Skip to main content

किनवट येथील लोकअदालतीत १५६ प्रकरणे सामंजस्याने निकाली निघाले

 



किनवट  : तालुका विधीसेवा प्राधिकरण व वकील संघाच्या वतीने शनिवारी (ता.२५)  किनवट न्यायालयात आयोजिलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेले ३ दिवाणी ,१४ फौजदारी खटले व विविध बँकेचे १३९ दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण १५६  प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली आहेत. किनवट,मांडवी,उमरी,बोधडी,इस्लापुर येथील विविध बँकेच्या दाखलपूर्व १३९ प्रकरणामध्ये एकूण ६९ लाख ६९ हजार ९४६ रुपयांच्या रकमेवर तडजोड झाली. अनेक प्रकरणे  निकाली निघाल्याने न्यायालयावरील कामाचा ताणही कमी झाला असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.आजच्या लोकअदालतीत इरफाना  व शाहरूख शेख यांचा विस्कटलेला संसार जुळविण्यात आला या जोडीचा किनवट वकील संघाच्या वतीने साडीचोळी व पुष्प हार देऊन सत्कार करण्यात आला


     कोरोना नियमांचे पालन करून किनवट येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.  यासाठी दोन पॅनल करण्यात येऊन एका पॅनलचे प्रमुख म्हणून विधीसेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधिश एस.बी. अंभोरे तर पॅनल सदस्य म्हणून अ‍ॅड.राहुल सोनकांबळे व के. मूर्ती यांनी काम पाहिले. दुसर्‍या पॅनलवर प्रमुख म्हणून सह.दिवाणी न्यायाधिश व्ही.जी. परवरे आणि सदस्य म्हणून अ‍ॅड.दिव्या पाटील व प्रा.डॉ. सुनील व्यवहारे यांनी काम पाहिले.                                    यावेळी अ‍ॅड.अनंत वैद्य, अ‍ॅड.शंकर राठोड, अ‍ॅड.अरविंद चव्हाण,    ऍड के जी काझी,ऍड यु बी चव्हाण,ऍड दिलीप काळे,अ‍ॅड.आकाश कोमरवार, अ‍ॅड. पंजाब गावंडे, अ‍ॅड.सुनील शिरपुरे, अ‍ॅड.उदय चव्हाण,ऍड जी एस रायबोळे, ऍड दिलीप कोत्तावार,अ‍ॅड.टी एच कुरेशी,ऍड एस एन नेमानिवार, ऍड मिलिंद सर्पे, अ‍ॅड. एन यु मुनेश्वर, अ‍ॅड. टी.आर. चव्हाण, अ‍ॅड के के मुनेश्वर, अ‍ॅड.एस एस ताजने, अ‍ॅड. आकाश कोमेरवार,अ‍ॅड.के.एस.काजी,ऍड पी पी गावंडे, ऍड रुपेश पुरुषोत्तमवार,स्टेट बँक ऑफ इंडिया चे भूषण वेताळ,     अनुराग भसमे, निती,संतोष चौधरी, संतोष मेश्राम, विनोद झोडे, संतोष ताडपेल्लीवार, नितिन वानखेडे, पंखुडी शिंदे,शैलेश आढाव,सुब्रत बेहरा,महाराष्ट्र ग्रामीण बँक चे रुपेश दलाल, अमोल चांदेकर, उपदेश मेश्राम व राहुल बंडूळे या विविध बँकेच्या अधिकार्‍यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय लोकअदालतीच्या यशस्वितेसाठी वर्षा बोलेनवार, एल.वाय. मिसलवार, बी ए घुले, एस एम चिटमलवार, जी.डी. सोनटक्के,शाम कुलकर्णी,अ मुझिब, ए एस  धोटे, शेख मगदुम, आर एस माने, केंद्रे, नीलवर्ण, कावळे, बारसे, सूर्यवंशी, के.व्ही. आडे, शेख बाबू, तेलंग, शेख शौकत, गौतम जोंधळे,  या  न्यायालयीन कर्मचार्‍यांनी पोलीस विभागाचे सहायक निरीक्षक वाठोरे,नबाब पठाण,सुभाष दोनकलवार ,शिवनंदा रायलवार व पवार परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...