Skip to main content

अनुसुचित जाती , जमाती स्माशन भुमी प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना ऑल इंडिया पँथरचे निवेदन

 


नांदेड नेटवर्क: 

नांदेड जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमाती चा स्मशान भुमिचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांना ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी माळशिरस तालुक्यातील प्रकरण व पांगरी हदगाव तालुक्यातील प्रकरण असे अनुचित प्रकार घडत असताना ते घडू नये यासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमाती चे स्मशानभूमीचे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने प्रत्येक गावात जागेचा प्रश्न असेल अशा ठिकाणी भूमी अधिग्रहण करून व स्मशानभूमीची जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी स्मशानभूमी बांधकाम व संरक्षक भिंत बांधून  जागा निश्चित करून ते प्रश्न सोडवण्यात यावे.यामागणीसाठी चे निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले आहे .जर यासमोर असा प्रश्न निर्माण झाला तर अंत्यविधी आपल्या कार्यालयासमोर करण्याचा पवित्रा घेतला जाईल असे आशयाचे पत्र देण्यात आले आहे.

 यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे , युवा जिल्हाध्यक्ष सुरेश सावते, नांदेड तालुकाध्यक्ष सतीश हिंगोले, लोहा तालुका प्रवक्ते प्रदीप वाघमारे, ता.उपाध्यक्ष नांदेड आनंद पाटील, साहेबराव सरोदे शहराध्यक्ष अर्धापुर, नागेश हिंगोले, स्वप्नील हिंगोले व आदी जण उपस्थित होते.


अधिक माहिती साठी संपर्क करा:



Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...