Skip to main content

किनवट पेंटर असोशियशन च्या अध्यक्षपदी पेंटर हनीफ यांची तर सचिवपदी अनिल उमरे यांची निवड




 दि.22, किनवट/प्रतिनिधी : किनवट पेंटर असोशियशन च्या अध्यक्षपदी पेंटर हनीफ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ज्येष्ठ पेंटर तथा किनवट न. प. चे माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ पत्रकार शकील बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत संथागर वृध्दाश्रम किनवट येथे दि.22 रोजी बैठक घेण्यात आली.

     अध्यक्षीय भाषणात अरुण आळणे म्हणाले की नवीन कार्यकारिणी तयार झाल्याने पेंटर व चित्रकार कलाकारांना चांगली कामे मिळतील. ज्या पेंटर ने काम घेतले असेल तर कामासाठी दुसऱ्या पेंटर ने कमी पैशात काम करू नये. दरवर्षी अध्यक्ष बदलल्याने जोमात काम करता येते. 

    माहूर चे रणजीत वर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सर्व पेंटर गरिबीतून वर आलेले आहेत. सर्व कलाकारांचे पोट पेंटिंग व्यवसायावर अवलंबून आहे. असोशियेशन ने सर्वांना आर्थिक मदत कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे असे सांगितले. 

पेंटर नागनाथ भालेराव यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, पेंटर कलाकारांनी आपला व आपल्या परिवाराचा विमा काढून घ्यावा. कामगार फॉर्म भरून केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, मी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. असे त्यांनी सांगितले. 


     पेंटर रमेश दिसलवार म्हणाले की, पेंटर कडून कामे करून घेतल्या जातात परंतु अडवान्स दिल्यानंतर बाकीची रक्कम बुडविली जाते. असे सांगितले.


यावेळी देविदास पेंटर, जावेद पेंटर, अशोकराज पेंटर, सुदर्शन पेंटर, लोखंडे पेंटर यांनी अनुभव कथन करून भावी कलाकारांना प्रोत्साहन दिले. आपल्या सोबत घडलेल्या भावना व्यक्त केल्या.


     कार्यक्रमा नंतर सर्वानुमते कार्यकारिणी घोषित करण्यात आली ती अशी,


अध्यक्ष-शेख हनीफ पेंटर 


उपाध्यक्ष-राठोड पेंटर / दुर्गादास भालेराव


सचिव-अनिल उमरे पेंटर/ रामेश्वर घुले पेंटर


सहसचिव-शिलरत्न पाटील / संदीप वाघाडेकोषाध्यक्ष- प्रतिरूप पेंटर


सहकोषाध्यक्ष-नौशाद पें


सदस्य- रमेश दिसलवार पेंटर, अजिंक्य आळणे, विनोद भालेराव, सुमेध कापसे


मार्गदर्शक- अरुण आळणे, शकील बडगुजर, बालाजी इंदुरकर, सुदर्शन मारपवार, नागनाथ भालेराव.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रंचालन पेंटर अनिल उमरे यांनी केले. आभार पेंटर दिशलवार यांनी मानले.


बैठकीस वरिष्ठ पेंटर मेश्राम, पेंटर शे. मुस्तफा, अमोल भगत, लोखंडे पेंटर, पेंटर सुरेशवार, विनोद कातले, सतराम पवार, चोबुल खान पठाण, सुरेश पेंटर, विनोद भालेराव युवा कलाकार अजिंक्य आळणे उपस्थित होते. नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याने सर्वांचे अभिनंदन होत आहे.



Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला