किनवट शहर प्रतिनिधी:-
मन व शरीर सुदृढ ढेवण्यासाठी जीवनात योगाचे फार मोठे महत्त्व आहे.सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जग भयभीत झाले.या आजारावर मात करण्यासाठी नियमित योगा करणे हे अत्यावश्यक आहे.विविध आजारापासून रोगमुक्त जीवन जगण्यासाठी आपण योगाचे महत्त्व जाणून घ्यावे. असे मत बळीराम पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमात योग शिक्षक देविदास मुनेश्वर यांनी व्यक्त केले.
किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर यांच्या नियोजनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रारंभी देविदास मुनेश्वर यांचे उपप्राचार्य प्रा. डॉ. गजानन वानखेडे, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा विभागीय समन्वयक प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी केले.पुढे बोलतांना देविदास मुनेश्वर यांनी जीवनात योगाचे महत्त्व फार मोठे आहे.प्राचीन काळापासून योग केले जाते.माणसाला सुखी व समाधानी जीवन जगण्यासाठी नियमित योगा करावे.भारतात अनेक विद्यापीठातून योगाचे शिक्षण दिले जाते.योगामुळे मन व शरीर सुदृढ राहते. आपण कपाल भारती, भसरीका प्रणायन, मेरुदंड, पवनमुक्त असंन ,सर्वांगन असन, शुक्ष्म वायाम,बाह्य प्रणायम, हस्य योग,विविध असंन आपण नियमित करावे.जीवनात आनंदी राहण्यासाठी योगा करणे महत्त्वाचे आहे. असे सांगून प्रात्यक्षिकासह विविध असन करुन दाखविले.
याप्रसंगी सेवानिवृत्त तलाठी मुक्तीराम घुगे साहेब, माजी उपप्राचार्य प्रा.राजकुमार नेम्मानीवार, राष्ट्रीय छात्र सेना विभागप्रमुख प्रा. काझी एस .एस,क्रिडा विभागप्रमुख प्रा.मधुकर पवार, संगणक विभाग प्रमुख डॉ.योगेश सोमवंशी, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. शुंभागी दिवे, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. सुलोचना जाधव, कनिष्ठ महाविद्यालयीन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.पुरुषोत्तम येरडलावार,लक्ष्मीबाई पुठ्ठावार, सुधीर पाटील ,यांची उपस्थिती होती.आभार मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी मानले.
Comments
Post a Comment