Skip to main content

गोदावरी अर्बनचे अध्यक्ष राजश्री पाटील मराठवाडारत्न पुरस्काराने सन्मानित



नांदेड: गोदावरी अर्बनने पाच राज्यासह  मराठवड्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट व भरीव  कामगिरी केल्याबद्दल लोकशाही मराठी वृत्तवाहिनीच्या वतीने संस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांना मराठवाडारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्याचे वितरण हॉटेल रामा इंटरनॅशनल, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. याप्रसंगी राज्याचे आरोग्य मंत्री अंकुशराव टोपे, ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री बाबनराव लोणीकर, लोकशाही वृत्तवाहिनेचे संचालक धृमित नायडू, अभिनेता मंगेश देसाई आदी मान्यवरांची उपस्थित होते.

          गोदावरी अर्बनची स्थापना २०१३ साली झाली आहे. एकीकडे राज्यातील सहकार क्षेत्राला मरगळ आली असतांना या क्षेत्राला अवघ्या ८ वर्षाच्या कालावधीत राज्यासह इतर पाच राज्यात झळाळी देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. हजारो महिला बचतगटांना अर्थसाक्षरता प्रशिक्षण, लघुउद्योजक नव तरुणांना आर्थिक मदत, व्यवसायिक प्रशिक्षण, बाजारपेठेचे मार्गदर्शन देऊन स्वतःच्या पायांवर उभं करण्याच काम केलं आहे. संस्था उभरणीच्या पहिल्या दिवसापासून संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा दंडक घातला होता. ग्राहकांना सेवा देण्यासाठी ज्या अत्याधुनिक सुविधा नव्याने आल्या आहेत त्या सर्वप्रथम गोदावरी अर्बन त्याचा अवलंब करते व त्याचे प्रशिक्षण आपल्या सर्व शाखेतील कर्मचाऱ्यांना दिले जाते. या सर्व कार्याची दखल घेत लोकशाही वृत्तवाहीनेच्या वतीने गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांना मराठवाडारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या पुरस्कारा बद्दल राजश्री पाटील यांनी गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत लोकशाही वृत्तवाहिनेचे संचालक धृमित नायडू यांचे आभार मानले. हा पुरस्कार मिळाल्याबदल गोदावरी अर्बनचे उपाध्यक्ष हेमलता देसले व्यवस्थापकिय संचालक धनंजय तांबेकर व समूहातील समस्त संचालक पदाधिकारी, कर्मचारी  तसेच विविध सामाजिक व राजकीय मान्यवरांनी आनंद व्यक्त करीत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...