Skip to main content

भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

 


किनवट, ता.१४ : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन शहर व परिसरात आज(ता.१४)उत्साहात साजरा करण्यात आला.धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ व सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारात संपन्न झाला.डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते, तर जेतवन बुद्ध विहारात सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी गंगाधर कावळे यांच्या हस्ते पंचरंगी ध्वज वंदन झाले.दोनही ठिकाणी सामुहिक बुद्ध वंदना महेंद्र नरवाडे,सुरेश पाटील, अनिल उमरे व गंगाधर कदम यांनी घेतली.


   यावेळी रिपाइं मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक,डॉ. यु.बी.मोरे,वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष किशनराव राठोड, अखिल भारतीय बौध्द उपासक संघाचे राज्य सचिव एड.मिलिंद सर्पे, उत्तम कानिंदे,विवेक ओंकार,नितीन कावळे,एड.जी.एस.रायबोळे,संदिप निखाते,दिलिप पाटील,अंकुश भालेराव,आत्मानंद सोनकांबळे, मल्लुजी येरेकार,विजय नगराळे,नरेंद्र दोराटे,उपश्याम भगत,मंगला कावळे,प्रा.रविकांत सर्पे,गोपले सर,रा जाराम वाघमारे,सुभाष राऊत,चंद्रकांत दुधारे,माधव कावळे,सी.एन.येरेकार,डॉ. कावळे,मारोती मुनेश्वर, अनिल येरेकार,गोकुळ भवरे,विजय जोशी,रुपेश मुनेश्वर, रमेश मुनेश्वर, पोलिस निरीक्षक मारोती थोरात,एड.कांबळे,सुगत भरणे,जीवन लाठे,गोफणे,सुरेश कावळे,दिगांबर मुनेश्वर, भारत कावळे,सोनुले,दया पाटील,वसंत सर्पे, नगरसेवक श्रीनीवास नेम्मानीवार,नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ ता. अ. आशिष शेळके,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ ता. उपाध्यक्ष राजेश पाटील , प्रसिद्धी प्रमुख विशाल गिमेकार, राईज ॲकडमीचे लक्ष्मीकांत कापसे, आकाश आळणे,एड.दिव्या  पाटील,प्रा.सुबोध सर्पे, एड.सम्राट सर्पे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

   याप्रसंगी पोलिस निरिक्षकपदी बढती मिळाल्याबद्दल यशोधरा मुनेश्वर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला