किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)
उत्तर प्रदेश येथील लखिंपुर येथे शेतकऱ्यांना स्वतःच्या गाडीने चिरडून मृत व जखमी करण्यात आले होते त्या घटनेतील मुख्य आरोपी आशीष मिश्रा यांच्यावर खटला चालून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होत असून मागणीच्या समर्थनार्थ महाराष्ट्र महा विकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिनांक 11/10/2021 रोजी देण्यात आली त्याचे पडसाद किनवट मध्ये उमटले असून शहरांमध्ये शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड , काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी व मा क पा चे जनार्दन काळे यांनी व्यापाऱ्यांना बंद पाळण्यासाठी व बंद मध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान केले होते व्यापाऱ्यांनी या बंदला मात्र तेवढा प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून आले परिसरातील गोकुंदा ग्रामपंचायत पूर्णता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ व आरोपी आशिष मिश्रा यांच्या विरोधात व्यापाऱ्यांनी 100% बंद पाळून सिद्ध केले यावेळी किनवट मध्ये शिवसेना ,राष्ट्रवादी, काँग्रेस व डी वाय फा य च्या कार्यकर्त्यांनी शहरात फिरून व्यापारी प्रतिष्ठाने बंद पाळण्यात यावे यासाठी परिश्रम घेतले
Comments
Post a Comment