Skip to main content

आदिवासी परधान समाज कर्मचारी बांधवांच्या वतीने गरजुंना मदत

 


ता. प्र.किनवट:-

 नादेंड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल  तालुक्यात डोंगराळ जंगलव्याप्त भागात  वाडी गुडयावर आदिवासी  समाज  मोठ्या संख्येने  राहतो.

      राज्यांत कोरोना संकटाचे थैमान चालु असल्याने कोरोनाच्या या भयाण काळात गेली दोन वर्षे सतत कडक लॉकडाऊन घोषित असल्याने हातावरचे पोट असणारी आदिवासी कुटुंब  जगण्याच्या मरण यातना भोगत होते. अशातच अनेक कुटुंब या कोरोना काळात उध्वस्त  झालेली पाहायला मिळाली. यातच काही कुटुंबातील लोकांनी आपल्या घरातील कर्ता पुरुष गमावले होते. लोकांच्या हाताला कोणतेही कामं नाही.या भागातील आदिवासी कुटुंब इतरत्र कामं करण्यास स्थलांतर करत होते.मोल मजुरी करून गुजराण करणाऱ्या आदिवासी समाजावर या कडक लॉकडाऊनमुळे जगण्याचा प्रश्ण निर्माण झाला.अशा बिकट परिस्थिती  मध्ये कुटुंबातील सदस्यांच्या हाताला कोणतेही कामं नसल्याने हातावरचे  पोट असणाऱ्याचे हाल होतांना दिसत होते.या काळात उपेक्षित दुर्लक्षित कुटुंबांच्या यातना ही भयाण होत्या.ह्या सर्व गंभीर परिस्थीतीचा विचार करून आदिवासी परधान समाज कर्मचारी बांधव  एकवटला अन सामाजिक दायित्व भावनेतून  अडचणीत असणाऱ्या आदिवासी कुटुंबीयांना मदत करण्याचे निर्णय घेत सोशियल मीडिया गृपद्वारे ऑनलाईन पद्धतीने मदत निधी गोळा करून त्या जमा रक्कमेतुन दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तुची खरेदी करून अन्नपूर्णा किट वाटप करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले.या उपक्रमा अंतर्गत प्रथम टप्प्यात मौजे पिंपळगांव (सि) , तलाईगुडा , भिलगांव , पळशी , लालुनाईकतांडा , जरुर , मांडवी , गणेशपुर , नागापूर , दरसावंगी , लिंगी , उनकेश्वर , बोथ , उमरी (बा) , निराळा आदी गावांना भेटी देत गावांतील अनाथ , अपंग , विधवा , वेडसर , दारिद्य्र रेषेखालील , भूमिहीन , उपेक्षित दुर्लक्षित कुटुंबीयांच्या व्यथा जाणून त्यांना कोरोना पासुन घ्यावयाची काळजी सांगत त्यांना अन्नपूर्णा किट देण्यात आले.अशा प्रकारे एकूण 50 अन्नपूर्णा किराणा सामानाची किट वाटप करण्यात आले असून या उपक्रमाचे अध्यक्ष सुभाष कन्नाके , कार्यअध्यक्ष गोपाल कन्नाके , उपाध्यक्ष रामदास मेश्राम , सचिव मूरहारी कन्नाके , कोषाध्यक्ष शोभा कुमरे , गणेश डोंगरे , प्रसिद्धी प्रमुख प्रणय कोवे ,  सदस्य रमेश परचाके , संतोष पोहूरकर , शशांक कन्नाके , सौरभ कन्नाके  आदीनी उपक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.?

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला