Skip to main content

"पौर्णिमेसम सुंदर असाव आयुष्य पौर्णिमेसम तेजोमय व्हाव आयुष्य उन सावली जीवनी येती नेहमी पौर्णिमा तर कधी आमवस्या व्हाव आयुष्य"........ क्रांतिसुर्य प्रतिष्ठान तर्फे आयोजित काव्यपौर्णीमा कवी संमेलन पार पडले




✍राजेश पाटील

शहर बातमीदार किनवट :- सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारात क्रांतिसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक पौर्णिमा काव्य पौर्णिमा या उपक्रमा अंतर्गत भाद्रपद पौर्णिमेच्या पुर्व संध्येला कवि संमेलन आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. गजानन सोनोने होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रवीकांत सर्पे, (सांगावाकार ) महेंद्र नरवाडे हे मंचावर उपस्थित होते तर सहभागी कवी म्हणून कवी रुपेश मुनेश्वर, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक रमेश मुनेश्वर,प्रा. गजानन सोनोने, राजेश पाटील आदी कवी मान्यवर उपस्थित होते कवि संमेलनाच्या प्रारंभी धम्म वंदना घेण्यात आली तद नंतर महेंद्र नरवाडे यांची भारतीय बौद्ध महासभा  उत्तर( पर्यटन व प्रचार) नांदेड शाखा मध्ये उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला व प्रा. रवीकांत सर्पे यांनी पौर्णिमे बद्दल विवेचन केले व कवि संमेलनास शुभेच्छा दिल्या

सुरवातीस सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी 

"हजारो वर्षाच्या रुक्ष वाळवंटी तुझ्या भावनेला 

येऊ दे आता धम्म पथावर 

अन मिळु दे बुद्ध प्रकाश त्याच्या अपार श्रद्धा बलाने कर नष्ट गडध अंधार"

हि सामाजिक रचना सादर केली .


या नंतर रुपेश मुनेश्वर यांनी

" हिंसा नको कधीही कायेने वाचेने

ठेवावे शुध्द आचरण बुद्धाचे सांगणे

निंदा नको कुणाशी 

व्यभिचार लेक हि गेय रचना सादर केली


या नंतर कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. गजानन सोनोने यांनी 

" गातो मी गाणे निळ्या नभाचे 

आहे तराणे नव्या दमाचे 

स्वातंत्र्य समता हि बंधुता

जाणुन घ्याहो मोल तयाचे हि संविधान महत्व विशद करणारी रचना सादर केली.

या नंतर कवी रमेश मुनेश्वर यांनी


"पौर्णिमेसम सुंदर असाव आयुष्य

पौर्णिमेसम तेजोमय व्हाव आयुष्य

उन सावली जीवनी येती नेहमी

पौर्णिमा तर कधी आमवस्या व्हाव आयुष्य......"

हि मनाला भावनारी व पोर्णीमेचे महत्व सांगणारी रचना प्रस्तुत केली.


या नंतर युवा कवी राजेश पाटील यांनी

"पेटली पेटली हि भीमाची लेखणी

पेटली पेटली हि वामनाची लेखणी

अन्यायावर वार तु कर

वंचीताची तु बन ललकार 

वंचीताची तु बन तलवार हि क्रांतिकारी रचना सादर केली


 कवी संमेलनाचे सुत्र संचालन उत्तम कानिंदे यांनी केले तसेच

या काव्य पोर्णीमेस युवक,बाल बालीका व विशाखा महिला मंडळाच्या महिला उपस्थित होत्या.








Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला