Skip to main content

गुरुजनांनी घडवलेला एकलव्य


पाठी वरच्या कण्यावरती हात ठेवून फक्त लढ म्हणा........!

कॉलेजमध्ये शेवटच्या दिवशी ही कविता म्हणून कॉलेजला निरोप दिला होता. निरोप देताना असे वाटले होते कि आता इथे पुन्हा येणे नाही.....!


आज कॉलेज सोडून सात वर्ष पूर्ण झालेत, पण ह्या सात वर्षा मध्ये माझ्या  गुरुजनाचा हात पाठीवरून क्षणा साठी पण सरकला असे आठवत नाही. गुरु व शिष्या चे नाते हे एका पदवी पर्यंत मर्यादित नाही तर ते अजन्म निभावायचं वचन आहे असे 

मानणारे सरस्वती विद्या मंदिर कॉलेज चे प्राध्यापक यांचा हात विध्यार्थी वर्गाच्या पाठीवर नेहमीच असतो.


दिनांक 17/09/2021 रोजी पदवी प्रदान कार्यक्रमात माझे मित्र प्रा. राम आत्राम यांचा सत्कार करण्यात आला. त्याने इंग्लिश विषयामध्ये SET परीक्षा उत्तीर्ण केली आहे. एक ग्रामीण भागातील आदिवासी तरुण स्वतःच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न घेऊन संघर्षमय परिस्थितीत Dr बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ कॅम्पस येथे इंग्लिश विषयात शिक्षण घेऊन आपले मिरीट आपल्या गुणवत्ते ने सिद्ध करतो हे कर्तृत्व अभिमानास्पदच......................आहे.


ज्या ठिकाणी इंग्लिश विषयाची भीती आहे व ग्रामीण शिक्षनाची दुर्व्यस्था आहे त्या ठिकाणी हे संघर्ष करण्याचे बळ गुरुजणांच्या प्रेरणेने व त्याच्या पाठीवरच्या हाताने मिळाले. त्यांनी त्याच्या विध्यार्थीचा कणा कधी मोडू दिला नाही. हाच  एकलव्य आज गुरु -शिष्य परंपरेत आपले पात्र बदलून गुरु होत आहे. संघर्ष हा कधी संपत नसतो, पण मन निवांत असते,जेव्हा ज्ञानाच्या जोरावर उभा राहणारा व खडतळ मार्गक्रम करणारा पराक्रमी एकलव्य असेल.

तेच बळ तुला मिळो 

✍ॲड. सचिन भिमराव दारवंडे

किनवट/ औरंगाबाद

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...