Skip to main content

माधव मेकेवाड यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेड जिल्हा संघटक पदी निवड




नांदेड :-(प्रतिनिधी)
नांदेड जिल्ह्यात प्रकाश कौडगे मनसे जिल्हाध्यक्ष पदावर येताच मनसेत येणाऱ्यांची वर्णी लागली आहे दिवसेंदिवस  मनसेत येणाऱ्यांची संख्या वाढत आहे . तत्पूर्वी भारत प्रभात पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माधव मेकेवाड सह अनेक कार्यकर्त्यांनीही मनसेचा झेंडा हाती धरल्याने नांदेड जिल्हाध्यक्ष मनसे सर्वत्र झाली आहे . पक्ष प्रवेश करणारे आजून दिग्जज कार्यकर्ते असल्याने नांदेड मध्ये मोठे बळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळणार आहे.आगामी भोकर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब मनसेसाठी फायदेशीर मानली जात आहे.

*भोकर मधूनही मनसेत येणाऱ्यांची संख्या वाढली*

जानेवारी महिन्यात अनेक तालुक्यात शिवसेनेला सह अन्य पक्षाला मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळाले. मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष प्रकाश कौडगे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश झाला.नांदेड जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील प्रत्येक वार्डात मनसेचे कार्यकर्ते असावेत यासाठी नियोजन सुरु असल्याचे चित्र आहे. पक्षवाढीसाठी मनसेत युवकांना सामावून घेतले जात असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कौडगे यांनी सांगितलं.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अगदी थोड्या दिवसात राजकीय पक्षात प्रवेश करून आपला ठसा उमटवणारे माधव मेकेवाड नेहमी चर्चेत असतात.महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेड जिल्हाध्यक्ष
प्रकाश कौडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आगामी सर्व निवडणूक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशी अग्रेसर होईल ह्या साठी राजसाहेब ठाकरे सोबत कार्य करणार असल्याचे सांगण्यात आले हिंदुत्वाचा अजेंडा आज साहेबाच्या हातून होणार त्या साठी आम्ही आमच्या शेवटच्या श्वासा पर्यंत लढा देऊ पक्ष वाढीसाठी जीवापाड प्रयत्न करून आगामी सर्व निवडणूक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकु असे माधव मेकेवाडयांनी पक्ष प्रवेश झाल्यानंतर आश्वासन पक्षाला शेकडो कार्यकर्त्या समोर दिले. .पक्षात या वेळी अनेक धडाडीच्या कार्यकर्त्या समक्ष माधव मेकेवाड यांना जिल्हा संघटक पदाची धुरा सांभाळावी असे वक्तव्य प्रकाश कौडगे यांनी केले.यावेळी माधव मेकेवाड,विजय पांडुरंग मोरे,गुणाजी भंडरवाड ,गजानन जाधव,सुनील पवार यांच्या कडे विविध पदे देऊन सत्कार करण्यात आला .शंकर पाटील हाडोळीकर ,सोहम शेट्टे, आकाश गेंटेवार यांची निवड देखील यावेळी भोकर तालुक्यातील कार्यकर्ते समोर देऊन राजसाहेब यांच्या सैनिकांच्या घोषणा कार्यलयात यावेळी गुंजू लागल्या.

या निवडी वेळी माधव मेकेवाड म्हणाले...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजसाहेब देशाला आणि महाराष्ट्र राज्याला खरी दिशा देणारे एकमेव नेते असणार आहेत अशा नेत्याच्या पक्षात कार्य करणे म्हणजे आगामी महाराष्ट्र राज्याचा खरा विकास करताना साक्षीदार ठरणे होय  यामुळे मी पुनश्च पक्षात प्रवेश केला असे मत माधव मेकेवाड यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी समोर पक्ष कार्यलय नांदेड येथील बैठकीत मांडले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...