Skip to main content

दरसांगवी येथील गावठाण डिपी गेल्या दोन वर्षापासुन नादुरुस्त गावकरी संतापले

 


(प्रतिनिधी दरसांगवी):- किनवट तालुक्यातील दर सांगवी येथील डीपी बंद केल्यामुळे गावातील लोकांना कित्येक वेळास अंधार भोगावा लागला  असल्यामुळे महावितरण चे कर्मचारी दरसांगवी( ची ) गावासोबत वेळो वेळी लपंडाव चालू आहे उपविभागीय अभियंता महावितरण किनवट यांना लेखी अर्ज केला दि. ०७/१२/२०२० रोजी  वारंवार गावकऱ्यांना त्रास होत असल्यामुळे अहो रात्री डीपीवर सतत जाळ होत आसल्या मुळे रात्रीच्या वेळेस गावकऱ्यांना डीपी जवळ येऊन फ्युज गेलेला टाकावे लागत असल्यामुळे जर दुर्दैवाने त्या ठिकाणी करंट लागून कोणाचाही म्रुत्यू होऊ शकतो  त्याला फक्त महावितरण जबाबदार राहील पण यावर हावितरण कानाडोळा करते वेळो वेळी अधिकार्‍यांना फोन करून गावकऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असताना उडवाउडवीची उत्तरे देत अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला दरसांगवी (ची )या गावांमध्ये 95 टक्के गावात मीटर प्रत्येक घरोघर आहे गावातील मीटर संख्या जास्त असल्यामुळे एकाच डीपीवर जास्त लोड पडत असल्यामुळे गावातल्या गावकऱ्यांना हा त्रास भोगावा लागत आहे मात्र गावासाठी दोन डीपी असताना दोन वर्षापासून एक डीपी बंद आहे दरसांगवी ग्रामपंचायत मध्ये पुन्हा डीपी बदल ठराव घेऊन ग्रामसेवक यांनी पुन्हा लेखी अर्ज किनवट महावितरण यांच्याकडे देण्यात आले दिनांक.०७/०२/२०२१ तरीपण त्यावर महावितरण कुठलाही पाऊल उचलत नसल्यामुळे उपोषणाला बसण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला





Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...