Skip to main content

किनवट न.प.कार्यालयीन अधिक्षक व स्वच्छता निरिक्षक चंद्रकांत दुधारे यांची शिवा क्यातमवार यांच्या विरोधात तक्रार

 


ता. प्र.किनवट:-

किनवट नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक  व स्वच्छता निरिक्षक चंद्रकांत दुधारे यांनी  नगरसेवीका श्रीमती अनिता क्यातमवार  यांचे पती शिवा क्यातमवार यांच्या हे नियमबाह्य कामे करण्या करिता दबाव टाकत असुन त्याकरीता मानसिक त्रास देत असल्याची तक्रार मा.मुख्याधिकारी एन. सुंकेवार यांच्याकडे  केली आहे .

वार्ड क्र.३मधुन निवडुन आलेल्या नगरसेवीका श्रीमती अनिता क्यातमवार यांचे पती शिवा क्यातमवार हे नियमबाह्य कामे करण्यास दबाव आणत आहेत त्यांचा बंदोबस्त करा अन्यथा लेखणी बंद आदोंलन  असे पत्रव्यवहार प्रभारी कार्यालयीन अधिक्षक व स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याकडे सादर केल्याने शहरात चर्चेला उधान आले आहे दि.१४ मार्च रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाला धुडकाऊन  काही दिवसापुर्वी एका व्यक्तीचे अपघाती निधन झाले त्यांचे १०मुळ प्रमाणपत्र द्या अशी मागणी श्रीमती  क्यातमवार यांचे पती शिवा क्यातमवार का. अ. सी. दुधारे यांना या बाबत दबाव आणत होते .

महिला आरक्षणावर एखादी महिला प्रतीनिधी निवडुण येते मात्र त्यांचा व्यवहार हे त्यांचे पतीच पाहतात एकीकडे शासन महिला सक्षमीकरणासाठी लाखों करोडो रुपये खर्च करते मात्र प्रत्यक्षात त्याची अमलबजावणी होताना दिसून येत नाही यामुळे नगर परिषदेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे या प्रकरणी मुख्याधिकारी व वरिष्ठ आधिकारी काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

या प्रकरणी न.प. कर्मचारी अझहर अली, अनिल बिराजदार, प्रशांत कुमरे, रमेश नेमान्नीवार, विनोद पवार यांच्यासह विविध कर्मचाऱ्यांनी क्यातमवार यांना  समजुत घालण्याचा प्रयत्न केला पंरतु ते कोणाचेही ऐकुण घेण्याच्या मनस्थितीत नव्हते .

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला