लॉक डाऊनची बिकट परीस्थीती लक्षात घेऊन न.प. ने नळ टॅक्स व घर टॅक्स माफ करावा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी
ता. प्र.किनवट:-
लॉकडाऊन मुळे सामान्य व मध्य वर्गीय कुटुंब यांचा जगण्याचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न फार गंभीर बनला आहे कोव्हीड१९च्या वाढत्या प्रभावामुळे गेल्या सालापासुन ग्रामिण तसेच शहरी भागाचे चित्र बदलले आहे .
हातावर पोट असणाऱ्या गोर गरीब जनतेला काम केल्याशिवाय त्यांचे घर चालत नाही त्यातच नगर पालीकेने मार्च एन्डीगंच्या नावाने सक्तीची वसुली सुरू केली आहे .
यामुळे गोर गरीब व मध्यवर्गीय कुटुंबाने जगावे कि मरावे हा सवाल त्यांच्या समोर उभा टाकला आहे.
सध्या या कोरोना मुळे सर्व शहर आर्थीक संकटाचा सामना करत आहे या पासुन जनतेला दिलासा मिळावा या करीता महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने माजी ता. अ. नितीन मोहरे, शहराध्यक्ष अनिल इरावार, ता. अ.रोहीत भिसे, प्रसाद भंडारे, नागेश मंत्रीवार, शहर सचिव गणेश करणेवार यांनी किनवट न .प. मुख्याधिकारी यांच्याकडे हे निवेदन सोपवले व विनंती केली आहे.
Comments
Post a Comment