Skip to main content

गोदावरी अर्बनचे अध्यक्ष राजश्री पाटील मराठवाडारत्न पुरस्काराने सन्मानित



नांदेड: गोदावरी अर्बनने पाच राज्यासह  मराठवड्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट व भरीव  कामगिरी केल्याबद्दल लोकशाही मराठी वृत्तवाहिनीच्या वतीने संस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांना मराठवाडारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्याचे वितरण हॉटेल रामा इंटरनॅशनल, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. याप्रसंगी राज्याचे आरोग्य मंत्री अंकुशराव टोपे, ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री बाबनराव लोणीकर, लोकशाही वृत्तवाहिनेचे संचालक धृमित नायडू, अभिनेता मंगेश देसाई आदी मान्यवरांची उपस्थित होते.

          गोदावरी अर्बनची स्थापना २०१३ साली झाली आहे. एकीकडे राज्यातील सहकार क्षेत्राला मरगळ आली असतांना या क्षेत्राला अवघ्या ८ वर्षाच्या कालावधीत राज्यासह इतर पाच राज्यात झळाळी देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. हजारो महिला बचतगटांना अर्थसाक्षरता प्रशिक्षण, लघुउद्योजक नव तरुणांना आर्थिक मदत, व्यवसायिक प्रशिक्षण, बाजारपेठेचे मार्गदर्शन देऊन स्वतःच्या पायांवर उभं करण्याच काम केलं आहे. संस्था उभरणीच्या पहिल्या दिवसापासून संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा दंडक घातला होता. ग्राहकांना सेवा देण्यासाठी ज्या अत्याधुनिक सुविधा नव्याने आल्या आहेत त्या सर्वप्रथम गोदावरी अर्बन त्याचा अवलंब करते व त्याचे प्रशिक्षण आपल्या सर्व शाखेतील कर्मचाऱ्यांना दिले जाते. या सर्व कार्याची दखल घेत लोकशाही वृत्तवाहीनेच्या वतीने गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांना मराठवाडारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या पुरस्कारा बद्दल राजश्री पाटील यांनी गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत लोकशाही वृत्तवाहिनेचे संचालक धृमित नायडू यांचे आभार मानले. हा पुरस्कार मिळाल्याबदल गोदावरी अर्बनचे उपाध्यक्ष हेमलता देसले व्यवस्थापकिय संचालक धनंजय तांबेकर व समूहातील समस्त संचालक पदाधिकारी, कर्मचारी  तसेच विविध सामाजिक व राजकीय मान्यवरांनी आनंद व्यक्त करीत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.