Skip to main content

२ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती दिनी ग्रामरोजगार सेवकांचे एक दिवसीय उपोषण

 

 
बापुराव वावळे/किनवट प्रतिनिधी:-

.      गटविकास अधिकारी साहेब यांना दिले निवेदन.महाराष्ट्र ग्रामरोजगार सेवक संघटना किनवट तालुका कमिटीच्या वतीने महात्मा गांधी जयंती दिनी ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्या संदर्भात प़्ंचायत समिती किनवट समोर एक दिवसीय उपोषण करण्यात येत असल्याचे निवेदन तालुका संघटनेच्या वतीने माननीय गटविकास अधिकारी साहेब किनवट यांना देण्यात आले आहे.



महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2005अंतर्गत स्थरावर रोजगार हमी योजनेचे काम करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची ग्रामसभेत निवड करण्यात आलेली आहे.

ग्रामरोजगार सेवकांची पुर्णवेळ समर्पित नियुक्ती करण्यात यायला पाहिजे होती, परंतु महाराष्ट्र सरकारने 2 मे 2011रोजी शासन निर्णय काढून ग्रामरोजगार सेवकांना अर्धवेळ बाह्स्त कर्मचारी म्हणून नियुक्त करून कामाच्या आधारावर 2.25%ते4.50% 6%पर्यंय तुटपुंज्या मानधनावर काम करण्यासाठी भाग पाडले आहे.महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना कोणत्याही प्रकारचे टिए,डिए, देण्यात येत नाहीत.मनरेगा अंतर्गत काम करणारे मजूर पुर्णवेळ, पण त्या मजुरांवर दिवसभर लक्ष देवून काम करून घेणारे ग्रामरोजगार सेवक मात्र अर्धवेळ, बाह्स्त कर्मचारी.

रोजगार हमी योजनेचा जनक असलेल्या राज्यात काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवक यांच्या वर अन्याय सुरू आहे.

सहा सहा महिने तुटपुंजे मानधनही पदरी पडत नाही.प्रवास भत्याचा पत्ता नाही, लागणारी सामग्री कुठे अडकली याचा बेत नाही.स्वतंत्र कक्ष उभे करण्याचे नियोजन हवेतच उडाले अशा एक ना अनेक अडचणी असुन त्यास अनखिन भर म्हणून स्थानिक पातळीवर चे राजकारण,मग काम करावे तरी कसे, या व इतर मागण्या संदर्भात महात्मा गांधी जयंती दिनी महाराष्ट्रभर आंदोलन होत असुन त्या अनुषंगाने किनवट येते ही आंदोलन होणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी उपस्थित,किनवट तालुका ग्राम रोजगार सेवक संघटना अध्यक्ष मा.गेमसिंग जाधव,मधुकर गवले, बापूराव वावळे, राहुल पाटिल, पुंडलिक घुगे, नामदेव सावरकर,ज्ञानेश्वर मुंडे,अरूण राठोड,मनोज केंद्रे, बालाजी राठोड,किरण राठोड, संजय राठोड,राम जाधव, साहेबराव दार्लावार, अशोक जाधव तालुका किनवट ग्रामरोजगार सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...