Skip to main content

किनवट तालुक्यातील घोगरवाडी ते तेलंगणा राज्यातील उमरी रस्ता होणार जनतेचे स्वप्न आमदार भीमराव केराम प्रत्यक्षात उतरवणार



 



किनवट तालुका प्रतिनिधी:-

स्वातंत्र्यपुर्व काळापासून मागणी असलेला किनवट तालुक्यातील घोगरवाडी ते तेलंगणा राज्यातील उमरी या गावांना जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण रस्ता बांधकामाला मूर्तरूप देण्यासाठी जनतेच्या मागणीचा सलग पाठपुरावा करत या रस्त्याची निर्मिती करून किनवट ते आदिलाबादचे अंतर थेट तीस किलोमीटर ने कमी करण्याचे जनतेचे स्वप्न आमदार भीमराव केरामांनी प्रत्यक्षात उतरवले आहे.प्रत्यक्ष रस्ता विकास कामाला सुरुवात झाली असून आदिलाबाद व किनवटचे आमदार यांचे हस्ते लवकरच या रस्त्याचे लोकार्पन होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील घोगरवाडी व तेलंगणा राज्यातील उमरी या ३ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची निर्मिती व्हावी अशी जनतेची स्वातंत्र्यपुर्व काळापासून आग्रही मागणी होती.याच मागणीच्या अनुषंगाने मागील विधानसभा निवडणुकांच्या काळात येथील जनतेने सदर रस्त्याची निर्मिती व्हावी, अशी मागणी



आ. भीमराव  केरामांकडे केल्याने त्यांनीही त्या मागणीची पुर्तता करू असा शब्द दिला होता. दरम्यान, दिल्या शब्दाला जागत जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त करून तसेच विविध विभागांच्या तांत्रिक अडचणींना दूर सारून घोगरवाडी ते उमरी या तीन किलोमीटरचा रस्ता निर्मिती करण्याचे मोलिक कार्य आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नाने प्रत्यक्षात साकार झाले आहे.विशेष म्हणजे उमरी पासून कोसाई हे अंतर अवघे दोन किमी असून आदिलाबाद हे अंतर पंधरा किलोमीटरच्या जवळपास आहे.एरव्ही किनवट व परिसरातील नागरिकांना आदिलाबाकडे जाय्यचे झाल्यास ७० ते ७५ किलोमीटरचा प्रवास करून हे अंतर कापावे लागत होते.परंतू, किनवट वरून घोगरवाडी ते उमरी या मार्गाने हे अंतर तब्बल ३० किलोमीटर ने कमी होणार असून किनवट व परिसरातील जनतेसाठी आदिलाबाद हे अधिकचे जवळ येणार आहे.यामुळे शेतकरी,व्यापारी व सर्वसामान्यांसाठी हा मार्ग हा अधिकच सुखकर होणार असून शिक्षण रस्ता व आरोग्य या आवश्यक सोयी सुविधासाठी वाहतूक व्यवस्था मिळणार आहे. तेलंगणातील आदिलाबादचे खासदार बापूराव सोयाम यांच्यासह आमदार बापूराव राठोड, किनवट- माहूरचे आमदार भीमराव  केराम यांच्या हस्ते लवकरच या रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार पडून रस्ता जनतेसाठी खुला होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.शिवाय आज दि. १३ जून रोजी या रस्ता निर्माण कामाची पाहणी आमदार भीमराव केराम,सहायक जिल्हाधिकारी किर्तिकिरण पुजार,तहसीलदार अनिता कोलगने,उद्योजक अनिल तिरमनवार , सरपंच आत्माराम मुंडे,दत्ता आडे आदींनी केली.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला