Skip to main content

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापण दिनानिमित्त संथागार वृध्दाश्रमास अन्नदानासाठी निधी समर्पित


 किनवट (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त  9 मार्च 2019 रोजी माजी तालुकाध्यक्ष नितीन मोहरे यांच्या नेतृत्वाखाली येथील संथागार वृद्धाश्रमात वृद्धांना अन्नदानासाठी पक्षाच्या वतीने निधी समर्पित करण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष स्थापनेला 9 मार्च 2021 रोजी 15 वर्ष पूर्ण झालेली असून पक्षाचा हा वर्धापन दिन सबंध महाराष्ट्रात मनसेच्या वतीने विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने किनवट येथे सुद्धा मनसेचे माजी तालुकाध्यक्ष नितीन मोहरे यांच्या नेतृत्वाखाली किनवट शहरासह तालुक्यात महाराष्ट्र सैनिकांनी मोठ्या उत्साहात तसेच विविध उपक्रम राबवून वर्धापन दिन साजरा केला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने साध्या पद्धतीनेच पण समाज भावनेतून किनवट येथील संथागार वृद्धाश्रमात महाराष्ट्र सैनिकांनी पक्षाच्यावतीने वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजनदान उपलब्ध व्हावे या मानवतेच्या दृष्टीने संथागार चे संचालक माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांच्याकडे  निधी समर्पित  करून वर्धापनदिन साजरा केला आहे. यावेळी माजी तालुकाध्यक्ष नितीन मोहरे यांनी किनवट सारख्या अतिदुर्गम व मागास भागात लोककल्याणाच्या भावनेतून वृद्धाश्रम सुरू केल्याबद्दल अरुण आळणे यांचे कौतुक केले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्य वृद्धांना अन्नदानासाठी निधी समर्पित करून वृद्धांचा आशीर्वाद प्राप्त केल्याच्या  भावना संथागारचे  आळणे यांनी व्यक्त केल्या आहेत. याप्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष अनिल ईरावार, मनविसेचे तालुकाध्यक्ष रोहित भिसे,  मनविसेचे शहराध्यक्ष नागेश मंत्रीवार,  वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष प्रसाद भंडारे,  शहर सचिव गणेश करनेवार,  शहर उपाध्यक्ष इलियास चौधरी,  विजय वाघमारे,  सचिन कांबळे,  प्रदीप दोनकोंडावार, पवन साळुंखे यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते


Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...