Skip to main content

नगर सेवक तथा भाजपा शहराध्यक्ष नेम्मनिवार यांचा नगर परिषद प्रशासनाला ३० सप्टेंबर पर्यंत अल्टीमेटम ढिसाळ कारभारात सुधारणा झाली नाही



 किनवट ता.प्र दि २३ किनवट नगर परिषदेमुळे शहरातील नागरीकांना भेडसावना-या समस्यां मुळे शहरातील लोकप्रतिनिधी देखिल त्रस्त झाले आहेत यामुळे वार्ड क्रमांक २ चे भाजप नगरसेवक व शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांनी शहरातील नागरीकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने एक निवेदन नगर परिषद प्रशासनास दिले होते त्यानुसार नगर परिषद प्रशासनात कोणताही बदल न झाल्याने काल दिनांक २२ सप्टेंबर रोजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व नगरपरिषद कर्मचारी यांच्या बैठक संपन्न झाली असुन यामध्ये नगरसेवक श्रीनिवास नेम्मानिवार यांनी कर्मचा-यांना त्यांनी सादर केलेल्या १७ मुद्द्यानुसार काय कारवाई केली अशी विचारणा केल्या नंतर त्यांच्या प्रश्नास नगरपरिषद कर्मचारी हे निरुत्तर होते यामुळे प्रशासनावर प्रचंड रोष व्यक्त करत श्रीनिवास नेम्मानिवार यांनी कर्मचा-यांना येत्या सोमवार पर्यंतची मुदत दिली असुन त्यांनंतर सविस्तर अहवाल तयार करुन नगर परिषद कर्मचारी व अधिका-यांवर कायदेशिर कारवाई करण्याच्या दृष्टीन मा.जिल्हाधिकारी नांदेड यांच्या दालणात रितसर तक्रार दाखल करुन या निष्क्रीय कर्मचा-यां विरुध्द कडक कारवाई करण्याकरिता वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे यावेळी श्रीनिवास नेम्मानिवार यांनी बैठकीत उपस्थित कर्मचारी व अधिका-यांना चेतावले आहे.

 तरी मागील निवेदनात श्रीनिवास नेम्मानिवार यांनी नगर परिषद अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत सतत गैरहजर राहतात, लोकप्रतिनिधी व नागरीकांच्या कार्यालयीन कामात होणारी दिरंगाई, शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न, मोकात जनावरामुळे होणारे अपघात, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परीसरातील अतिक्रमण व त्यामुळे होणारी वाहतुक कोंडी, भाजीपाला मार्केट व आठवडी बाजारातील अतिक्रमण व अस्वच्छता, साई नगर गार्ड्न व इस्लामपुरा सभामंडप यांचे व्यवस्थापन करण्यात होत असलेली दिरंगाई व त्यामुळे उत्पन्न होत असलेले वाद विवाद, एल.ई.डी व सौर पथदिवे लावुन सुध्दा विज बिलात कपात का झाली नाही ? हा ही प्रश्न उपस्थित होतो, घनकचरा व्यवस्थापनाची निविदा रखडल्याने शहरात माजलेली अस्वच्छता, नगर परिषदेत कार्यालयात दिव्यांगांची होत असलेली हेळसांड, नगर परिषदेच्या आरक्षित जमिनी भुसंपादन करुन व त्याचा मोबदला देऊन सुध्दा सातबारा च्या नोंदी नाहीत तर काहीचे दस्त नोंदनी देखिल केली नाही व ते करण्यास प्रशासन उदासिन या व अशा विविध समस्यांना करिता श्रीनिवास नेम्मानिवार हे नगर परिषद प्रशासना विरुध्द आक्रमक भुमिका घेत आहेत. त्यांनी अधिकारी व कर्मचा-यांना ३० सप्टेंबर पर्यंत चे अल्टीमेटम दिले आहे. ज्यामध्ये कर्मचा-यांनी वरिल मुद्द्यांच्या अनुषंगाने कारवाई करावी अन्यथा किनवट शहरातील नागरीकांचे असुविधेमुळे बेहाल करणे व नगर परिषदेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या दृषीने बेजबाबदार पणा दाखवणे या साठी कठोर कारवाई करण्यासाठी कर्मचा-यां विरुद्द मा.जिल्हाधिकारी यांच्या दालणात तक्रार करणार असल्याचे नेम्मानिवार यांनी यावेळी सांगितले.

 आता नगर परिषद प्रशासन याकडे कोणत्या दृष्टीने पाहते व यावर काय कारवाई करते याकडे शहरातील सर्व सुज्ञ नागरीकांचे लक्ष लागले आहे कारण सन २०१७ निवडणुकीत मोठ्या आशेने या पदाधिका-यांना शहरातील नागरीकांनी निवडुन दिले आहे. यात एक दोन वगळता कोणतेही पदाधिकारी काही ठोस भुमिका मांडु शकले नसल्याने शहरातील नागरीकांचा यामुळे यांच्याकडुन मोठा हिरमोड झाला आहे. यात काही विवादित प्रकरणे व एकदोन घटणा या शहरातील नागरीकांच्या जिव्हारी लागल्या आहेत.




Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...