Skip to main content

सोशल मिडीयाच्या माध्यमातुन एकत्र आलेल्या युवकांनी प्रियदर्शी सम्राट अशोक यांची जंयती नावीन्य उपक्रमातुन केली साजरी .... वृतांत ✍️राजेश पाटील

 

प्रतिनिधी किनवट/ माहुर:-

ज्या मौर्य सम्राट अशोकांनी सर्व भारतावर व भारताच्या बाहेर देखील अधिराज्य गाजवले २६९ ते २३२ एवढा प्रदीर्घ क़ाळ त्यांनी संपुर्ण भारतीय उपखंडावर राज्य केले कलींग युध्दातील रक्तपातानंतर उद्विग्न झालेले सम्राट अशोक हे बुद्ध धम्माकडे वळले व धम्माचा प्रचार केले त्यांनी त्यांच्या हयातीत ८४००० स्तुपांचे निर्माण केले व बौध्द धम्म सर्व जगात पोहचवला म्हणुन त्यांचा धम्म ध्वज भारताने राष्ट्रध्वज व अशोक स्तंभ राजमुद्रा म्हणुन स्विकारली अशा याच कार्याचा वसा घेत  महान सम्राटांची १७१७वी जंयती किनवट- माहुर तालुक्यातील युवकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन एकत्र येत सम्राट अशोकांची प्रतिमा प्रत्येक नगरात व विहारास भेट दिली  तालुक्यातील घोटी, सिध्दार्थ नगर, विद्यानगर, गोकुंदा, शाहु नगर, आंबेडकर नगर, कोठारी, अंबाडी, तक्षशिला विहार, वझरा(बु), अशा ठिकाणी प्रतिमा भेट देऊन तथागत गौतम बुध्द व अशोकांचे विचार पेरले यावेळी प्रतिक मुनेश्वर, अमोल नायक, शंतनु कांबळे, अमोल शेंद्रे, अनुपम वासाटे, इंजि. सचीन गिमेकार, सिध्दांत , पवन, निलेश उमरे, विशाल मुनेश्वर आदींनी या साठी परिश्रम घेतले.










Comments

  1. नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा तालुक्यात रथमच

    ReplyDelete
  2. नाविन्यपूर्ण उपक्रम किनवट तालुक्यात प्रथमच

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...