खरीप हंगाम सुरु झाल्याने बाजारात बोगस खत बियाणे विक्रीस येऊन शेतकऱ्यांची फसवणुक होत आहे या करीता संभाजी ब्रिगेड आंदोलनाच्या पावित्र्यात -अजय कदम ( तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड किनवट)
ता. प्र.किनवट:- येणाऱ्या खरीप हंगामात व्यापारा कडून बोगस खते व बोगस बियांणाची विक्री होऊनये यासाठी मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष अजय कदम पाटील यांनी सहायक जिल्हाधिकारी कार्यालय यांना ता.२ रोजी या द्वारे निवेदन दिले आहे कोरोना व लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर आर्थीक व्यवस्था डबघाईस गेलेली आहे त्यातच औषधे औजारे खते बियाणे अन्य वस्तु यांची भाववाड होऊन शेतकऱ्यांना आर्थीक फटका बसु शकतो याकरीता संभाजी ब्रिगेड ने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Comments
Post a Comment