Skip to main content

मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी यांची त्वरीत सुटका करावी - राजेंद्र शेळके.

 



किनवट : जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करत असल्याच्या आरोपाखाली मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी यांना राज्याच्या अंतकवाद विरोधी पथकाने (ए. टी. एस.) जबरदस्तीने ताब्यात घेतले असून त्यांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी साहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना दिले आहे.

          राजेंद्र शेळके यांनी निवेदन मध्ये म्हटले आहे की, मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी यांना राज्याच्या अंतकवाद विरोधी पथकाने जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करत असल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशातील मेरठ येथे चौकशीसाठी ताब्यात घेतले. कलीम सिध्दीकी यांच्यासह अन्य ४ सहकाऱ्यांना देखील ए. टी. एस. ने चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेतले असून परंतु अद्याप ही त्यांची सुटका केली नाही किंवा यांच्या अटकेबाबत केंद्र सरकार अथवा पोलिस यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. मुस्लिम धर्मगुरूंना अटक केल्याबाबत केंद्र सरकार व ए.टी.एस. च्या या मुस्लिमविरोधी कार्यवाही चा आम्ही जाहीर निषेध करतो असे या निवेदनात म्हटले आहे.

          पत्रकारांशी बोलताना राजेंद्र शेळके म्हणाले की, भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे तसेच धार्मिक प्रबोधन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. असे असताना देखील सरकार केवळ मुस्लिम समाजाच्या प्रमुख व्यक्ती विरोधात तपास यंत्रणा लावुन भितीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी ही अशाच पद्धतीने मुस्लिम समाजाच्या दोन धर्मगुरूंना धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली ताब्यात घेण्यात आले होते. राज्यात धार्मिक व जातीय सलोखा कायम राखण्यासाठी मुस्लिम समाज नेहमीच पुढाकार घेत असतो. परंतु राज्याची पोलिस यंत्रणा केवळ मुस्लिम समाजातील धर्मगुरूंना चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेऊन मुस्लिम समाजावर एक प्रकारे अन्याय करत आहे.

         मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी हे मुस्लिम धर्मप्रचारक असुन ते समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करतात. त्याचा व अंतकवादी कार्यवाह्यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही. त्यामुळे शासनाने मौलाना कलीम सिध्दीकी व त्यांच्या साथीदारांची निर्दोष त्वरीत सुटका करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असे वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र शेळके म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...