Skip to main content

गोदावरी अर्बनचे अध्यक्ष राजश्री पाटील मराठवाडारत्न पुरस्काराने सन्मानित



नांदेड: गोदावरी अर्बनने पाच राज्यासह  मराठवड्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट व भरीव  कामगिरी केल्याबद्दल लोकशाही मराठी वृत्तवाहिनीच्या वतीने संस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांना मराठवाडारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्याचे वितरण हॉटेल रामा इंटरनॅशनल, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. याप्रसंगी राज्याचे आरोग्य मंत्री अंकुशराव टोपे, ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री बाबनराव लोणीकर, लोकशाही वृत्तवाहिनेचे संचालक धृमित नायडू, अभिनेता मंगेश देसाई आदी मान्यवरांची उपस्थित होते.

          गोदावरी अर्बनची स्थापना २०१३ साली झाली आहे. एकीकडे राज्यातील सहकार क्षेत्राला मरगळ आली असतांना या क्षेत्राला अवघ्या ८ वर्षाच्या कालावधीत राज्यासह इतर पाच राज्यात झळाळी देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. हजारो महिला बचतगटांना अर्थसाक्षरता प्रशिक्षण, लघुउद्योजक नव तरुणांना आर्थिक मदत, व्यवसायिक प्रशिक्षण, बाजारपेठेचे मार्गदर्शन देऊन स्वतःच्या पायांवर उभं करण्याच काम केलं आहे. संस्था उभरणीच्या पहिल्या दिवसापासून संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा दंडक घातला होता. ग्राहकांना सेवा देण्यासाठी ज्या अत्याधुनिक सुविधा नव्याने आल्या आहेत त्या सर्वप्रथम गोदावरी अर्बन त्याचा अवलंब करते व त्याचे प्रशिक्षण आपल्या सर्व शाखेतील कर्मचाऱ्यांना दिले जाते. या सर्व कार्याची दखल घेत लोकशाही वृत्तवाहीनेच्या वतीने गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांना मराठवाडारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या पुरस्कारा बद्दल राजश्री पाटील यांनी गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत लोकशाही वृत्तवाहिनेचे संचालक धृमित नायडू यांचे आभार मानले. हा पुरस्कार मिळाल्याबदल गोदावरी अर्बनचे उपाध्यक्ष हेमलता देसले व्यवस्थापकिय संचालक धनंजय तांबेकर व समूहातील समस्त संचालक पदाधिकारी, कर्मचारी  तसेच विविध सामाजिक व राजकीय मान्यवरांनी आनंद व्यक्त करीत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...