Skip to main content

खासदार हेमंत पाटील यांचे केंद्रीय रस्ते- वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची महामार्गाचे काम जलद गतीने करण्यासंदर्भात घेतली भेट

 



✍🏻 राजेश पाटील

किनवट शहर प्रतिनिधी : हिंगोली, किनवट, उमरखेड, हदगाव, कळमनुरी, वसमत, या हिंगोली लोकसभा मतदारसंघा अंतर्गत राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या खूपच संथ गतीने सुरु आहे.  त्यामुळे या मार्गावर अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत . संथ गतीने सुरु असलेली कामे जलद गतीने पुर्ण  करण्या संदर्भात महामार्गाचे व संबंधित कंपनीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांना काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय  रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे . 



                                नागपूर-बोरी -तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रीट करणाचे काम सुरु आहे . परंतु या महामार्गावर हिंगोली लोकसभा मतदारसंघात महागाव ते नांदेड दरम्यान खूपच संथ गतीने काम चालू आहे . त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत अनेकांना  आपले प्राण गमवावे लागले आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही काहीच कार्यवाही करण्यात येत नाही याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन अशी मागणी केली आहे कि, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि काम करणाऱ्या संबंधित कंपनीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावून हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांना  देण्यात यावेत . तसेच  हिंगोली लोकसभा मतदारसांघातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातून जाणाऱ्या किनवट- हिमायतनगर-भोकर फाटा -आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत- परभणी पर्यंत जाणाऱ्या महामार्गाचे काम सुद्धा मागील चार वर्षांपासून खोळंबले आहे . यामुळे यंदाच्या पावसाळयात नांदेड - किनवट मार्गावर बांधण्यात आलेले तात्पुरत्या स्वरूपातील पूल वाहून गेल्यामुळे  वाहतूक अनेक तास बंद करण्यात आली होती. हि बाब सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी मंत्री महोदयाच्या निदर्शनास आणून दिली .एकंदरीत हिंगोली लोकसभेतील सुरु असलेल्या कामाबाबत गांभीर्याने लक्ष देऊन सर्व सामान्य नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर कराव्यात असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले .

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...