Skip to main content

जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य च्या किनवट तालुका अध्यक्ष पदी आशिष शेळके यांची नियुक्ती.

 


किनवट : जनतेच्या हितासाठी, शासनाचा कारभार पारदर्शक व्हावा, भ्रष्टाचार उघडकीस यावा हा एकमेव उद्देश ठेवून, पुर्ण महाराष्ट्र भर कार्यरत असणारी व भ्रष्टाचारी लोकांना सळो की पळो करून सोडणारी महाराष्ट्रात अग्रेसर असणारी एकमेव समिती म्हणजेच जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य च्या किनवट तालुका अध्यक्ष पदी आशिष शेळके यांची निवड करण्यात आली आहे.

          आशिष शेळके हे पत्रकार आहेत, निर्भिड व भ्रष्टाचार विरोधी पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या पत्रकार संघटनेचे किनवट तालुका अध्यक्ष आहेत, यांनी पत्रकार सेवा संघ या संघटनेच्या आधारे विविध शासकीय कार्यालय व दावाखाने यांना भेटी दिल्या, तेथील उणिवा, तसेच कर्मचाऱ्यांची गैरहजेरी, तसेच जनतेला होणारा त्रास, यांबद्दल आवाज उठवला. त्यांचे हे सर्व कार्य पाहून तसेच, यांचे पत्रकारी क्षेत्रातले लिखाण व यांच्या अन्याय विरोधी आणि भ्रष्ट कर्मचारी व भ्रष्टचार विरोधातील बातम्या पाहुन जनता माहिती अधिकार समिती च्या पदाधिकार्यांनी आशिष शेळके यांच्या राहत्या घरी भेट देऊन शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी आशिष शेळके यांना समितीचे नियुक्ती पत्र देऊन किनवट तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.

          आशिष शेळके यांची नियुक्ती समितीचे संस्थापक अध्यक्ष बि. बि. हिंगोले यांच्या आदेशावरून आणि समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्षा, वैशालीताई गुंजरगे (हिंगोले), शंकरसिंह ठाकुर (मराठवाडा अध्यक्ष) व मारोती शिकारे (मराठवाडा उपाध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत व यांच्या हस्ते पुष्पहार आणि पुष्पगुच्छ व नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

          नियुक्ती नंतर आशिष शेळके पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, ही समिती पुर्ण महाराष्ट्रभर भ्रष्टाचार व अन्याय विरुद्ध लढणारी समिती म्हणुन ओळखली जाते, या समितीने माझ्या कामावर विश्र्वास ठेवून माझ्यावर ही जिम्मेदारी सोपवली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम समितीचे आभार मानतो व मी नक्कीच किनवट तालुक्यातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांना सळो की पळो करून सोडणार आहे एवढं सांगतो.

          आशिष शेळके यांच्या नियुक्तीने सर्वच स्तरातून यांचे शब्दसुमनाने स्वागत होत आहे. तर किनवट तालुक्यातील जे भ्रष्ट कर्मचारी आहेत त्यांना चांगलीच धास्ती भरली आहे असे सामान्य जनतेतून ऐकण्यास मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...