Skip to main content

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील पीकविम्याची रक्कम अदा करण्याची मागणी - खासदार हेमंत पाटील यांनी घेतली कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट

 


किनवट/माहूर: पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत  हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शेतकरी पिकविम्यापासून वंचित असून अद्यापही त्यांना अनुदान प्राप्त झाले नसून मतदारसंघात येणाऱ्या हिंगोली. नांदेड, आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम अदा करण्यात यावी  अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री  दादाजी भुसे यांची भेट घेऊन केली आहे. 

        गतवर्षीच्या खरीप हंगामात हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या हदगाव, हिमायतनगर , किनवट , माहूर , हिंगोली, सेनगाव,कळमनुरी, औंढा , वसमत तर उमरखेड,महागाव तालुक्यातील शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी झाले होते परंतु काही  मोजक्याच शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला होता तर अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहिले होते . यामध्ये हिंगोली जिल्ह्यातून ३ लाख ३ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा  भरला असताना त्यापैकी केवळ १ लाख  ७५ हजार शेतकऱ्यांना ९९ कोटी ५२ लाख रुपये पीकविमा परतावा मंजूर करण्यात आला. त्यापैकी १ लाख ४९ हजार शेतकऱ्यांना परताव्याची ८६ कोटी २५ लाख रुपये एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे . परंतू राज्य शासनाच्या  हिस्स्याचे अनुदान प्राप्त न झालयामुळे २६ हजार  लाभार्थी शेतकऱ्यांचे १३ कोटी ६७ लाख रुपये परताव्याच्या रकमेचे वाटप शिल्लक आहे . तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील  हदगाव,  हिमायतनगर तालुक्यातील एकूण १ लाख १४ हजार ८४५ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता त्यापैकी १४ हजार ५९९ शेतकऱ्यांना ८ कोटी ७२ लाख रुपये मंजूर झाले आहेत    आणि किनवट , माहूर तालुक्यातील एकूण ३० हजार ३१६ शेतकऱ्यांनी खरीप २०२० करिता पीकविमा भरला होता त्यापैकी ३ हजार ९८१  शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला आणि त्यांना २ कोटी ८ लाख ३८ हजार रुपये एवढी रक्कम पीकविमा परताव्यापोटी रक्कम अदा करण्यात आली होती तसेच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील एकूण ३९ हजार ६४५  शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता तर त्यापैकी ४ हजार ६९० शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करण्यात आला आणि त्यांना पिकविम्याची ४ कोटी ७५ लाख एवढी रक्कम अदा करण्यात आली. उमरखेड तालुक्यातील  एकूण 43 हजार 529 शेतकर्यांानी पिकविमा भरला होता त्यापैकी 7 हजार 665  शेतकर्यां ना 4 कोटी 81 लाख रुपये एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे . तर ज्या शेतकऱ्यांना अद्यापही परतावा मिळाला नसल्याने याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन हिंगोली  लोकसभा मतदारसंघातील पिकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून देण्याबाबत मागणी केली आहे . हिंगोली लोकसभा क्षेत्रात मागील बर्याच दिवसापासून अतिवृष्टी  झाल्यामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले आहे . त्याबाबत तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याबाबत चर्चा केली .

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.