Skip to main content

शिवभक्त, शिवसैनिकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या किंवा मला अटक करा -खासदार हेमंत पाटील यांची आक्रमक भूमिका !

 


हिंगोली : वसमत येथे १३ ऑक्टोबर  रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती अश्वारूढ पुतळ्याच्या आगमनाप्रित्यार्थ काढण्यात आलेल्या मिरवणुकी मध्ये सहभागी झालेल्या  शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शिवभक्तांवर  वसमत पोलिसांनी गुन्हे दाखल केले . याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊन  शिवभक्तांवर ,शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या,  किंवा मला अटक करा अश्या कडक  शब्दात पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला आणि थेट  हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गेटसमोर धरणे आंदोलन करून तात्काळ  गुन्हे मागे न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला . 


                  मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती अश्वारूढ पुतळा वसमत येथे १३ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात आणण्यात आला . यावेळी वसमत तालुका आणि तमाम हिंगोली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवभक्त या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते . परंतु वसमत पोलिसांनी दंडेलशाही करत मिरवणुकीमध्ये सहभागी झालेलया सर्वच शिवसेना लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि  शिवभक्तांवर खोटे गुन्हे दाखल  केल्याची वार्ता संपूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रभर पसरताचा खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊन संपूर्ण हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला आणि  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्यावर जर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही खुशाल जेलमध्ये जायला तयार होत आहोत . परंतु चुकीच्या पद्धतीने दाखल होणारे  गुन्हे कदापी खपवून घेतले जाणार नाहीत अश्या कडक शब्दात इशारा देऊन   खासदार हेमंत पाटील , आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन केले .  शिवभक्तांवर ,शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या,  किंवा मला अटक करा अशी गर्जना करून जिल्हा पोलीस प्रशासनाचा निषेध केला. 

                यावेळी खासदार हेमंत पाटील यांच्या सोबत जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर, सहसंपर्कप्रमुख डॉ रमेश शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, उपजिल्हाप्रमुख सुनिल भाऊ काळे, परमेश्वर मांडगे, उध्दवराव गायकवाड, संदेश देशमुख, तालुकाप्रमुख भानुदास जाधव, आनंदराव जगताप, अंकुश आहेर, राजु चापके, नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, रमेश दळवी, जि.प.सभापती फकीरा मुंडे, जि.प. सदस्य विठ्ठल चौतमाल, बाळासाहेब मगर, नंदकिशोर खिलारे, नगरसेवक सुभाष बांगर, राजेश इंगोले, प्रल्हाद राखोंडे, ईश्वर तांबोळी, संभाजीराव बेले, काशिनाथ भोसले, बाबा आफुने, राजु पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, दतराव लोंढे, भाई कराळे, रवी नादरे, संतोष शेळके, जसवंत काळे, धीरज कुलथे, ज्ञानेश्वर बांगर, रामप्रसाद हरबळे, व्यंकटी कऱ्हाळे, प्रमोद भुसारे, ज्ञानेश्वर भालेराव, हनुमान चव्हाण, चंदू शिंदे, ज्ञानेश्वर कदम, ज्ञानेश्वर हरबळे, पप्पू कदम, हनुमान बांगर यांच्यासह शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला