Skip to main content

किनवट येथील लोकअदालतीत १५६ प्रकरणे सामंजस्याने निकाली निघाले

 



किनवट  : तालुका विधीसेवा प्राधिकरण व वकील संघाच्या वतीने शनिवारी (ता.२५)  किनवट न्यायालयात आयोजिलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेले ३ दिवाणी ,१४ फौजदारी खटले व विविध बँकेचे १३९ दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण १५६  प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली आहेत. किनवट,मांडवी,उमरी,बोधडी,इस्लापुर येथील विविध बँकेच्या दाखलपूर्व १३९ प्रकरणामध्ये एकूण ६९ लाख ६९ हजार ९४६ रुपयांच्या रकमेवर तडजोड झाली. अनेक प्रकरणे  निकाली निघाल्याने न्यायालयावरील कामाचा ताणही कमी झाला असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.आजच्या लोकअदालतीत इरफाना  व शाहरूख शेख यांचा विस्कटलेला संसार जुळविण्यात आला या जोडीचा किनवट वकील संघाच्या वतीने साडीचोळी व पुष्प हार देऊन सत्कार करण्यात आला


     कोरोना नियमांचे पालन करून किनवट येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.  यासाठी दोन पॅनल करण्यात येऊन एका पॅनलचे प्रमुख म्हणून विधीसेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधिश एस.बी. अंभोरे तर पॅनल सदस्य म्हणून अ‍ॅड.राहुल सोनकांबळे व के. मूर्ती यांनी काम पाहिले. दुसर्‍या पॅनलवर प्रमुख म्हणून सह.दिवाणी न्यायाधिश व्ही.जी. परवरे आणि सदस्य म्हणून अ‍ॅड.दिव्या पाटील व प्रा.डॉ. सुनील व्यवहारे यांनी काम पाहिले.                                    यावेळी अ‍ॅड.अनंत वैद्य, अ‍ॅड.शंकर राठोड, अ‍ॅड.अरविंद चव्हाण,    ऍड के जी काझी,ऍड यु बी चव्हाण,ऍड दिलीप काळे,अ‍ॅड.आकाश कोमरवार, अ‍ॅड. पंजाब गावंडे, अ‍ॅड.सुनील शिरपुरे, अ‍ॅड.उदय चव्हाण,ऍड जी एस रायबोळे, ऍड दिलीप कोत्तावार,अ‍ॅड.टी एच कुरेशी,ऍड एस एन नेमानिवार, ऍड मिलिंद सर्पे, अ‍ॅड. एन यु मुनेश्वर, अ‍ॅड. टी.आर. चव्हाण, अ‍ॅड के के मुनेश्वर, अ‍ॅड.एस एस ताजने, अ‍ॅड. आकाश कोमेरवार,अ‍ॅड.के.एस.काजी,ऍड पी पी गावंडे, ऍड रुपेश पुरुषोत्तमवार,स्टेट बँक ऑफ इंडिया चे भूषण वेताळ,     अनुराग भसमे, निती,संतोष चौधरी, संतोष मेश्राम, विनोद झोडे, संतोष ताडपेल्लीवार, नितिन वानखेडे, पंखुडी शिंदे,शैलेश आढाव,सुब्रत बेहरा,महाराष्ट्र ग्रामीण बँक चे रुपेश दलाल, अमोल चांदेकर, उपदेश मेश्राम व राहुल बंडूळे या विविध बँकेच्या अधिकार्‍यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय लोकअदालतीच्या यशस्वितेसाठी वर्षा बोलेनवार, एल.वाय. मिसलवार, बी ए घुले, एस एम चिटमलवार, जी.डी. सोनटक्के,शाम कुलकर्णी,अ मुझिब, ए एस  धोटे, शेख मगदुम, आर एस माने, केंद्रे, नीलवर्ण, कावळे, बारसे, सूर्यवंशी, के.व्ही. आडे, शेख बाबू, तेलंग, शेख शौकत, गौतम जोंधळे,  या  न्यायालयीन कर्मचार्‍यांनी पोलीस विभागाचे सहायक निरीक्षक वाठोरे,नबाब पठाण,सुभाष दोनकलवार ,शिवनंदा रायलवार व पवार परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला