"पौर्णिमेसम सुंदर असाव आयुष्य पौर्णिमेसम तेजोमय व्हाव आयुष्य उन सावली जीवनी येती नेहमी पौर्णिमा तर कधी आमवस्या व्हाव आयुष्य"........ क्रांतिसुर्य प्रतिष्ठान तर्फे आयोजित काव्यपौर्णीमा कवी संमेलन पार पडले
✍राजेश पाटील
शहर बातमीदार किनवट :- सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारात क्रांतिसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक पौर्णिमा काव्य पौर्णिमा या उपक्रमा अंतर्गत भाद्रपद पौर्णिमेच्या पुर्व संध्येला कवि संमेलन आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. गजानन सोनोने होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रवीकांत सर्पे, (सांगावाकार ) महेंद्र नरवाडे हे मंचावर उपस्थित होते तर सहभागी कवी म्हणून कवी रुपेश मुनेश्वर, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक रमेश मुनेश्वर,प्रा. गजानन सोनोने, राजेश पाटील आदी कवी मान्यवर उपस्थित होते कवि संमेलनाच्या प्रारंभी धम्म वंदना घेण्यात आली तद नंतर महेंद्र नरवाडे यांची भारतीय बौद्ध महासभा उत्तर( पर्यटन व प्रचार) नांदेड शाखा मध्ये उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला व प्रा. रवीकांत सर्पे यांनी पौर्णिमे बद्दल विवेचन केले व कवि संमेलनास शुभेच्छा दिल्या
सुरवातीस सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी
"हजारो वर्षाच्या रुक्ष वाळवंटी तुझ्या भावनेला
येऊ दे आता धम्म पथावर
अन मिळु दे बुद्ध प्रकाश त्याच्या अपार श्रद्धा बलाने कर नष्ट गडध अंधार"
हि सामाजिक रचना सादर केली .
या नंतर रुपेश मुनेश्वर यांनी
" हिंसा नको कधीही कायेने वाचेने
ठेवावे शुध्द आचरण बुद्धाचे सांगणे
निंदा नको कुणाशी
व्यभिचार लेक हि गेय रचना सादर केली
या नंतर कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. गजानन सोनोने यांनी
" गातो मी गाणे निळ्या नभाचे
आहे तराणे नव्या दमाचे
स्वातंत्र्य समता हि बंधुता
जाणुन घ्याहो मोल तयाचे हि संविधान महत्व विशद करणारी रचना सादर केली.
या नंतर कवी रमेश मुनेश्वर यांनी
"पौर्णिमेसम सुंदर असाव आयुष्य
पौर्णिमेसम तेजोमय व्हाव आयुष्य
उन सावली जीवनी येती नेहमी
पौर्णिमा तर कधी आमवस्या व्हाव आयुष्य......"
हि मनाला भावनारी व पोर्णीमेचे महत्व सांगणारी रचना प्रस्तुत केली.
या नंतर युवा कवी राजेश पाटील यांनी
"पेटली पेटली हि भीमाची लेखणी
पेटली पेटली हि वामनाची लेखणी
अन्यायावर वार तु कर
वंचीताची तु बन ललकार
वंचीताची तु बन तलवार हि क्रांतिकारी रचना सादर केली
कवी संमेलनाचे सुत्र संचालन उत्तम कानिंदे यांनी केले तसेच
या काव्य पोर्णीमेस युवक,बाल बालीका व विशाखा महिला मंडळाच्या महिला उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment