Skip to main content

शक्यतोवर गावातील तंटे तंटामुक्त समितितच मिटवा: न्यायमूर्ती एस.बी.अंभोरे

 



किनवट,दि.१० : कुणाचे चांगले नाही करता आले तर,किमान  कुणाचे वाईटही करु नका. वाद करुच नका ,वाद झाल्यास तो गावच्या तंटामुक्त समितित मिटवा.भांडणात मजा नाही.भांडण झाल्यास मध्यस्तामार्फत मिटवून घ्या.संगत करतांना चांगल्या माणसाची संगत करा,असे आवाहन न्यायमूर्ती एस.बी.अंभोरे यांनी केले.

   तालुका विधी सेवा समिती व अभिवक्ता संघाच्या वतीने आझादी का अम्रत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत रविवारी (ता.१०) मांडवा (कि.)ता.किनवट)येथे सकाळी साडे दहा वाजता न्यायमूर्ती एस.बी.अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम पंचायत प्रांगणात कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

   यावेळी तालुका विधी सेवा समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, समितीच्या सदस्या एड.दिव्या पाटील,एड.शामिले,अभिवक्ता संघाचे सचिव एड.पंकज गावंडे,माजी उपाध्यक्ष एड.एम.यु.सर्पे यांनी विविध कायद्यांची तोंड ओळख करून दिली.

प्रास्ताविक विधी सेवा समितीचे सदस्य एड.दिलिप काळे यांनी केले.सूत्रसंचालन विठ्ठल चिठ्ठेवार यांनी केले,तर अभार प्रदर्शन प्रशासक एस.के तिरमनवार यांनी केले.


   कार्यक्रमास सहाय्यक गट विकास अधिकारी डी.बी.राठोड,अभिवक्ता संघाचे कोषाध्यक्ष एड.सुनिल येरेकार,एड.उदय चव्हाण, एड.दिलिप कोट्टावार,एड.रुपेश पुरुषोत्तमवार,श्री.मिसलवार व प्रा.सुबोध सर्पे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  यावेळी न्यायालयीन कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह महीला व पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...