Skip to main content

जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य च्या किनवट तालुका अध्यक्ष पदी आशिष शेळके यांची नियुक्ती.

 


किनवट : जनतेच्या हितासाठी, शासनाचा कारभार पारदर्शक व्हावा, भ्रष्टाचार उघडकीस यावा हा एकमेव उद्देश ठेवून, पुर्ण महाराष्ट्र भर कार्यरत असणारी व भ्रष्टाचारी लोकांना सळो की पळो करून सोडणारी महाराष्ट्रात अग्रेसर असणारी एकमेव समिती म्हणजेच जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य च्या किनवट तालुका अध्यक्ष पदी आशिष शेळके यांची निवड करण्यात आली आहे.

          आशिष शेळके हे पत्रकार आहेत, निर्भिड व भ्रष्टाचार विरोधी पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या पत्रकार संघटनेचे किनवट तालुका अध्यक्ष आहेत, यांनी पत्रकार सेवा संघ या संघटनेच्या आधारे विविध शासकीय कार्यालय व दावाखाने यांना भेटी दिल्या, तेथील उणिवा, तसेच कर्मचाऱ्यांची गैरहजेरी, तसेच जनतेला होणारा त्रास, यांबद्दल आवाज उठवला. त्यांचे हे सर्व कार्य पाहून तसेच, यांचे पत्रकारी क्षेत्रातले लिखाण व यांच्या अन्याय विरोधी आणि भ्रष्ट कर्मचारी व भ्रष्टचार विरोधातील बातम्या पाहुन जनता माहिती अधिकार समिती च्या पदाधिकार्यांनी आशिष शेळके यांच्या राहत्या घरी भेट देऊन शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी आशिष शेळके यांना समितीचे नियुक्ती पत्र देऊन किनवट तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.

          आशिष शेळके यांची नियुक्ती समितीचे संस्थापक अध्यक्ष बि. बि. हिंगोले यांच्या आदेशावरून आणि समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्षा, वैशालीताई गुंजरगे (हिंगोले), शंकरसिंह ठाकुर (मराठवाडा अध्यक्ष) व मारोती शिकारे (मराठवाडा उपाध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत व यांच्या हस्ते पुष्पहार आणि पुष्पगुच्छ व नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

          नियुक्ती नंतर आशिष शेळके पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, ही समिती पुर्ण महाराष्ट्रभर भ्रष्टाचार व अन्याय विरुद्ध लढणारी समिती म्हणुन ओळखली जाते, या समितीने माझ्या कामावर विश्र्वास ठेवून माझ्यावर ही जिम्मेदारी सोपवली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम समितीचे आभार मानतो व मी नक्कीच किनवट तालुक्यातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांना सळो की पळो करून सोडणार आहे एवढं सांगतो.

          आशिष शेळके यांच्या नियुक्तीने सर्वच स्तरातून यांचे शब्दसुमनाने स्वागत होत आहे. तर किनवट तालुक्यातील जे भ्रष्ट कर्मचारी आहेत त्यांना चांगलीच धास्ती भरली आहे असे सामान्य जनतेतून ऐकण्यास मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.