Skip to main content

बोधडी वन परिक्षेत्रात झालेल्या विविध कामाची चौकशी करा ; सेक्युलर मुव्हमेंट ची मागणी

 


किनवट,दि..१८: बोधडी(ता.किनवट)वन परीक्षेत्रांतर्ग झालेल्या विविध कामांची चौकशी करा,अशी मागणी करणारे निवेदन "सेक्युलर मुव्हमेंट,"या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एड.मिलिंद सर्पे  यांनी  उप वनसंरक्षक,नांदेड यांना नुकतेच पाठविले आहे.

   निवेदनात नमुद केले आहे की, बोधडी(बु.)वनपरिक्षेत्रांंतर्गत सन २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षाच्या कालावधीत वनतळे,रोप लागवड,आग व गुरे प्रतिबंधक चर,दगडी पोळ व तार कुंपन ही कामे हजारो रुपये खर्च करून करण्यात आली आहेत.या कामात वनपरिक्षेत्राधिकारी,वनपाल व वनरक्षक यांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे.

   वन तळ्यांंची कामे करतांना  कांही कामे ही अर्धवट करण्यात आली आहेत,तर कांहीं वन तळ्यांची पिचिंग न करताच कागदोपत्री पिचिंग केल्याचे दर्शवून या कामांचा निधी हडप केलेला आहे.दगडी पोळाच्या काही जुन्या कामांना नवीनच केल्याचे दर्शवून त्याचा निधि हडप करण्यात आलेला आहे.आग व गुरे प्रतिबंधक चराची कामे दर्जाहीन करून या कामांचा निधी हडप करण्यात आलेला आहे.तसेच जंगलात व रोप लागवड केंद्रात प्रत्यक्षात तार कुंपन न करताच ते केल्याचे दर्शवण्यात आले आहे.तार कुंपन न केल्याने काही शेतकऱ्यांनी वन जमीनीवर अतिक्रमण केले आहे.असे असतांनाही वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांशी संगनमत करून सदरील शेत जमिनीह्या शेतकऱ्यांना सोडून देण्यात आल्या आहेत.नियतन क्षेत्र पोतरेड्डी व रामपूरमधील एन आर च्या रोपवनाला तार कुंपन न करता परस्पर निधि उचलून त्याची वाट लावली आहे.

   या सर्व कामांची उच्चस्तरीय खातेनिहाय चौकशी करून दोषींवर निलंबनाची कार्यवाही करावी व त्यांच्याकडून हडप करण्यात आलेली रक्कम वसुल करावी,अन्यथा संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व प्रसंगी सक्षम न्यायालयात दाद ही मागण्यात येईल,असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनाच्या प्रति सर्व संबंधितांना माहीतीस्तव व योग्य त्या कार्यवाहीस्तव पाठविण्यात आल्या आहेत.

   दरम्यान, याबाबत माहिती घेण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.