Skip to main content

भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा(उत्तर) शाखेच्या नुतन कार्यकारिणी मध्ये किनवटचे तालुका सरचिटणीस महेंद्र नरवाडे यांची उपाध्यक्ष (पर्यटन व प्रचार)पदी निवड

 




किनवट प्रतिनिधी लक्ष्मीकांत दुथडे:-  भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड (उत्तर) च्या नुतन कार्यकारिणीची राष्ट्रीय महासचिव आद.जगदिश गवई, मुंबई, राष्ट्रीय सचिव बी.एच.गायकवाड, मुंबई, यांच्या प्रमुख उपस्थितीत तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे, मुंबई, राज्य सरचिटणीस सुशिल वाघमारे, विभागीय सचिव दैवशाला गायकवाड, विभागीय सचिव संबोधी सोनकांबळे, प्रभाकर नांदेडकर यांच्या तर्फे नुकतीच निवड करण्यात आली असुन या नुतन कार्यकारीणीमध्ये किनवटचे तालुका सरचिटणीस, कवी,लेखक सेवानिवृत्त पर्यवेक्षक महेंद्र नरवाडे यांच्या धम्मकार्याची दखल घेऊन धम्मसंस्था नेतृत्वाने त्यांची जिल्हा शाखा नांदेड (उत्तर) कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष (पर्यटन व प्रचार) पदी दि.१९-९-२०२१ रोजी संपन्न झालेल्या जिल्हा बैठकित निवड करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचे किनवट तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, जिल्हा संघटक माधवराव सर्पे, जितेंद्र भवरे, सुरेश पाटील, रमेश मुनेश्वर, राजेश पाटील,परमेश्वर सुर्वे,रुपेश मुनेश्वर  डॉ.बुध्दरत्न भवरे,प्रा.डा.पंजाब शेरे,विजय भगत, अशोक वाठोरे,भारत वाठोरे, प्रवीण वाठोरे,राहुल वाठोरे,विजय वाठोरे,धम्मपाल दुथडे, प्रमोद सोनुले, नागसेन सोनुले, सिद्धार्थ खंदारे, राजकुमार कवडे, अनिल वाठोरे,आदिनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...