Skip to main content

किनवट शहराच्या वार्डा वार्डात कॉंग्रेस शाखा स्थापण करण्याचा युवक शहराध्यक्ष वंसत राठोड यांचा मानस

 

शहर प्रतिनिधी: किनवट:

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व आमदार अमर राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट शहरात वार्ड वार्ड काँग्रेस पक्षाची शाखा स्थापन करून काँग्रेसला बळकटी प्राप्त करण्यासाठी शाखा स्थापन करणार असल्याचा आत्मविश्वास येथील युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत राठोड सरदारनगरकर यांनी केला आहे.

                किनवट शहर हा पूर्वी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता पर्यंत मध्यंतरी चा कालावधी सोडला तर हा तालुका वाडी तांड्यात पाड्यात काँग्रेस पक्षाचा बोलबाला आहे. येणाऱ्या किनवट नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये युवकांना जास्त प्रमाणात संधी दिल्यास निश्चित चमत्कार घडेल असा आत्मविश्वास युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. राठोड पुढे म्हणाले की किनवट शहराच्या प्रभागा प्रभागांमध्ये काँग्रेसचे वातावरण अनुकूल असून खऱ्या अर्थाने नगरपरिषदेत युवकांना संधी दिल्यास निश्चित किनवट नगरपरिषदेत काँग्रेसचा झेंडा फडकवुन चमत्कार घडवू असे ते म्हणाले, निष्ठावंत कार्यकर्त्यांना निश्चित संधी दिल्यास जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली व आमदार अमर राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवा ईतिहास घडवणार असल्याचा आत्मविश्वास वसंत राठोड यांनी यावेळी बोलताना दिला आहे

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...