(ता. प्र. किनवट)
अठरा पगड जातींना एकत्र करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जंयती निमित्त टिपु सुलतान ब्रिगेड किनवट
टिपू सुलतान ब्रिगेडचे संस्थापक तथा दंगा मुक्त महाराष्ट्र अभियानाचे अध्यक्ष शेख सुभान अली यांच्या नेतृत्वाखाली हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला किनवट टिपु सुलतान शाखे तर्फे आज उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील रुग्णांना फळवाटप करण्यात आले
तसेच संथागार वृद्धाश्रमात गरजवंताना व जुन्या नगर परिषदेच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदान शिबीरार्थी व शालेय विद्यार्थ्यांना विविध फळांचे वाटप करण्यात आले .
यावेळी टिपु सुलतान ब्रिगेडचे
जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद नदीम,जिल्हासचिव शारूख खान,तालुका अध्यक्ष शाकीर शेख़ ,तालुका उपाध्यक्ष इशरतशेख़,तालुका युवा उपाध्यक्ष समीर शैख़ ,शब्बीर खान,रियाज़ शेख़
नासेर भाई ,अब्बास कुरैशी ,दुर्गेश भागीरथीवार,फारूक चव्हान ,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुका अध्यक्ष मुनीर शेख़ आदी उपस्थीत होते.
या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातुन स्वागत करण्यात येत आहे
Comments
Post a Comment