Skip to main content

किनवट सा.बा.उपअभियंता बोबडे यांना माहिती आयुक्तांनी लावला 15 हजारांचा दंड..!

 

(किनवट ता. प्र.):

शासनाचा महत्वकांक्षी कायदा असणाऱ्या माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या किनवट सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयातील उपविभागीय अभियंता बोबडे यांना माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांचा तीन प्रकरणांत माहिती आयुक्तांनी प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे एकूण तीन प्रकरणांत 15 हजारांचा दंड लावला आहे आणि दंडाची शिक्षा शास्ती करुन वसूल करण्यासाठी सर्कल अभियंता अविनाश धोंडगे नांदेड यांना आदेशित केले आहे.

  महाराष्ट्र शासनाने त्यांचा कारभार कसा पारदर्शक आहे हे दाखवण्यासाठी सन 2005 मध्ये माहिती अधिकार कायदा बनवत खऱ्या अर्थाने जनतेला सत्तेची चावी हाथी देतं प्रशासनावर वचक ठेवण्याची व्यवस्था निर्माण करून दिली आहे. त्याची उपयोगिता सिद्ध झाल्यानंतर खुद्द केंद्र सरकारने या कायद्याची दखल घेत याला केंद्रीय कायद्याच्या स्वरूपात लागु केले आहे. आज रोजी या कायद्यामुळे मोठ मोठी प्रकरणे बाहेर निघाली आहेत. खुद्द माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्री पद या कायद्यामुळे गेलं होतं. त्यामुळे आपला भ्रष्टाचार उघड होऊ नये यासाठी सर्वच अधिकारी माहिती अधिकार कायद्याच्या विरोधात आहेत. शक्यतो हे अधिकारी माहिती दाडवण्याचाच जास्त प्रयत्न करत असतात. असाच काहीसा प्रकार किनवट सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयातील उप अभियंता बोबडे यांनी केला होता. त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली होती, त्यानंतर कार्यकर्ते यांनी राज्य माहिती आयोग आयुक्त औरंगाबाद येथे द्वितीय अपील करत दाद मागितली होती त्यावर सुनावणी घेऊन आयुक्त साहेबांनी उपअभियंता बोबडे यांना खुलासा सादर करण्यास सांगीतले असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत खुलासा न सादर केल्याने तिन्ही प्रकरणांत प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे एकूण पंधरा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि शास्तीची रक्कम वसूल करण्यासाठी सर्कल अभियंता अविनाश धोंडगे यांना आदेशित केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...