पाठी वरच्या कण्यावरती हात ठेवून फक्त लढ म्हणा........!
कॉलेजमध्ये शेवटच्या दिवशी ही कविता म्हणून कॉलेजला निरोप दिला होता. निरोप देताना असे वाटले होते कि आता इथे पुन्हा येणे नाही.....!
आज कॉलेज सोडून सात वर्ष पूर्ण झालेत, पण ह्या सात वर्षा मध्ये माझ्या गुरुजनाचा हात पाठीवरून क्षणा साठी पण सरकला असे आठवत नाही. गुरु व शिष्या चे नाते हे एका पदवी पर्यंत मर्यादित नाही तर ते अजन्म निभावायचं वचन आहे असे
मानणारे सरस्वती विद्या मंदिर कॉलेज चे प्राध्यापक यांचा हात विध्यार्थी वर्गाच्या पाठीवर नेहमीच असतो.
दिनांक 17/09/2021 रोजी पदवी प्रदान कार्यक्रमात माझे मित्र प्रा. राम आत्राम यांचा सत्कार करण्यात आला. त्याने इंग्लिश विषयामध्ये SET परीक्षा उत्तीर्ण केली आहे. एक ग्रामीण भागातील आदिवासी तरुण स्वतःच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न घेऊन संघर्षमय परिस्थितीत Dr बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ कॅम्पस येथे इंग्लिश विषयात शिक्षण घेऊन आपले मिरीट आपल्या गुणवत्ते ने सिद्ध करतो हे कर्तृत्व अभिमानास्पदच......................आहे.
ज्या ठिकाणी इंग्लिश विषयाची भीती आहे व ग्रामीण शिक्षनाची दुर्व्यस्था आहे त्या ठिकाणी हे संघर्ष करण्याचे बळ गुरुजणांच्या प्रेरणेने व त्याच्या पाठीवरच्या हाताने मिळाले. त्यांनी त्याच्या विध्यार्थीचा कणा कधी मोडू दिला नाही. हाच एकलव्य आज गुरु -शिष्य परंपरेत आपले पात्र बदलून गुरु होत आहे. संघर्ष हा कधी संपत नसतो, पण मन निवांत असते,जेव्हा ज्ञानाच्या जोरावर उभा राहणारा व खडतळ मार्गक्रम करणारा पराक्रमी एकलव्य असेल.
तेच बळ तुला मिळो
✍ॲड. सचिन भिमराव दारवंडे
किनवट/ औरंगाबाद
Comments
Post a Comment