Skip to main content

किनवट नगर परिषदेने प्रशासनाचा दर्जा सुधारावा- माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार न .प. सेवक प्रभाग २, विभागीय आयुक्ताकडे तक्रार

 


किनवट - येथील पालिकेतील प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध लेखी, तोंडी तक्रारी होऊनही संबंधितांकडून सुधारणा होत नाही.

ढिसाळ कारभारात त्वरित सुधारणा न झाल्यास वरिष्ठांकडे दाद मागण्याचा इशारा माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक श्रीनिवास नेम्मानीवार यांनी दिला आहे.     

 यासंदर्भात विभागीय आयुक्तांसह संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 

किनवट पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत आहे.

पालिकेतील अधिकारी,कर्मचाऱ्यांकडून कार्यालयीन वेळेचे पालन होत नसल्याने नागरिकांना वारंवार कार्यालयात खेटे घालावी लागतात.अनेक कर्मचारी कोणतेतरी कारण सांगून कार्यालयाबाहेर पडतात.


शहरवासीयांसाठी उपयुक्त असलेली वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन वर्षभरापेक्षा जास्तीचा कालावधी उलटला परंतु,अद्याप कामाला सुरुवात झाली नाही

अनेकदा तक्रारी करूनही शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे.

छत्रपती शिवरायांचा नवीन पुतळा उभारण्याबाबतची कारवाई अत्यंत संथगतीने सुरू असल्याने शिवप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे.

शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची निगा राखण्यात येत नसल्याने पुतळ्यांभोवती अस्वच्छता,घाणीच्या साम्राज्यासोबतच अतिक्रमणात वाढ होत आहे.

भाजी मार्केट तसेच आठवडी बाजारात कोणीही यावे,अतिक्रमण करावे,अशी स्थिती आहे.

एकीकडे भाजी मार्केटमध्ये अतिक्रमणे वाढत असताना पालिकेत जमीन भाडेधारकांच्या नोंदीच नसल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे.

शिवाय,वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाल्याने महिला व नागरिकांना त्रास होत आहे.

पालिकेचे लेखा परीक्षण अहवाल सर्वसाधारण सभेपुढे ठेवून आयुक्तालयास पाठविणे बंधनकारक असताना डिसेंबर २०१७ ते फेब्रु.२०२१ पर्यंतचा अहवाल सभागृहात आलाच नाही.

विकास योजना विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे विकासकामे संथगतीने होत आहेत.

जलशुद्धीकरणाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने नागझरी तलावातून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे.

घनकचरा ठेकेदाराला  मुदतवादी 'चा पॅटर्न सुरूच असल्याने स्वच्छतेच्या कामांत अनियमितता दिसून येत आहे

न्यायालयीन प्रकरणांचा अहवाल ५ वर्षांपासून सभागृहापुढे ठेवण्यात आला नाही.

एखादे न्यायालयीन प्रकरण हाताळण्याबाबत विशिष्ट कर्मचाऱ्याची नियुक्ती संशयास्पद आहे.भूसंपादनाची बाबतीतही प्रशासनाची अनास्था दिसून येत असल्याचे नेम्मानीवार यांनी नमूद केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला