Skip to main content

"पौर्णिमेसम सुंदर असाव आयुष्य पौर्णिमेसम तेजोमय व्हाव आयुष्य उन सावली जीवनी येती नेहमी पौर्णिमा तर कधी आमवस्या व्हाव आयुष्य"........ क्रांतिसुर्य प्रतिष्ठान तर्फे आयोजित काव्यपौर्णीमा कवी संमेलन पार पडले




✍राजेश पाटील

शहर बातमीदार किनवट :- सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारात क्रांतिसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक पौर्णिमा काव्य पौर्णिमा या उपक्रमा अंतर्गत भाद्रपद पौर्णिमेच्या पुर्व संध्येला कवि संमेलन आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. गजानन सोनोने होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रवीकांत सर्पे, (सांगावाकार ) महेंद्र नरवाडे हे मंचावर उपस्थित होते तर सहभागी कवी म्हणून कवी रुपेश मुनेश्वर, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक रमेश मुनेश्वर,प्रा. गजानन सोनोने, राजेश पाटील आदी कवी मान्यवर उपस्थित होते कवि संमेलनाच्या प्रारंभी धम्म वंदना घेण्यात आली तद नंतर महेंद्र नरवाडे यांची भारतीय बौद्ध महासभा  उत्तर( पर्यटन व प्रचार) नांदेड शाखा मध्ये उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला व प्रा. रवीकांत सर्पे यांनी पौर्णिमे बद्दल विवेचन केले व कवि संमेलनास शुभेच्छा दिल्या

सुरवातीस सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी 

"हजारो वर्षाच्या रुक्ष वाळवंटी तुझ्या भावनेला 

येऊ दे आता धम्म पथावर 

अन मिळु दे बुद्ध प्रकाश त्याच्या अपार श्रद्धा बलाने कर नष्ट गडध अंधार"

हि सामाजिक रचना सादर केली .


या नंतर रुपेश मुनेश्वर यांनी

" हिंसा नको कधीही कायेने वाचेने

ठेवावे शुध्द आचरण बुद्धाचे सांगणे

निंदा नको कुणाशी 

व्यभिचार लेक हि गेय रचना सादर केली


या नंतर कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. गजानन सोनोने यांनी 

" गातो मी गाणे निळ्या नभाचे 

आहे तराणे नव्या दमाचे 

स्वातंत्र्य समता हि बंधुता

जाणुन घ्याहो मोल तयाचे हि संविधान महत्व विशद करणारी रचना सादर केली.

या नंतर कवी रमेश मुनेश्वर यांनी


"पौर्णिमेसम सुंदर असाव आयुष्य

पौर्णिमेसम तेजोमय व्हाव आयुष्य

उन सावली जीवनी येती नेहमी

पौर्णिमा तर कधी आमवस्या व्हाव आयुष्य......"

हि मनाला भावनारी व पोर्णीमेचे महत्व सांगणारी रचना प्रस्तुत केली.


या नंतर युवा कवी राजेश पाटील यांनी

"पेटली पेटली हि भीमाची लेखणी

पेटली पेटली हि वामनाची लेखणी

अन्यायावर वार तु कर

वंचीताची तु बन ललकार 

वंचीताची तु बन तलवार हि क्रांतिकारी रचना सादर केली


 कवी संमेलनाचे सुत्र संचालन उत्तम कानिंदे यांनी केले तसेच

या काव्य पोर्णीमेस युवक,बाल बालीका व विशाखा महिला मंडळाच्या महिला उपस्थित होत्या.








Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.