Skip to main content

माधव मेकेवाड यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेड जिल्हा संघटक पदी निवड




नांदेड :-(प्रतिनिधी)
नांदेड जिल्ह्यात प्रकाश कौडगे मनसे जिल्हाध्यक्ष पदावर येताच मनसेत येणाऱ्यांची वर्णी लागली आहे दिवसेंदिवस  मनसेत येणाऱ्यांची संख्या वाढत आहे . तत्पूर्वी भारत प्रभात पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माधव मेकेवाड सह अनेक कार्यकर्त्यांनीही मनसेचा झेंडा हाती धरल्याने नांदेड जिल्हाध्यक्ष मनसे सर्वत्र झाली आहे . पक्ष प्रवेश करणारे आजून दिग्जज कार्यकर्ते असल्याने नांदेड मध्ये मोठे बळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळणार आहे.आगामी भोकर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब मनसेसाठी फायदेशीर मानली जात आहे.

*भोकर मधूनही मनसेत येणाऱ्यांची संख्या वाढली*

जानेवारी महिन्यात अनेक तालुक्यात शिवसेनेला सह अन्य पक्षाला मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळाले. मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष प्रकाश कौडगे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश झाला.नांदेड जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील प्रत्येक वार्डात मनसेचे कार्यकर्ते असावेत यासाठी नियोजन सुरु असल्याचे चित्र आहे. पक्षवाढीसाठी मनसेत युवकांना सामावून घेतले जात असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कौडगे यांनी सांगितलं.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अगदी थोड्या दिवसात राजकीय पक्षात प्रवेश करून आपला ठसा उमटवणारे माधव मेकेवाड नेहमी चर्चेत असतात.महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेड जिल्हाध्यक्ष
प्रकाश कौडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आगामी सर्व निवडणूक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशी अग्रेसर होईल ह्या साठी राजसाहेब ठाकरे सोबत कार्य करणार असल्याचे सांगण्यात आले हिंदुत्वाचा अजेंडा आज साहेबाच्या हातून होणार त्या साठी आम्ही आमच्या शेवटच्या श्वासा पर्यंत लढा देऊ पक्ष वाढीसाठी जीवापाड प्रयत्न करून आगामी सर्व निवडणूक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकु असे माधव मेकेवाडयांनी पक्ष प्रवेश झाल्यानंतर आश्वासन पक्षाला शेकडो कार्यकर्त्या समोर दिले. .पक्षात या वेळी अनेक धडाडीच्या कार्यकर्त्या समक्ष माधव मेकेवाड यांना जिल्हा संघटक पदाची धुरा सांभाळावी असे वक्तव्य प्रकाश कौडगे यांनी केले.यावेळी माधव मेकेवाड,विजय पांडुरंग मोरे,गुणाजी भंडरवाड ,गजानन जाधव,सुनील पवार यांच्या कडे विविध पदे देऊन सत्कार करण्यात आला .शंकर पाटील हाडोळीकर ,सोहम शेट्टे, आकाश गेंटेवार यांची निवड देखील यावेळी भोकर तालुक्यातील कार्यकर्ते समोर देऊन राजसाहेब यांच्या सैनिकांच्या घोषणा कार्यलयात यावेळी गुंजू लागल्या.

या निवडी वेळी माधव मेकेवाड म्हणाले...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजसाहेब देशाला आणि महाराष्ट्र राज्याला खरी दिशा देणारे एकमेव नेते असणार आहेत अशा नेत्याच्या पक्षात कार्य करणे म्हणजे आगामी महाराष्ट्र राज्याचा खरा विकास करताना साक्षीदार ठरणे होय  यामुळे मी पुनश्च पक्षात प्रवेश केला असे मत माधव मेकेवाड यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी समोर पक्ष कार्यलय नांदेड येथील बैठकीत मांडले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला