Skip to main content

आश्विन पौर्णिमेला चंद्राच्या छायेत बहरली काव्य मैफिल

 



किनवट (प्रतिनिधी) :

क्रांतीसूर्य प्रतिष्ठान आयोजित आश्विन पौर्णिमे / कोजागीरी पौणिमे निमित्त तक्षशिला बुद्ध विहार विद्यानगर गोकुंदा येथे चंद्रांच्या छायेत कवि संमेलन काव्य पौर्णिमा साजरी करण्यात आली.


सांगावाकार कवी महेंद्र नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कवी संमेलनात काव्य पौर्णिमेनिमित्त स्थानिक कवींनी  बहारदार रचना सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संस्कार सचिव अनिल उमरे यांच्या राहो सुखाने हा मानव इथे या वंदन गीतेने कवी संमेलनाला सुरूवात झाली.वामनदादा कर्डक संगीत अकादमी चे संचालक प्राचार्य सुरेश पाटील यांनी वंदन गीत सादर केले.



त्यांनंतर कवी रुपेश मुनेश्वर यांनी 


" हिंसा नको कधीही कायेने वाचने

ठेवावे शुध्द आचरण बुद्धाचे सांगणे"


प्रा.सुभाष गडलिंग यांनी 

" वेळु वनात वेळु हलत आहे वाऱ्याने

शब्द थांबुन होते वेळु वनात

स्वताला मुक्तपणे उधळत 

भीरभीरत निघाले ते"

हि मर्मस्पशी रचना मांडली .




 संगीत शिक्षिका आम्रपाली वाठोरे यांनी आमृतवानी ही बुद्धाची,ऐका देऊनी ध्यान सादर केले


प्रा.एस.डी.वाठोरे यांनी

 " हळुच हलली बोधी वृक्षाची फांदी अन सुरु झाली सतयुगाची नांदी"


  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचारमंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके यांनी

" महामानव  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 

बहिष्कृत भारतान आपल्या लौकिक

इतिहासाला जपल"

हि प्रेरणादायी रचना सादर केली.


 गायिका मंगला कावळे यांनी "सुशिला,पंचशिला चला चला ग विहाराला" हि गीत रचना सादर केली


क्रांतीसूर्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष कवी रमेश मुनेश्वर यांनी "ऊर्जास्रोत बाबासाहेब व  "पौर्णिमेसम सुंदर असाव आयुष्य

पौर्णिमेसम तेजोमय व्हाव आयुष्य

उन सावली जीवनी येती नेहमी

पौर्णिमा तर कधी आमवस्या व्हाव आयुष्य" हि सुंदर काव्य रचना सादर केली.


सिमा नरवाडे यांनी आपण मस्तपैकी आनंदाच्या बीया पेरीत  जावे.. अशा एकापेक्षा एक सरस रचना सादर करुन काव्य रसिकांच्या टाळ्या मिळवल्या.


या नंतर कवी रमेश मुनेश्वर यांनी


या नंतर युवाकवी राजेश पाटील यांनी 

"धम्म हा नवा दिला तु भीवा

धम्माने ते झाले सोने नागभुमीला 

तुझ्या धम्माचा तो रथ 

आम्ही नेऊ चालवत हि गेय कविता गाऊन दाखवली"


तर कवयत्री वंदना तामगाडगे यांनी

"येथे विषमतेचे वारे चोहीकडे

दारे प्रत्येकांची आहे दुहीकडे "

हि सामाजीक रचना सादर केली






कवीसमेलनाचे अध्यक्ष कवी महेंद्र नरवाडे यांनी "हजारो वर्षाच्या वळवंटी तुझ्या भावनेला

येऊदे आता धम्मपथावर अन मिळूदे " अशा बहारदार रचनेने कवीसमेलनाचा समारोप केला.कवीसमेलनाचे बहारदार सुत्रसंचलन उत्तम कानिंदे यांनी केले तर प्रा.डा.पंजाब शेरे यांनी आभार मानले. यावेळी काव्य रसिक सखाराम घुले, पत्रकार विशाल गीमेकर,संघपाल कौठेकर, सतीश विणकरे, संघमित्रा वाघमारे, सुजाता नरवाडे, करुणा परेकार, अनिता बनसोड ,ललिता कयापाक , भागयरथा राऊत,राधाबाई दुथडे ,अक्षरा गोखले,प्रज्योत कांबळे यांच्या सह असंख्य काव्यरसिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.