Skip to main content

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील पीकविम्याची रक्कम अदा करण्याची मागणी - खासदार हेमंत पाटील यांनी घेतली कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट

 


किनवट/माहूर: पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत  हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शेतकरी पिकविम्यापासून वंचित असून अद्यापही त्यांना अनुदान प्राप्त झाले नसून मतदारसंघात येणाऱ्या हिंगोली. नांदेड, आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम अदा करण्यात यावी  अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री  दादाजी भुसे यांची भेट घेऊन केली आहे. 

        गतवर्षीच्या खरीप हंगामात हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या हदगाव, हिमायतनगर , किनवट , माहूर , हिंगोली, सेनगाव,कळमनुरी, औंढा , वसमत तर उमरखेड,महागाव तालुक्यातील शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी झाले होते परंतु काही  मोजक्याच शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला होता तर अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहिले होते . यामध्ये हिंगोली जिल्ह्यातून ३ लाख ३ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा  भरला असताना त्यापैकी केवळ १ लाख  ७५ हजार शेतकऱ्यांना ९९ कोटी ५२ लाख रुपये पीकविमा परतावा मंजूर करण्यात आला. त्यापैकी १ लाख ४९ हजार शेतकऱ्यांना परताव्याची ८६ कोटी २५ लाख रुपये एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे . परंतू राज्य शासनाच्या  हिस्स्याचे अनुदान प्राप्त न झालयामुळे २६ हजार  लाभार्थी शेतकऱ्यांचे १३ कोटी ६७ लाख रुपये परताव्याच्या रकमेचे वाटप शिल्लक आहे . तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील  हदगाव,  हिमायतनगर तालुक्यातील एकूण १ लाख १४ हजार ८४५ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता त्यापैकी १४ हजार ५९९ शेतकऱ्यांना ८ कोटी ७२ लाख रुपये मंजूर झाले आहेत    आणि किनवट , माहूर तालुक्यातील एकूण ३० हजार ३१६ शेतकऱ्यांनी खरीप २०२० करिता पीकविमा भरला होता त्यापैकी ३ हजार ९८१  शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला आणि त्यांना २ कोटी ८ लाख ३८ हजार रुपये एवढी रक्कम पीकविमा परताव्यापोटी रक्कम अदा करण्यात आली होती तसेच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील एकूण ३९ हजार ६४५  शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता तर त्यापैकी ४ हजार ६९० शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करण्यात आला आणि त्यांना पिकविम्याची ४ कोटी ७५ लाख एवढी रक्कम अदा करण्यात आली. उमरखेड तालुक्यातील  एकूण 43 हजार 529 शेतकर्यांानी पिकविमा भरला होता त्यापैकी 7 हजार 665  शेतकर्यां ना 4 कोटी 81 लाख रुपये एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे . तर ज्या शेतकऱ्यांना अद्यापही परतावा मिळाला नसल्याने याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन हिंगोली  लोकसभा मतदारसंघातील पिकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून देण्याबाबत मागणी केली आहे . हिंगोली लोकसभा क्षेत्रात मागील बर्याच दिवसापासून अतिवृष्टी  झाल्यामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले आहे . त्याबाबत तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याबाबत चर्चा केली .

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...