Skip to main content

किनवट न.प.कार्यालयीन अधिक्षक व स्वच्छता निरिक्षक चंद्रकांत दुधारे यांची शिवा क्यातमवार यांच्या विरोधात तक्रार

 


ता. प्र.किनवट:-

किनवट नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक  व स्वच्छता निरिक्षक चंद्रकांत दुधारे यांनी  नगरसेवीका श्रीमती अनिता क्यातमवार  यांचे पती शिवा क्यातमवार यांच्या हे नियमबाह्य कामे करण्या करिता दबाव टाकत असुन त्याकरीता मानसिक त्रास देत असल्याची तक्रार मा.मुख्याधिकारी एन. सुंकेवार यांच्याकडे  केली आहे .

वार्ड क्र.३मधुन निवडुन आलेल्या नगरसेवीका श्रीमती अनिता क्यातमवार यांचे पती शिवा क्यातमवार हे नियमबाह्य कामे करण्यास दबाव आणत आहेत त्यांचा बंदोबस्त करा अन्यथा लेखणी बंद आदोंलन  असे पत्रव्यवहार प्रभारी कार्यालयीन अधिक्षक व स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याकडे सादर केल्याने शहरात चर्चेला उधान आले आहे दि.१४ मार्च रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाला धुडकाऊन  काही दिवसापुर्वी एका व्यक्तीचे अपघाती निधन झाले त्यांचे १०मुळ प्रमाणपत्र द्या अशी मागणी श्रीमती  क्यातमवार यांचे पती शिवा क्यातमवार का. अ. सी. दुधारे यांना या बाबत दबाव आणत होते .

महिला आरक्षणावर एखादी महिला प्रतीनिधी निवडुण येते मात्र त्यांचा व्यवहार हे त्यांचे पतीच पाहतात एकीकडे शासन महिला सक्षमीकरणासाठी लाखों करोडो रुपये खर्च करते मात्र प्रत्यक्षात त्याची अमलबजावणी होताना दिसून येत नाही यामुळे नगर परिषदेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे या प्रकरणी मुख्याधिकारी व वरिष्ठ आधिकारी काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

या प्रकरणी न.प. कर्मचारी अझहर अली, अनिल बिराजदार, प्रशांत कुमरे, रमेश नेमान्नीवार, विनोद पवार यांच्यासह विविध कर्मचाऱ्यांनी क्यातमवार यांना  समजुत घालण्याचा प्रयत्न केला पंरतु ते कोणाचेही ऐकुण घेण्याच्या मनस्थितीत नव्हते .

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...