Skip to main content

किनवट सा.बा.उपअभियंता बोबडे यांना माहिती आयुक्तांनी लावला 15 हजारांचा दंड..!

 

(किनवट ता. प्र.):

शासनाचा महत्वकांक्षी कायदा असणाऱ्या माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या किनवट सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयातील उपविभागीय अभियंता बोबडे यांना माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांचा तीन प्रकरणांत माहिती आयुक्तांनी प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे एकूण तीन प्रकरणांत 15 हजारांचा दंड लावला आहे आणि दंडाची शिक्षा शास्ती करुन वसूल करण्यासाठी सर्कल अभियंता अविनाश धोंडगे नांदेड यांना आदेशित केले आहे.

  महाराष्ट्र शासनाने त्यांचा कारभार कसा पारदर्शक आहे हे दाखवण्यासाठी सन 2005 मध्ये माहिती अधिकार कायदा बनवत खऱ्या अर्थाने जनतेला सत्तेची चावी हाथी देतं प्रशासनावर वचक ठेवण्याची व्यवस्था निर्माण करून दिली आहे. त्याची उपयोगिता सिद्ध झाल्यानंतर खुद्द केंद्र सरकारने या कायद्याची दखल घेत याला केंद्रीय कायद्याच्या स्वरूपात लागु केले आहे. आज रोजी या कायद्यामुळे मोठ मोठी प्रकरणे बाहेर निघाली आहेत. खुद्द माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्री पद या कायद्यामुळे गेलं होतं. त्यामुळे आपला भ्रष्टाचार उघड होऊ नये यासाठी सर्वच अधिकारी माहिती अधिकार कायद्याच्या विरोधात आहेत. शक्यतो हे अधिकारी माहिती दाडवण्याचाच जास्त प्रयत्न करत असतात. असाच काहीसा प्रकार किनवट सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयातील उप अभियंता बोबडे यांनी केला होता. त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली होती, त्यानंतर कार्यकर्ते यांनी राज्य माहिती आयोग आयुक्त औरंगाबाद येथे द्वितीय अपील करत दाद मागितली होती त्यावर सुनावणी घेऊन आयुक्त साहेबांनी उपअभियंता बोबडे यांना खुलासा सादर करण्यास सांगीतले असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत खुलासा न सादर केल्याने तिन्ही प्रकरणांत प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे एकूण पंधरा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि शास्तीची रक्कम वसूल करण्यासाठी सर्कल अभियंता अविनाश धोंडगे यांना आदेशित केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.