Skip to main content

२ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती दिनी ग्रामरोजगार सेवकांचे एक दिवसीय उपोषण

 

 
बापुराव वावळे/किनवट प्रतिनिधी:-

.      गटविकास अधिकारी साहेब यांना दिले निवेदन.महाराष्ट्र ग्रामरोजगार सेवक संघटना किनवट तालुका कमिटीच्या वतीने महात्मा गांधी जयंती दिनी ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्या संदर्भात प़्ंचायत समिती किनवट समोर एक दिवसीय उपोषण करण्यात येत असल्याचे निवेदन तालुका संघटनेच्या वतीने माननीय गटविकास अधिकारी साहेब किनवट यांना देण्यात आले आहे.



महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2005अंतर्गत स्थरावर रोजगार हमी योजनेचे काम करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची ग्रामसभेत निवड करण्यात आलेली आहे.

ग्रामरोजगार सेवकांची पुर्णवेळ समर्पित नियुक्ती करण्यात यायला पाहिजे होती, परंतु महाराष्ट्र सरकारने 2 मे 2011रोजी शासन निर्णय काढून ग्रामरोजगार सेवकांना अर्धवेळ बाह्स्त कर्मचारी म्हणून नियुक्त करून कामाच्या आधारावर 2.25%ते4.50% 6%पर्यंय तुटपुंज्या मानधनावर काम करण्यासाठी भाग पाडले आहे.महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना कोणत्याही प्रकारचे टिए,डिए, देण्यात येत नाहीत.मनरेगा अंतर्गत काम करणारे मजूर पुर्णवेळ, पण त्या मजुरांवर दिवसभर लक्ष देवून काम करून घेणारे ग्रामरोजगार सेवक मात्र अर्धवेळ, बाह्स्त कर्मचारी.

रोजगार हमी योजनेचा जनक असलेल्या राज्यात काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवक यांच्या वर अन्याय सुरू आहे.

सहा सहा महिने तुटपुंजे मानधनही पदरी पडत नाही.प्रवास भत्याचा पत्ता नाही, लागणारी सामग्री कुठे अडकली याचा बेत नाही.स्वतंत्र कक्ष उभे करण्याचे नियोजन हवेतच उडाले अशा एक ना अनेक अडचणी असुन त्यास अनखिन भर म्हणून स्थानिक पातळीवर चे राजकारण,मग काम करावे तरी कसे, या व इतर मागण्या संदर्भात महात्मा गांधी जयंती दिनी महाराष्ट्रभर आंदोलन होत असुन त्या अनुषंगाने किनवट येते ही आंदोलन होणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी उपस्थित,किनवट तालुका ग्राम रोजगार सेवक संघटना अध्यक्ष मा.गेमसिंग जाधव,मधुकर गवले, बापूराव वावळे, राहुल पाटिल, पुंडलिक घुगे, नामदेव सावरकर,ज्ञानेश्वर मुंडे,अरूण राठोड,मनोज केंद्रे, बालाजी राठोड,किरण राठोड, संजय राठोड,राम जाधव, साहेबराव दार्लावार, अशोक जाधव तालुका किनवट ग्रामरोजगार सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला