Skip to main content

किनवट पेंटर असोशियशन च्या अध्यक्षपदी पेंटर हनीफ यांची तर सचिवपदी अनिल उमरे यांची निवड




 दि.22, किनवट/प्रतिनिधी : किनवट पेंटर असोशियशन च्या अध्यक्षपदी पेंटर हनीफ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ज्येष्ठ पेंटर तथा किनवट न. प. चे माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ पत्रकार शकील बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत संथागर वृध्दाश्रम किनवट येथे दि.22 रोजी बैठक घेण्यात आली.

     अध्यक्षीय भाषणात अरुण आळणे म्हणाले की नवीन कार्यकारिणी तयार झाल्याने पेंटर व चित्रकार कलाकारांना चांगली कामे मिळतील. ज्या पेंटर ने काम घेतले असेल तर कामासाठी दुसऱ्या पेंटर ने कमी पैशात काम करू नये. दरवर्षी अध्यक्ष बदलल्याने जोमात काम करता येते. 

    माहूर चे रणजीत वर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सर्व पेंटर गरिबीतून वर आलेले आहेत. सर्व कलाकारांचे पोट पेंटिंग व्यवसायावर अवलंबून आहे. असोशियेशन ने सर्वांना आर्थिक मदत कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे असे सांगितले. 

पेंटर नागनाथ भालेराव यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, पेंटर कलाकारांनी आपला व आपल्या परिवाराचा विमा काढून घ्यावा. कामगार फॉर्म भरून केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, मी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. असे त्यांनी सांगितले. 


     पेंटर रमेश दिसलवार म्हणाले की, पेंटर कडून कामे करून घेतल्या जातात परंतु अडवान्स दिल्यानंतर बाकीची रक्कम बुडविली जाते. असे सांगितले.


यावेळी देविदास पेंटर, जावेद पेंटर, अशोकराज पेंटर, सुदर्शन पेंटर, लोखंडे पेंटर यांनी अनुभव कथन करून भावी कलाकारांना प्रोत्साहन दिले. आपल्या सोबत घडलेल्या भावना व्यक्त केल्या.


     कार्यक्रमा नंतर सर्वानुमते कार्यकारिणी घोषित करण्यात आली ती अशी,


अध्यक्ष-शेख हनीफ पेंटर 


उपाध्यक्ष-राठोड पेंटर / दुर्गादास भालेराव


सचिव-अनिल उमरे पेंटर/ रामेश्वर घुले पेंटर


सहसचिव-शिलरत्न पाटील / संदीप वाघाडेकोषाध्यक्ष- प्रतिरूप पेंटर


सहकोषाध्यक्ष-नौशाद पें


सदस्य- रमेश दिसलवार पेंटर, अजिंक्य आळणे, विनोद भालेराव, सुमेध कापसे


मार्गदर्शक- अरुण आळणे, शकील बडगुजर, बालाजी इंदुरकर, सुदर्शन मारपवार, नागनाथ भालेराव.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रंचालन पेंटर अनिल उमरे यांनी केले. आभार पेंटर दिशलवार यांनी मानले.


बैठकीस वरिष्ठ पेंटर मेश्राम, पेंटर शे. मुस्तफा, अमोल भगत, लोखंडे पेंटर, पेंटर सुरेशवार, विनोद कातले, सतराम पवार, चोबुल खान पठाण, सुरेश पेंटर, विनोद भालेराव युवा कलाकार अजिंक्य आळणे उपस्थित होते. नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याने सर्वांचे अभिनंदन होत आहे.



Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...