Skip to main content

बोधडी वन परिक्षेत्रात झालेल्या विविध कामाची चौकशी करा ; सेक्युलर मुव्हमेंट ची मागणी

 


किनवट,दि..१८: बोधडी(ता.किनवट)वन परीक्षेत्रांतर्ग झालेल्या विविध कामांची चौकशी करा,अशी मागणी करणारे निवेदन "सेक्युलर मुव्हमेंट,"या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एड.मिलिंद सर्पे  यांनी  उप वनसंरक्षक,नांदेड यांना नुकतेच पाठविले आहे.

   निवेदनात नमुद केले आहे की, बोधडी(बु.)वनपरिक्षेत्रांंतर्गत सन २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षाच्या कालावधीत वनतळे,रोप लागवड,आग व गुरे प्रतिबंधक चर,दगडी पोळ व तार कुंपन ही कामे हजारो रुपये खर्च करून करण्यात आली आहेत.या कामात वनपरिक्षेत्राधिकारी,वनपाल व वनरक्षक यांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे.

   वन तळ्यांंची कामे करतांना  कांही कामे ही अर्धवट करण्यात आली आहेत,तर कांहीं वन तळ्यांची पिचिंग न करताच कागदोपत्री पिचिंग केल्याचे दर्शवून या कामांचा निधी हडप केलेला आहे.दगडी पोळाच्या काही जुन्या कामांना नवीनच केल्याचे दर्शवून त्याचा निधि हडप करण्यात आलेला आहे.आग व गुरे प्रतिबंधक चराची कामे दर्जाहीन करून या कामांचा निधी हडप करण्यात आलेला आहे.तसेच जंगलात व रोप लागवड केंद्रात प्रत्यक्षात तार कुंपन न करताच ते केल्याचे दर्शवण्यात आले आहे.तार कुंपन न केल्याने काही शेतकऱ्यांनी वन जमीनीवर अतिक्रमण केले आहे.असे असतांनाही वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांशी संगनमत करून सदरील शेत जमिनीह्या शेतकऱ्यांना सोडून देण्यात आल्या आहेत.नियतन क्षेत्र पोतरेड्डी व रामपूरमधील एन आर च्या रोपवनाला तार कुंपन न करता परस्पर निधि उचलून त्याची वाट लावली आहे.

   या सर्व कामांची उच्चस्तरीय खातेनिहाय चौकशी करून दोषींवर निलंबनाची कार्यवाही करावी व त्यांच्याकडून हडप करण्यात आलेली रक्कम वसुल करावी,अन्यथा संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व प्रसंगी सक्षम न्यायालयात दाद ही मागण्यात येईल,असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनाच्या प्रति सर्व संबंधितांना माहीतीस्तव व योग्य त्या कार्यवाहीस्तव पाठविण्यात आल्या आहेत.

   दरम्यान, याबाबत माहिती घेण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...