Skip to main content

दरसांगवी येथील गावठाण डिपी गेल्या दोन वर्षापासुन नादुरुस्त गावकरी संतापले

 


(प्रतिनिधी दरसांगवी):- किनवट तालुक्यातील दर सांगवी येथील डीपी बंद केल्यामुळे गावातील लोकांना कित्येक वेळास अंधार भोगावा लागला  असल्यामुळे महावितरण चे कर्मचारी दरसांगवी( ची ) गावासोबत वेळो वेळी लपंडाव चालू आहे उपविभागीय अभियंता महावितरण किनवट यांना लेखी अर्ज केला दि. ०७/१२/२०२० रोजी  वारंवार गावकऱ्यांना त्रास होत असल्यामुळे अहो रात्री डीपीवर सतत जाळ होत आसल्या मुळे रात्रीच्या वेळेस गावकऱ्यांना डीपी जवळ येऊन फ्युज गेलेला टाकावे लागत असल्यामुळे जर दुर्दैवाने त्या ठिकाणी करंट लागून कोणाचाही म्रुत्यू होऊ शकतो  त्याला फक्त महावितरण जबाबदार राहील पण यावर हावितरण कानाडोळा करते वेळो वेळी अधिकार्‍यांना फोन करून गावकऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असताना उडवाउडवीची उत्तरे देत अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला दरसांगवी (ची )या गावांमध्ये 95 टक्के गावात मीटर प्रत्येक घरोघर आहे गावातील मीटर संख्या जास्त असल्यामुळे एकाच डीपीवर जास्त लोड पडत असल्यामुळे गावातल्या गावकऱ्यांना हा त्रास भोगावा लागत आहे मात्र गावासाठी दोन डीपी असताना दोन वर्षापासून एक डीपी बंद आहे दरसांगवी ग्रामपंचायत मध्ये पुन्हा डीपी बदल ठराव घेऊन ग्रामसेवक यांनी पुन्हा लेखी अर्ज किनवट महावितरण यांच्याकडे देण्यात आले दिनांक.०७/०२/२०२१ तरीपण त्यावर महावितरण कुठलाही पाऊल उचलत नसल्यामुळे उपोषणाला बसण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला





Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...