Skip to main content

किनवट सा.बा.उपअभियंता बोबडे यांना माहिती आयुक्तांनी लावला 15 हजारांचा दंड..!

 

(किनवट ता. प्र.):

शासनाचा महत्वकांक्षी कायदा असणाऱ्या माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या किनवट सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयातील उपविभागीय अभियंता बोबडे यांना माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांचा तीन प्रकरणांत माहिती आयुक्तांनी प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे एकूण तीन प्रकरणांत 15 हजारांचा दंड लावला आहे आणि दंडाची शिक्षा शास्ती करुन वसूल करण्यासाठी सर्कल अभियंता अविनाश धोंडगे नांदेड यांना आदेशित केले आहे.

  महाराष्ट्र शासनाने त्यांचा कारभार कसा पारदर्शक आहे हे दाखवण्यासाठी सन 2005 मध्ये माहिती अधिकार कायदा बनवत खऱ्या अर्थाने जनतेला सत्तेची चावी हाथी देतं प्रशासनावर वचक ठेवण्याची व्यवस्था निर्माण करून दिली आहे. त्याची उपयोगिता सिद्ध झाल्यानंतर खुद्द केंद्र सरकारने या कायद्याची दखल घेत याला केंद्रीय कायद्याच्या स्वरूपात लागु केले आहे. आज रोजी या कायद्यामुळे मोठ मोठी प्रकरणे बाहेर निघाली आहेत. खुद्द माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्री पद या कायद्यामुळे गेलं होतं. त्यामुळे आपला भ्रष्टाचार उघड होऊ नये यासाठी सर्वच अधिकारी माहिती अधिकार कायद्याच्या विरोधात आहेत. शक्यतो हे अधिकारी माहिती दाडवण्याचाच जास्त प्रयत्न करत असतात. असाच काहीसा प्रकार किनवट सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयातील उप अभियंता बोबडे यांनी केला होता. त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली होती, त्यानंतर कार्यकर्ते यांनी राज्य माहिती आयोग आयुक्त औरंगाबाद येथे द्वितीय अपील करत दाद मागितली होती त्यावर सुनावणी घेऊन आयुक्त साहेबांनी उपअभियंता बोबडे यांना खुलासा सादर करण्यास सांगीतले असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत खुलासा न सादर केल्याने तिन्ही प्रकरणांत प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे एकूण पंधरा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि शास्तीची रक्कम वसूल करण्यासाठी सर्कल अभियंता अविनाश धोंडगे यांना आदेशित केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...