Skip to main content

मुस्लीमांच्या विविध मागण्यासाठी टिपु सुल्तान ब्रिगेडसह विविध मुस्लीम सामाजिक संघठने तर्फे "एक युवक एक पोस्टकार्ड" मोहीम राबविण्यात आली व मुख्यमंत्र्याना पोस्टकार्ड पाठवण्यात आले

 


✍🏻राजेश पाटील

ता. प्र.किनवट:-

मुस्लीम आरक्षण व विद्यार्थी हितांच्या प्रश्नासाठी टिपु सुलतान ब्रिगेड व विविध मुस्लिम सामाजिक संघटनेतर्फे एक युवक एक पोस्टकार्ड मोहीम राबविण्यात आली व पोस्टाद्वारे मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे मंत्रालय मुबंईला टपाल पोस्ट पाठवण्यात आले या मोहिमेला अनेकांनी पाठींबा दर्शवीला आहे 

यावेळी जिल्हा कार्यकारीणी अध्यक्ष सय्यद नदिम, ता. अध्यक्ष शेख शाक़िर शेख इशरत , तौसीफ खान, शेख रीयाज, यु. ता. अ.शेख समीर, शहबाज खान शहर अध्यक्ष, यासह अनेक युवा उपस्थित होते यात १००च्या वर युवकांनी पोस्ट टपाल द्वारे  मुख्यमंत्री महोदयांना पोस्ट कार्ड पाठवले .


खालील मागण्या करण्यात आल्या

▪️१) मुस्लीमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात यावा.

▪️२) मॉब लिंचींग केलेल्या मोहसीन शेखला न्याय देण्यात यावा.

▪️३) मॉबलिंचींग विरुध्द कायदा तयार करण्यात यावा 

▪️४) प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिम मुलां- मुलिसाठी वस्तीगृह उभारण्यात यावे 

▪️५) बार्टी आणि सारथी च्या धर्तीवर मुस्लीम मुला- मुलीनां एम पी एस सी व युपीएससी साठी संस्था स्थापन करण्यात यावी

▪️६) मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ करण्यात यावी .

▪️७) महाराष्ट्रातील वक्फ मंडळाच बळकटीकरण करण्यात याव व संपत्तीचा अहवाल सार्वजनिक करावा या मागण्यांचा समावेश होता.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते