Skip to main content

छत्रपती शिवराय पुतळा प्रकरणी खासदार हेमंत पाटील यांचेसह शिवसैनिकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे ; तालुका शिवसेनेच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन

 


किनवट : वसमत येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा प्रकरणी खासदार हेमंत पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिकांवर विनाकारण पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, या मागणीचे निवेदन तालुका शिवसेनेच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात रविवार (दि. 17) रोजी दिले आहे.

        बुधवार (दि. 13 ) रोजी वसमत ( जि. हिंगोली ) येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे मिरवणूक काढून शिवप्रेमी जनता व शिवसैनिकांनी मोठ्या हर्षोल्हासात शिवरायांच्या नावाचा गगनभेदी जयघोष करीत नियोजित ठिकाणी अनावरण केले. 

       छत्रपती शिवरायांप्रती तमाम जनतेत आत्यंतिक प्रेम, आदर व आगाध श्रद्धा आहे. त्यामुळे स्वतःहून मोठ्या संख्येंनी शिवप्रेमींनी सहभाग नोंदविला. परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून दबावास बळी पडून पोलीस प्रशासनाने प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या खासदारांसह आणि शेकडो शिवसैनिक व शिवप्रेमी बांधवांवर गुन्हे दाखल केले. हे निषेधार्ह व निंदनीय आहे. याबाबत जनतेचा प्रक्षोभ आहे. तेव्हा पोलिस प्रशासनाने त्वरित गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीचे निवेदन किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात दिले आहे. 

       निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील, तालुका संघटक व्यंकटराव भंडारवार, शहरप्रमुख संतोष येलचलवार, दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड, युवासेना तालुका प्रमुख प्रमोद केंद्रे, अतुल दर्शनवाड, सुरेश घुमडवार, कपिल रेड्डी, प्रमोद जाधव, शेख अजीज, शेख मोहसीन, तुकाराम मशीदवार, संतोष गीते व खासदार यांचे किनवट येथील जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...