Skip to main content

०७ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिनाची सुट्टी जाहीर करा.... जितेंन्द्र अ . कुलसंगे



तालुका प्रतिनिधी ः- 

संपुर्ण विश्वातील आदिवासीना एकत्रित  आणुन सर्वांगीण विकासाचे सन्मार्ग शोधण्याच्या हेतूने गठित संयुक्त राष्ट्रसंघाने दि. 23 डिसेंबर 1994 च्या बैठकी मध्ये 49/214 च्या ठरावानुसार दरवर्षी 9 आगस्ट हा दिवस विश्व आदिवासी दिवस म्हणुन साजरा करण्या बाबत सर्वानुमते घोषित केले आहे. तेंव्हा पासुन विश्व आदिवासी दिवस हा संपुर्ण भारतभर आदिवासी जमातीकडून मोठ्या उत्सहाने दि. 9आगस्ट रोजी प्रत्येक वर्षी साजरा केला जातो.महाराष्ट्र या राज्यात ही हा दिवस अतिशय जल्लोषात व मोठ्या उत्साहात प्रचंड प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी संपुर्ण आदिवासी जमाती एकत्र येतात आणि सांस्कृतिक ठेवा प्रकट करत महामानवाला व दैवताला अन निसर्गाला वंदन करतात.या दिवसाचे औचित्य साधून आनंदात नृत्य व वेशभुषा व्यक्त करत सांस्कृतिक अस्मिता जपतात.संविधानिक हक्क अधिकार , शिक्षण आरोग्य अशा विषयावर विचार मांडतात.

        नुकतेच राजस्थान सरकारने  विश्व आदिवासी दिवस 9 आगस्ट 2020 रोजी या दिवसाची सार्वजनिक सुट्टी घोषित करून तेथील आदिवासी जमातीच्या जन भावनेला न्याय दिले आहे. राजस्थान सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा विश्व आदिवासी दिवस कोविड 19 चे नियम पाळून मोठ्या उत्सहाने सर्व स्तरावर साजरा करण्यासाठी या दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करून राज्यांतील सुमारे 10% लोकसंख्या असलेल्या आदिवासी समाजाला न्याय द्यावे.

            अशा आशयाचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्या मार्फत  भाजपा आदिवासी मोर्चा नांदेड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र कुलसंगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठविले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला