Skip to main content

मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी यांची त्वरीत सुटका करावी - राजेंद्र शेळके.

 



किनवट : जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करत असल्याच्या आरोपाखाली मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी यांना राज्याच्या अंतकवाद विरोधी पथकाने (ए. टी. एस.) जबरदस्तीने ताब्यात घेतले असून त्यांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी साहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना दिले आहे.

          राजेंद्र शेळके यांनी निवेदन मध्ये म्हटले आहे की, मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी यांना राज्याच्या अंतकवाद विरोधी पथकाने जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करत असल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशातील मेरठ येथे चौकशीसाठी ताब्यात घेतले. कलीम सिध्दीकी यांच्यासह अन्य ४ सहकाऱ्यांना देखील ए. टी. एस. ने चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेतले असून परंतु अद्याप ही त्यांची सुटका केली नाही किंवा यांच्या अटकेबाबत केंद्र सरकार अथवा पोलिस यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. मुस्लिम धर्मगुरूंना अटक केल्याबाबत केंद्र सरकार व ए.टी.एस. च्या या मुस्लिमविरोधी कार्यवाही चा आम्ही जाहीर निषेध करतो असे या निवेदनात म्हटले आहे.

          पत्रकारांशी बोलताना राजेंद्र शेळके म्हणाले की, भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे तसेच धार्मिक प्रबोधन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. असे असताना देखील सरकार केवळ मुस्लिम समाजाच्या प्रमुख व्यक्ती विरोधात तपास यंत्रणा लावुन भितीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी ही अशाच पद्धतीने मुस्लिम समाजाच्या दोन धर्मगुरूंना धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली ताब्यात घेण्यात आले होते. राज्यात धार्मिक व जातीय सलोखा कायम राखण्यासाठी मुस्लिम समाज नेहमीच पुढाकार घेत असतो. परंतु राज्याची पोलिस यंत्रणा केवळ मुस्लिम समाजातील धर्मगुरूंना चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेऊन मुस्लिम समाजावर एक प्रकारे अन्याय करत आहे.

         मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी हे मुस्लिम धर्मप्रचारक असुन ते समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करतात. त्याचा व अंतकवादी कार्यवाह्यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही. त्यामुळे शासनाने मौलाना कलीम सिध्दीकी व त्यांच्या साथीदारांची निर्दोष त्वरीत सुटका करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असे वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र शेळके म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...