Skip to main content

बळीराम पाटील महाविद्यालयात रासेयोच्या वतीनेआंतराष्ट्रीय योग दिवस साजरा


किनवट शहर प्रतिनिधी:-

 मन व शरीर सुदृढ ढेवण्यासाठी जीवनात योगाचे फार मोठे महत्त्व आहे.सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जग भयभीत झाले.या आजारावर मात करण्यासाठी नियमित योगा करणे हे अत्यावश्यक आहे.विविध आजारापासून रोगमुक्त जीवन जगण्यासाठी आपण योगाचे महत्त्व जाणून घ्यावे. असे मत बळीराम पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमात योग शिक्षक देविदास मुनेश्वर यांनी व्यक्त केले.



 किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर यांच्या नियोजनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रारंभी देविदास मुनेश्वर यांचे उपप्राचार्य प्रा. डॉ. गजानन वानखेडे, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा विभागीय समन्वयक प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी केले.पुढे बोलतांना देविदास मुनेश्वर यांनी जीवनात योगाचे महत्त्व फार मोठे आहे.प्राचीन काळापासून योग केले जाते.माणसाला सुखी व समाधानी जीवन जगण्यासाठी नियमित योगा करावे.भारतात अनेक विद्यापीठातून योगाचे शिक्षण दिले जाते.योगामुळे मन व शरीर सुदृढ राहते. आपण कपाल भारती, भसरीका प्रणायन, मेरुदंड, पवनमुक्त असंन ,सर्वांगन असन, शुक्ष्म वायाम,बाह्य प्रणायम, हस्य योग,विविध असंन आपण नियमित करावे.जीवनात आनंदी राहण्यासाठी योगा करणे महत्त्वाचे आहे. असे सांगून प्रात्यक्षिकासह विविध असन करुन दाखविले.

 याप्रसंगी सेवानिवृत्त तलाठी मुक्तीराम घुगे साहेब, माजी उपप्राचार्य प्रा.राजकुमार नेम्मानीवार, राष्ट्रीय छात्र सेना विभागप्रमुख प्रा. काझी एस .एस,क्रिडा विभागप्रमुख प्रा.मधुकर पवार, संगणक विभाग प्रमुख डॉ.योगेश सोमवंशी, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. शुंभागी दिवे, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. सुलोचना जाधव, कनिष्ठ महाविद्यालयीन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.पुरुषोत्तम येरडलावार,लक्ष्मीबाई पुठ्ठावार, सुधीर पाटील ,यांची उपस्थिती होती.आभार मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...