Skip to main content

मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी यांची त्वरीत सुटका करावी - राजेंद्र शेळके.

 



किनवट : जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करत असल्याच्या आरोपाखाली मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी यांना राज्याच्या अंतकवाद विरोधी पथकाने (ए. टी. एस.) जबरदस्तीने ताब्यात घेतले असून त्यांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी साहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना दिले आहे.

          राजेंद्र शेळके यांनी निवेदन मध्ये म्हटले आहे की, मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी यांना राज्याच्या अंतकवाद विरोधी पथकाने जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करत असल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशातील मेरठ येथे चौकशीसाठी ताब्यात घेतले. कलीम सिध्दीकी यांच्यासह अन्य ४ सहकाऱ्यांना देखील ए. टी. एस. ने चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेतले असून परंतु अद्याप ही त्यांची सुटका केली नाही किंवा यांच्या अटकेबाबत केंद्र सरकार अथवा पोलिस यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. मुस्लिम धर्मगुरूंना अटक केल्याबाबत केंद्र सरकार व ए.टी.एस. च्या या मुस्लिमविरोधी कार्यवाही चा आम्ही जाहीर निषेध करतो असे या निवेदनात म्हटले आहे.

          पत्रकारांशी बोलताना राजेंद्र शेळके म्हणाले की, भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे तसेच धार्मिक प्रबोधन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. असे असताना देखील सरकार केवळ मुस्लिम समाजाच्या प्रमुख व्यक्ती विरोधात तपास यंत्रणा लावुन भितीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी ही अशाच पद्धतीने मुस्लिम समाजाच्या दोन धर्मगुरूंना धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली ताब्यात घेण्यात आले होते. राज्यात धार्मिक व जातीय सलोखा कायम राखण्यासाठी मुस्लिम समाज नेहमीच पुढाकार घेत असतो. परंतु राज्याची पोलिस यंत्रणा केवळ मुस्लिम समाजातील धर्मगुरूंना चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेऊन मुस्लिम समाजावर एक प्रकारे अन्याय करत आहे.

         मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी हे मुस्लिम धर्मप्रचारक असुन ते समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करतात. त्याचा व अंतकवादी कार्यवाह्यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही. त्यामुळे शासनाने मौलाना कलीम सिध्दीकी व त्यांच्या साथीदारांची निर्दोष त्वरीत सुटका करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असे वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र शेळके म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला