Skip to main content

बळीराम पाटील महाविद्यालयात रासेयोच्या वतीनेआंतराष्ट्रीय योग दिवस साजरा


किनवट शहर प्रतिनिधी:-

 मन व शरीर सुदृढ ढेवण्यासाठी जीवनात योगाचे फार मोठे महत्त्व आहे.सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जग भयभीत झाले.या आजारावर मात करण्यासाठी नियमित योगा करणे हे अत्यावश्यक आहे.विविध आजारापासून रोगमुक्त जीवन जगण्यासाठी आपण योगाचे महत्त्व जाणून घ्यावे. असे मत बळीराम पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमात योग शिक्षक देविदास मुनेश्वर यांनी व्यक्त केले.



 किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर यांच्या नियोजनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रारंभी देविदास मुनेश्वर यांचे उपप्राचार्य प्रा. डॉ. गजानन वानखेडे, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा विभागीय समन्वयक प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी केले.पुढे बोलतांना देविदास मुनेश्वर यांनी जीवनात योगाचे महत्त्व फार मोठे आहे.प्राचीन काळापासून योग केले जाते.माणसाला सुखी व समाधानी जीवन जगण्यासाठी नियमित योगा करावे.भारतात अनेक विद्यापीठातून योगाचे शिक्षण दिले जाते.योगामुळे मन व शरीर सुदृढ राहते. आपण कपाल भारती, भसरीका प्रणायन, मेरुदंड, पवनमुक्त असंन ,सर्वांगन असन, शुक्ष्म वायाम,बाह्य प्रणायम, हस्य योग,विविध असंन आपण नियमित करावे.जीवनात आनंदी राहण्यासाठी योगा करणे महत्त्वाचे आहे. असे सांगून प्रात्यक्षिकासह विविध असन करुन दाखविले.

 याप्रसंगी सेवानिवृत्त तलाठी मुक्तीराम घुगे साहेब, माजी उपप्राचार्य प्रा.राजकुमार नेम्मानीवार, राष्ट्रीय छात्र सेना विभागप्रमुख प्रा. काझी एस .एस,क्रिडा विभागप्रमुख प्रा.मधुकर पवार, संगणक विभाग प्रमुख डॉ.योगेश सोमवंशी, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. शुंभागी दिवे, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. सुलोचना जाधव, कनिष्ठ महाविद्यालयीन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.पुरुषोत्तम येरडलावार,लक्ष्मीबाई पुठ्ठावार, सुधीर पाटील ,यांची उपस्थिती होती.आभार मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.