ता. प्र.किनवट:-
किनवट नगर परीषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा भाजप शहराराध्यक्ष यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन शासन व प्रशासनाला विनंती केली आहे त्यांनी जनतेशी संवाद साधताना म्हटले कि गेल्या वर्षी जनतेला कोव्हिड बद्दल माहिती नव्हती तेव्हां काटेकोर पणे अमलबजावणी झाली WHOने सुध्दा सांगीतल की आपल्याला कोरोना सोबतच जगाव लागेल आता या वर्षी जनता नागरिक सज्ञान झाली आहे त्यांना कोव्हीड चे सर्व नियम माहीत झाले लोक आता मास्क वापरत आहे, लोकात जागृती झाली आहे तसेच आता कोव्हीडची लस उपलब्ध झाली आहे त्यामुळे हातावर पोट असणारे , अनेकांचा रोजगार बुडत आहे, छोटे मोठे व्यापारी, दुकानदार, गरीब जनता जनार्दन यांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आहे त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय नाही त्या पेक्षा निर्बंध बरा असा संदेश प्रभाग २चे नगर सेवक व माजी उपनगराध्यक्ष यांनी या सुचना केल्या आहे
Comments
Post a Comment