शहर प्रतिनिधी: किनवट:
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व आमदार अमर राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट शहरात वार्ड वार्ड काँग्रेस पक्षाची शाखा स्थापन करून काँग्रेसला बळकटी प्राप्त करण्यासाठी शाखा स्थापन करणार असल्याचा आत्मविश्वास येथील युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत राठोड सरदारनगरकर यांनी केला आहे.
किनवट शहर हा पूर्वी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता पर्यंत मध्यंतरी चा कालावधी सोडला तर हा तालुका वाडी तांड्यात पाड्यात काँग्रेस पक्षाचा बोलबाला आहे. येणाऱ्या किनवट नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये युवकांना जास्त प्रमाणात संधी दिल्यास निश्चित चमत्कार घडेल असा आत्मविश्वास युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. राठोड पुढे म्हणाले की किनवट शहराच्या प्रभागा प्रभागांमध्ये काँग्रेसचे वातावरण अनुकूल असून खऱ्या अर्थाने नगरपरिषदेत युवकांना संधी दिल्यास निश्चित किनवट नगरपरिषदेत काँग्रेसचा झेंडा फडकवुन चमत्कार घडवू असे ते म्हणाले, निष्ठावंत कार्यकर्त्यांना निश्चित संधी दिल्यास जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली व आमदार अमर राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवा ईतिहास घडवणार असल्याचा आत्मविश्वास वसंत राठोड यांनी यावेळी बोलताना दिला आहे
Comments
Post a Comment