्विन पौर्णिमे / कोजागीरी पौणिमे निमित्त तक्षशिला बुद्ध विहार विद्यानगर गोकुंदा येथे चंद्रांच्या छायेत कवि संमेलन काव्य पौर्णिमा साजरी करण्यात आली.


सांगावाकार कवी महेंद्र नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कवी संमेलनात काव्य पौर्णिमेनिमित्त स्थानिक कवींनी  बहारदार रचना सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संस्कार सचिव अनिल उमरे यांच्या राहो सुखाने हा मानव इथे या वंदन गीतेने कवी संमेलनाला सुरूवात झाली.वामनदादा कर्डक संगीत अकादमी चे संचालक प्राचार्य सुरेश पाटील यांनी वंदन गीत सादर केले.



त्यांनंतर कवी रुपेश मुनेश्वर यांनी 


" हिंसा नको कधीही कायेने वाचने

ठेवावे शुध्द आचरण बुद्धाचे सांगणे"


प्रा.सुभाष गडलिंग यांनी 

" वेळु वनात वेळु हलत आहे वाऱ्याने

शब्द थांबुन होते वेळु वनात

स्वताला मुक्तपणे उधळत 

भीरभीरत निघाले ते"

हि मर्मस्पशी रचना मांडली .




 संगीत शिक्षिका आम्रपाली वाठोरे यांनी आमृतवानी ही बुद्धाची,ऐका देऊनी ध्यान सादर केले


प्रा.एस.डी.वाठोरे यांनी

 " हळुच हलली बोधी वृक्षाची फांदी अन सुरु झाली सतयुगाची नांदी"


  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचारमंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके यांनी

" महामानव  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 

बहिष्कृत भारतान आपल्या लौकिक

इतिहासाला जपल"

हि प्रेरणादायी रचना सादर केली.


 गायिका मंगला कावळे यांनी "सुशिला,पंचशिला चला चला ग विहाराला" हि गीत रचना सादर केली


क्रांतीसूर्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष कवी रमेश मुनेश्वर यांनी "ऊर्जास्रोत बाबासाहेब व  "पौर्णिमेसम सुंदर असाव आयुष्य

पौर्णिमेसम तेजोमय व्हाव आयुष्य

उन सावली जीवनी येती नेहमी

पौर्णिमा तर कधी आमवस्या व्हाव आयुष्य" हि सुंदर काव्य रचना सादर केली.


सिमा नरवाडे यांनी आपण मस्तपैकी आनंदाच्या बीया पेरीत  जावे.. अशा एकापेक्षा एक सरस रचना सादर करुन काव्य रसिकांच्या टाळ्या मिळवल्या.


या नंतर कवी रमेश मुनेश्वर यांनी


या नंतर युवाकवी राजेश पाटील यांनी 

"धम्म हा नवा दिला तु भीवा

धम्माने ते झाले सोने नागभुमीला 

तुझ्या धम्माचा तो रथ 

आम्ही नेऊ चालवत हि गेय कविता गाऊन दाखवली"


तर कवयत्री वंदना तामगाडगे यांनी

"येथे विषमतेचे वारे चोहीकडे

दारे प्रत्येकांची आहे दुहीकडे "

हि सामाजीक रचना सादर केली






कवीसमेलनाचे अध्यक्ष कवी महेंद्र नरवाडे यांनी "हजारो वर्षाच्या वळवंटी तुझ्या भावनेला

येऊदे आता धम्मपथावर अन मिळूदे " अशा बहारदार रचनेने कवीसमेलनाचा समारोप केला.कवीसमेलनाचे बहारदार सुत्रसंचलन उत्तम कानिंदे यांनी केले तर प्रा.डा.पंजाब शेरे यांनी आभार मानले. यावेळी काव्य रसिक सखाराम घुले, पत्रकार विशाल गीमेकर,संघपाल कौठेकर, सतीश विणकरे, संघमित्रा वाघमारे, सुजाता नरवाडे, करुणा परेकार, अनिता बनसोड ,ललिता कयापाक , भागयरथा राऊत,राधाबाई दुथडे ,अक्षरा गोखले,प्रज्योत कांबळे यांच्या सह असंख्य काव्यरसिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला