किनवट:-
शेतकऱ्यांवर थोपणाऱ्या केंद्राच्या तीन कृषी विधेयक विरोधात संयुक्त किसान मोर्चाने दि.२७ रोजी भारत बंदचे आवाहन केले होते त्याच पार्श्वभुमीवर किनवट येथे किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान सभा काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, रिव्होलशनरी सो. पा. विविध पक्षाच्या वतीने पाठींबा दर्शवला आहे जिजामाता चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते .
या करीता भारतभर शेतकरी संघटना एकवटल्या आहेत अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन आडे यांच्या नेतृत्वाखाली किनवट शहरात बंदचे आवाहन करत फेरी काढण्यात आली यात काँग्रेसचे नगरसेवक अभय महाजन , वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष किशनराव राठोड, काँग्रेस सेवा फाँऊडेशन नांदेड जिल्हा सचिव फारुक चव्हाण आदी या फेरीत सहभागी झाले होते .
Comments
Post a Comment