Skip to main content

कु. प्रियंका ढोमणे( काव्यप्रिया) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय काव्यचारोळी स्पर्धा संपन्न



ता.४ जुन

प्रतिनिधी नाशिक:-

सुप्रसिध्द कवयीत्री साहित्यिका लेखिका प्रियंका भास्कर ढोमणे ( काव्यप्रिया) यांच्या वाढदिवसानिमित्त काव्य चारोळी समुहात राज्यस्तरीय विशेष भव्य चारोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ‍‌या काव्य स्पर्धेत ७५ वर कवी कवयीत्री सहभागी झाले होते. सर्वांनी एक से बढकर एक रचना सादर केल्या या मध्ये साहित्यीक

अश्विनी मोरे,स्वहित कळंबटे,सचिन पाटील,योगीता शिरोरे,किर्ती बोरकर,सुदर्शन जाधव,स्मिता पाटील,माधुरी अमृतकर,सानिका येवले,साक्षी खाकरे सह online अनेकांनी सहभाग नोंदवीला व उपस्थीती दर्शवीली तर समुह संचालक  संयोजक महेंद्र पवार( माही), शिवराज अंदूरकर, अमित भगुंडे, मयुरी घोरपडे यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला 

या वेळी प्रियंका ढोमणे यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.


यामध्ये खालील रचना  मनोगत  सादर करण्यात

आल्या

कवयित्री सौ. वैशाली साळुंखे रायगड यांनी
- काव्यप्रिया नाव तुझे
स्वभाव तुझा गोड
माणुसकी मनातील तुझ्या
साऱ्यांना लावते ओढ


यानंतर

-शरयु खाकरे यांनी

-

तुझ्या सारखी मिळाली मोठी बहीण मला 

थोड पुण्य मिळलय मला 

तुझ्या या वाढदिवशी खुप मिळाल्या 

शुभेच्छा तुला


-सौ. सुषमा शितोळे पुणे यांनी

-काव्य प्रिया तु समुहाची

लाडकी लेक सर्वांची

लावण्यवती स्वरूपाची

तेवढीच स्वच्छ मनाची

हि छान रचना केली


यां नंतर

-सौ. रचना चिंतावार नाशिक यांनी


नाव तुझे काव्य प्रिया 

साहित्यकणाची खाण

सर्वाची गोड लाडकी तु 

किर्ती लहान मुर्ती महान

-

तर साक्षी खाकरे यांनी

-तुझे दिलदार व्यक्तीमत्व सर्वांच्या

मनात रुजुदे आजच्या दिवशी

माझ्या शुभेच्छा स्वीकारून घे

भरभरून आशीर्वाद मिळो तुला
हिच माझी सदीच्छा

-शंकर पाटील अलिबाग यांनी

काव्यप्रिया तु महाराष्ट्राची

आहेस कवयित्री महान

प्रेमाने सर्वांना जिंकून सतत

वाढवतेस साहित्याची शान

-

मिलींद कोथिंबीरे श्रीगोंदा यांनी


नाव तुझे गं प्रियांका

      सर्वांचीच तू लाडकी,

केला सांभाळ भावाचा

      नाही त्यास तू परकी


आदींनी दर्जेदार रचना मांडल्या व वाढदिवस साजरा केला.


मनोगत

-*🌹विषय=काव्यप्रिया🌹*

*शीर्षक - काव्य शुभेच्छा*

 

*🌹❤️दोन शब्द पियुसाठी*❤️🌹*

पियुचं व्यक्तीमहत्व कवितेत  मावेल इतकं छोटं नाही म्हणून मी कविता न लिहिता तिच्या वाढदिवसा निमित्त दोन शब्द लिहिणार आहे,मनापासून लिहिते मला फक्त पियु ची स्तुती करायची आहे म्हणून नाही,तर तिच्या व्यक्तीमहत्वाशी निगडित खरं लिहिणार आहे,पियु  दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच ती मनाने सुंदर आहे, मनमिळाऊ, प्रेमळ,आहे, पियु शी कधीही बोला ती आदराने आणि प्रेमानेच बोलते,पियु माझ्यापेक्षा लहान आहे पण तरी तिच्या व्यक्तिमह्त्वाचा हेवा करावासा वाटतो ,खूप कमी वयात तीने बऱ्याच गोष्टीत यश मिळवलं आहे,सर्वात महत्वाचे म्हणजे तिने सर्वांच्या हृदयात वेगळी जागा निर्माण केली आहे,प्रत्येकाच्या हृदयात जागा करणं वाटतं तेवढ सोपं नाही त्याला खूप मोठं मन लागतं.

         🌹🌹🌹गुलाबा सारखी सुंदर असणारी माझी पियु, मनाने मोगऱ्यासारखी सुगधं देणारी आहे....... 🌺🌺जास्वंदासारखी चेऱ्यावर लाली असणारी,लाजाळू सारखी लाजणारी आहे......स्वभावणे ती चाफ्यासारखी मनमोहक करणारी आहे.......... शब्दांनी ती आपल्याला सुर्यफुलासारखी🌻🌻 प्रभावित करणारी आहे.........अशी माझी  गोड पियु  सफळ्यात वेगळी आहे.

        काव्यक्षेत्रात मला बरेच अनुभव आलेत की लिखाण करणारे लोक त्यांच्याच विश्वात असतात प्रत्येक लिखाण करणाऱ्या व्यक्तीला वाटतं की माझ्या सारखं हुशार कोणीच नाही पण काव्यक्षेत्रातली *काव्यप्रिया* ची एक वेगळी ओळख आहे ती सर्वाना सोबत घेऊन चालते,काव्यप्रिया मला मनाने खूप हळवी नाजूक वाटते,पण संकटांना तोंड देण्याची ही तिला तितकीच हिम्मत आहे,आई वडिलांचे सर्व स्वप्न पूर्ण करण्याची धम्मक तुझ्यात आहे तुझे सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होहोत आणि काव्यक्षेत्रात तू खूप उंच भरारी घेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते.


*माझ्या गोड पियु ला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा*........ 🍫🍫🎂🎂🌹🌹🌹💐💐❤️❤️🥰🥰🥰


*@अश्विनी मोरे@*




Comments

  1. फारच सुंदर कार्यक्रम झाला समाजरत्न बरोबरच काव्यचारोळी समूह परिवारातर्फे कु.प्रियंका भास्कर ढोमणे(पियु)यांचा विशेष सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला..त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

    ReplyDelete
  2. फारच सुंदर कार्यक्रम झाला समाजरत्न बरोबरच काव्यचारोळी समूह परिवारातर्फे कु.प्रियंका भास्कर ढोमणे(पियु)यांचा विशेष सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला..त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला