Skip to main content

किनवट तालुक्यातील घोगरवाडी ते तेलंगणा राज्यातील उमरी रस्ता होणार जनतेचे स्वप्न आमदार भीमराव केराम प्रत्यक्षात उतरवणार



 



किनवट तालुका प्रतिनिधी:-

स्वातंत्र्यपुर्व काळापासून मागणी असलेला किनवट तालुक्यातील घोगरवाडी ते तेलंगणा राज्यातील उमरी या गावांना जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण रस्ता बांधकामाला मूर्तरूप देण्यासाठी जनतेच्या मागणीचा सलग पाठपुरावा करत या रस्त्याची निर्मिती करून किनवट ते आदिलाबादचे अंतर थेट तीस किलोमीटर ने कमी करण्याचे जनतेचे स्वप्न आमदार भीमराव केरामांनी प्रत्यक्षात उतरवले आहे.प्रत्यक्ष रस्ता विकास कामाला सुरुवात झाली असून आदिलाबाद व किनवटचे आमदार यांचे हस्ते लवकरच या रस्त्याचे लोकार्पन होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील घोगरवाडी व तेलंगणा राज्यातील उमरी या ३ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची निर्मिती व्हावी अशी जनतेची स्वातंत्र्यपुर्व काळापासून आग्रही मागणी होती.याच मागणीच्या अनुषंगाने मागील विधानसभा निवडणुकांच्या काळात येथील जनतेने सदर रस्त्याची निर्मिती व्हावी, अशी मागणी



आ. भीमराव  केरामांकडे केल्याने त्यांनीही त्या मागणीची पुर्तता करू असा शब्द दिला होता. दरम्यान, दिल्या शब्दाला जागत जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त करून तसेच विविध विभागांच्या तांत्रिक अडचणींना दूर सारून घोगरवाडी ते उमरी या तीन किलोमीटरचा रस्ता निर्मिती करण्याचे मोलिक कार्य आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नाने प्रत्यक्षात साकार झाले आहे.विशेष म्हणजे उमरी पासून कोसाई हे अंतर अवघे दोन किमी असून आदिलाबाद हे अंतर पंधरा किलोमीटरच्या जवळपास आहे.एरव्ही किनवट व परिसरातील नागरिकांना आदिलाबाकडे जाय्यचे झाल्यास ७० ते ७५ किलोमीटरचा प्रवास करून हे अंतर कापावे लागत होते.परंतू, किनवट वरून घोगरवाडी ते उमरी या मार्गाने हे अंतर तब्बल ३० किलोमीटर ने कमी होणार असून किनवट व परिसरातील जनतेसाठी आदिलाबाद हे अधिकचे जवळ येणार आहे.यामुळे शेतकरी,व्यापारी व सर्वसामान्यांसाठी हा मार्ग हा अधिकच सुखकर होणार असून शिक्षण रस्ता व आरोग्य या आवश्यक सोयी सुविधासाठी वाहतूक व्यवस्था मिळणार आहे. तेलंगणातील आदिलाबादचे खासदार बापूराव सोयाम यांच्यासह आमदार बापूराव राठोड, किनवट- माहूरचे आमदार भीमराव  केराम यांच्या हस्ते लवकरच या रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार पडून रस्ता जनतेसाठी खुला होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.शिवाय आज दि. १३ जून रोजी या रस्ता निर्माण कामाची पाहणी आमदार भीमराव केराम,सहायक जिल्हाधिकारी किर्तिकिरण पुजार,तहसीलदार अनिता कोलगने,उद्योजक अनिल तिरमनवार , सरपंच आत्माराम मुंडे,दत्ता आडे आदींनी केली.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.