किनवट (प्रतिनिधी) :
क्रांतीसूर्य प्रतिष्ठान आयोजित आश्विन पौर्णिमे / कोजागीरी पौणिमे निमित्त तक्षशिला बुद्ध विहार विद्यानगर गोकुंदा येथे चंद्रांच्या छायेत कवि संमेलन काव्य पौर्णिमा साजरी करण्यात आली.
सांगावाकार कवी महेंद्र नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कवी संमेलनात काव्य पौर्णिमेनिमित्त स्थानिक कवींनी बहारदार रचना सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संस्कार सचिव अनिल उमरे यांच्या राहो सुखाने हा मानव इथे या वंदन गीतेने कवी संमेलनाला सुरूवात झाली.वामनदादा कर्डक संगीत अकादमी चे संचालक प्राचार्य सुरेश पाटील यांनी वंदन गीत सादर केले.
त्यांनंतर कवी रुपेश मुनेश्वर यांनी
" हिंसा नको कधीही कायेने वाचने
ठेवावे शुध्द आचरण बुद्धाचे सांगणे"
प्रा.सुभाष गडलिंग यांनी
" वेळु वनात वेळु हलत आहे वाऱ्याने
शब्द थांबुन होते वेळु वनात
स्वताला मुक्तपणे उधळत
भीरभीरत निघाले ते"
हि मर्मस्पशी रचना मांडली .
संगीत शिक्षिका आम्रपाली वाठोरे यांनी आमृतवानी ही बुद्धाची,ऐका देऊनी ध्यान सादर केले
प्रा.एस.डी.वाठोरे यांनी
" हळुच हलली बोधी वृक्षाची फांदी अन सुरु झाली सतयुगाची नांदी"
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचारमंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके यांनी
" महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या
बहिष्कृत भारतान आपल्या लौकिक
इतिहासाला जपल"
हि प्रेरणादायी रचना सादर केली.
गायिका मंगला कावळे यांनी "सुशिला,पंचशिला चला चला ग विहाराला" हि गीत रचना सादर केली
क्रांतीसूर्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष कवी रमेश मुनेश्वर यांनी "ऊर्जास्रोत बाबासाहेब व "पौर्णिमेसम सुंदर असाव आयुष्य
पौर्णिमेसम तेजोमय व्हाव आयुष्य
उन सावली जीवनी येती नेहमी
पौर्णिमा तर कधी आमवस्या व्हाव आयुष्य" हि सुंदर काव्य रचना सादर केली.
सिमा नरवाडे यांनी आपण मस्तपैकी आनंदाच्या बीया पेरीत जावे.. अशा एकापेक्षा एक सरस रचना सादर करुन काव्य रसिकांच्या टाळ्या मिळवल्या.
या नंतर कवी रमेश मुनेश्वर यांनी
या नंतर युवाकवी राजेश पाटील यांनी
"धम्म हा नवा दिला तु भीवा
धम्माने ते झाले सोने नागभुमीला
तुझ्या धम्माचा तो रथ
आम्ही नेऊ चालवत हि गेय कविता गाऊन दाखवली"
तर कवयत्री वंदना तामगाडगे यांनी
"येथे विषमतेचे वारे चोहीकडे
दारे प्रत्येकांची आहे दुहीकडे "
हि सामाजीक रचना सादर केली
कवीसमेलनाचे अध्यक्ष कवी महेंद्र नरवाडे यांनी "हजारो वर्षाच्या वळवंटी तुझ्या भावनेला
येऊदे आता धम्मपथावर अन मिळूदे " अशा बहारदार रचनेने कवीसमेलनाचा समारोप केला.कवीसमेलनाचे बहारदार सुत्रसंचलन उत्तम कानिंदे यांनी केले तर प्रा.डा.पंजाब शेरे यांनी आभार मानले. यावेळी काव्य रसिक सखाराम घुले, पत्रकार विशाल गीमेकर,संघपाल कौठेकर, सतीश विणकरे, संघमित्रा वाघमारे, सुजाता नरवाडे, करुणा परेकार, अनिता बनसोड ,ललिता कयापाक , भागयरथा राऊत,राधाबाई दुथडे ,अक्षरा गोखले,प्रज्योत कांबळे यांच्या सह असंख्य काव्यरसिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment